शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

पाच जि.प.मध्ये भाजपाला बहुमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2017 04:47 IST

२५ जिल्हा परिषदांच्या मंगळवारी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला पाच ठिकाणी बहुमत मिळाले तर पाच ठिकाणी भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे.

मुंबई : २५ जिल्हा परिषदांच्या मंगळवारी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला पाच ठिकाणी बहुमत मिळाले तर पाच ठिकाणी भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. ग्रामीण भागात पक्षाचे स्थान यानिमित्ताने अधिक मजबूत झाल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी आज दिली. जळगाव, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि लातूर येथे भाजपाला बहुमत मिळाले. सांगली, गडचिरोली, बुलडाणा, औरंगाबाद आणि जालना जिल्हा परिषदेत भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरला. आम्ही सर्वाधिक मोठा पक्ष ज्या ठिकाणी ठरलेलो आहोत तेथे इतर काही पक्ष, अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे खा. दानवे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शिवसेनेला फक्त रत्नागिरीत तर काँग्रेसला सिंधुदुर्गमध्ये बहुमत मिळाले आणि राष्ट्रवादीला पुणे आणि सातारामध्येच बहुमत मिळविता आले. शिवसेना यवतमाळ आणि रायगडमध्ये सर्वांत मोठा पक्ष आहे. काँग्रेसने हे यश नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर आणि नांदेडमध्ये मिळविले. राष्ट्रवादीला ते सोलापूर, परभणी, हिंगोली, बीड आणि उस्मानाबादमध्ये मिळाले. २५ जिल्हा परिषदांच्या २०१२मधील निवडणुकीत भाजपाला २०५ जागा मिळाल्या होत्या. या वेळी हे संख्याबळ ६२९ झाले. पक्षाने ४२४ जागा अधिक जिंकल्या. (विशेष प्रतिनिधी)