शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

‘मातीविना शेती’ हे तंत्र अवलंबा: शरद पवार

By admin | Updated: January 28, 2017 01:10 IST

भिमा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन, नवतंत्रज्ञानातून संसार समृद्ध करण्याची कोल्हापूरकरांत ताकद

कोल्हापूर : उद्योगांसह इतर विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात शेतजमिनी गेल्याने भविष्यात ‘मातीविना शेती’ असा हायड्रोफोनिक शेतीचा प्रयोग करावा लागेल. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तरच देश सक्षम होणार असल्याने शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाचा वापर करून आपला संसार समृद्ध करावा. शेतीमधील परिवर्तनाची ताकद कोल्हापुरातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मनगटात आहे, असा विश्वास राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. भिमा उद्योगसमूहाच्या वतीने मेरी वेदर ग्राउंड येथे आयोजित केलेल्या ‘भिमा कृषी - २०१७’ या कृषी व पशू प्रदर्शनाचे शुक्रवारी शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. भीमराव महाडिक यांनी सांगलीतून पंढरपुरात जाऊन शेती व साखर कारखानदारीत जम बसविला. अशा आदर्शवत व्यक्तीच्या नावाने कृषी प्रदर्शन भरविल्याबद्दल समाधान वाटत असल्याचे सांगत शरद पवार म्हणाले, एकेकाळी अन्नधान्य आयात करणारा भारत आज गहू, साखर, तांदूळ निर्यातीमध्ये आघाडीवर आहे. काळ्या आईची इमानी सेवा करणाऱ्या शेतकऱ्याच्या घामाला योग्य मोबदला मिळाला तर काय होऊ शकते, हेच यातून स्पष्ट होते. उद्योग, रस्ते, रेल्वे, धरणांसाठी जमिनी मोठ्या प्रमाणात गेल्याने शेतीवर बोजा वाढत आहे. यासाठी शेतीसह इतर क्षेत्रांकडे वळले पाहिजे. नोटबंदीवर सडकून टीका करीत, पवार म्हणाले, काही वेळा केंद्र सरकारने अंगात आल्यासारखे केले की झटके बसतात. नोटबंदीमुळे शेतीची अर्थव्यवस्था कोलमडली, दूध व्यवसाय तर पूर्ण अडचणीत आला. काळा पैसा आपल्या खात्यात जमा होईल, या आशेने लोक आतापर्यंत शांत होते; पण आता कुरबूर सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यासाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केल्याचे सांगत संयोजक खासदार धनंजय महाडिक म्हणाले, पवारसाहेबांच्या प्रेरणेतूनच प्रदर्शन घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या हस्ते उद्घाटन व्हावे, याची दहा वर्षे वाट पाहत होतो. महापौर हसिना फरास, आमदार हसन मुश्रीफ, महादेवराव महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी स्वागत केले. रामराजे कुपेकर यांनी आभार मानले. निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजित शिंदे, डॉ. जनार्दन पाटील यांना ‘भिमा कृषी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैशाली पाटील , काशीबाई मोरे , रूपाली सावंत , लक्ष्मी पाटील यांना ‘जिजामाता शेतीभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार अमल महाडिक, आमदार भारत भालके, के. पी. पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे, निवेदिता माने, ललित गांधी, सत्यजित भोसले, आदी उपस्थित होते. शरद पवारांकडून महाडिकांचे कौतुकगेली दहा वर्षे खासदार धनंजय महाडिक हे भीमा कृषी प्रदर्शन भरवत आहेत. या प्रदर्शनाचा फायदा शेतकऱ्यांना होऊन त्यांची प्रगती होत आहे. शेतकरी शेतीत त्यातून नवनवीन प्रयोग करीत आहेत. याचा उल्लेख करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी धनंजय महाडिक यांचे चांगलेच कौतुक केले.‘केडीसीसी’चा चेअरमन कोण?राज्यातील ३१ जिल्हा बॅँकांत ८६६० कोटींच्या जुना नोटा पडून आहेत. अजूनही नवीन चलन मिळते का? केडीसीसी बॅँकेचा चेअरमन कोण आहे? अशी विचारणा हसन मुश्रीफ यांनाच केल्याने हशा पिकला. आपणच चेअरमन असल्याचे मुश्रीफ यांनी सांगताच, ‘नोटा-बिटा काही मिळते का नुसतेच बसता?’ असा चिमटाच पवार यांनी काढला. आई कोल्हापूरची म्हणूनच ‘पद्मविभूषण’एकाच घरातील तीन भावांचा ‘पद्म’ पुरस्काराने सन्मान होण्यामागे विविध कारणे सांगितली जात असली तरी माझ्या दृष्टीने आणखी एक कारण आहे. ज्या मातेने आम्हांला जन्म दिला, ती कोल्हापूरची होती. तिचा जन्म, शिक्षण कोल्हापुरात झाले. कोल्हापूरचे पाणीच काही वेगळे आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्या मातेचा विसर करून चालणार नाही, अशा शब्दांत पवार यांनी भावना व्यक्त केल्या. भिमा कृषी प्रदर्शन खुलेचारशे स्टॉल्स : शेतकरी बांधवांची गर्दीकोल्हापूर : शेतीपूरक व शेतीशी निगडित असलेली माहिती पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना एकाच छताखाली मिळावी, या उद्देशाने कोल्हापुरात मेरी वेदर मैदानावर भरविण्यात आलेले ‘भिमा कृषी प्रदर्शन’ शुक्रवारपासून खुले झाले. या प्रदर्शनात सुमारे चारशे स्टॉल्स असून, शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती या ठिकाणी आहे.कृषी, प्लास्टिकल्चर, पशुपालनासह बैल, गायी, बकरी यांच्या वेगवेगळ्या जातींची जनावरे ही प्रदर्शनातील मुख्य वैशिष्ट्ये आहेत.गेल्या दहा वर्षांपासून खासदार धनंजय महाडिक हे भिमा कृषी प्रदर्शन याठिकाणी भरवितात. पश्चिम महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकरी दरवर्षी या प्रदर्शनाचा लाभ घेतात. प्रदर्शनाच्या चार दिवसांत सुमारे पाच ते सहा लाख लोक या ठिकाणी येतात. यंदा शुक्रवारपासून या प्रदर्शनाला सुरुवात झाली. सोमवार (दि. ३०) पर्यंत कृषी प्रदर्शनासह कलाविष्कार, संगीताचा कार्यक्रम, नृत्याविष्काराच्या कार्यक्रमाची मेजवानी पाहायला मिळणार आहे. स्टॉल्सची उत्कृष्ट मांडणीयंदाच्या स्टॉल्समध्ये प्रत्येक विभागात २५ स्टॉल्स आहेत. त्यामुळे प्रदर्शनात येणाऱ्यांना ते सुटसुटीतपणे पाहावयास मिळणार आहे.भिमा उद्योगसमूहाच्या वतीने मेरी वेदर ग्राउंड येथे शुक्रवारपासून भिमा कृषी प्रदर्शनास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी डावीकडून ललित गांधी, ए. वाय. पाटील, हसिना फरास, महादेवराव महाडिक, हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक, संध्यादेवी कुपेकर, निवेदिता माने, अमल महाडिक, कल्लाप्पाण्णा आवाडे, सुरेश कुराडे, आदी उपस्थित होते.