शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

जम्मु-काश्मिरच्या बंदीपोराजवळ शहीद झालेले मिलिंद यांचा २६/११चा अतिरेकी हल्ला उलथवून लावण्यामध्ये मोठे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 20:30 IST

१६ डिसेंबर २००२ साली वायू दलात भरती झालेले मिलिंद यांचे शालेय वयापासून देशसेवेचे लक्ष्य ठेवले होते. साक्री येथे बारावी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर धुळ्यातील विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असतानाच त्यांना सैन्यदलात जाण्याची संधी लाभली होती.

ठळक मुद्देसुरूवातीला सैन्याचे नऊ महिन्यांचे प्रशिक्षणाबरोबरच मिलिंद यांनी तीन वर्षे पॅरा सैन्य, एनएसजी कमांडो असे सर्व प्रशिक्षण घेतले होते. २००४ साली वायू दलाने ‘गरूड कमांडो पथका’ची स्थापना केली. ‘गरूडा’ कमांडो पथकाच्या पहिल्या सत्राचे जवान म्हणून मिलिंद यांना कर्तबगारी दाखविण्याची संधी मिळाली होती. २६/११चा मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याप्रसंगी अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यासाठी गरूड कमांडो या विशेष पथकाच्या जवानांनी योगदान दिले होते. मिलिंद यांचाही ‘गरूड कमांडो’च्या तुकडीत सहभाग होता

अझहर शेख / नाशिक : जम्मु-काश्मिरच्या बंदीपोराजवळील हाजीन सेक्टरमध्ये ‘जैश’च्या अतिरेक्यांना यमसदनी धाडताना वीरमरण आलेले मुळ धुळे येथील बोराळा गावाचे सुपुत्र व वायू दलाच्या ‘गरूडा’ पथकाचे कमांडो सार्जन्ट मिलिंद किशोर खैरनार यांनी मुंबईवर झालेल्या २६/११चा अतिरेकी हल्ला उलथवून लावण्यामध्ये मोठे योगदान दिले होते.धुळे जिल्ह्यातील साक्रीमध्ये शहीद मिलिंद यांचे बालपण गेले. त्यांनी शालेय शिक्षण तेथे पुर्ण केले. १६ डिसेंबर २००२ साली वायू दलात भरती झालेले मिलिंद यांचे शालेय वयापासून देशसेवेचे लक्ष्य ठेवले होते. साक्री येथे बारावी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर धुळ्यातील विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असतानाच त्यांना सैन्यदलात जाण्याची संधी लाभली होती. सुरूवातीला सैन्याचे नऊ महिन्यांचे प्रशिक्षणाबरोबरच मिलिंद यांनी तीन वर्षे पॅरा सैन्य, एनएसजी कमांडो असे सर्व प्रशिक्षण घेतले होते. २००४ साली वायू दलाने ‘गरूड कमांडो पथका’ची स्थापना केली. ‘गरूड’ कमांडो पथकाच्या पहिल्या सत्राचे जवान म्हणून मिलिंद यांना कर्तबगारी दाखविण्याची संधी मिळाली होती. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याप्रसंगी अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यासाठी राष्टÑीय सुरूक्षा दल (एनएसजी) गरूड कमांडो या विशेष पथकाच्या जवानांनी योगदान दिले होते. यावेळी मिलिंद यांनाही ‘गरूड कमांडो’च्या तुकडीत मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ला उधळण्यासाठी रवाना रवाना करण्यात आले होते. नरीमन हाऊस येथे हेलिकॉप्टरद्वारे उतरणाºया भारतीय सैन्य दलाच्या विविध विशेष कमांडो पथकांच्या जवानांमध्ये मिलिंद यांचाही सहभाग होता, अशी माहिती वीरपिता किशोर खैरनार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

अतिरेक्यांशी झुंज देण्याची मिलिंद यांची  पहिली वेळ नव्हतीजम्मूच्या बंदीपोरामधील हाजीन सेक्टरमध्ये अतिरेक्यांशी झुंज देण्याची मिलिंद यांची ही पहिली वेळ नव्हती तर भारतीय वायू दलात दाखल झाल्यानंतर दोन वर्षांमध्येच त्यांनी मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यात अतिरेक्यांना कंठस्नान घालत हल्ला उलथवून लावण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली होते. हाजीनमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यानंतर चकमकीत उर्वरित दहशतवाद्यांना यमसदनी धाडताना ते शहीद झाल्याचे त्यांचे शालेय जीवनाचे मित्र राजकुमार राजकुवर यांनी सांगितले.