शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

राज्याचे आर्थिक हित सांभाळा

By admin | Updated: August 30, 2016 05:17 IST

नुकसान सोसूनही सह्याद्री नेहमीच हिमालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे म्हणूनच आम्ही वस्तू सेवा कराला (जीएसटी) पाठिंबा देत आहोत.

मुंबई : नुकसान सोसूनही सह्याद्री नेहमीच हिमालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे म्हणूनच आम्ही वस्तू सेवा कराला (जीएसटी) पाठिंबा देत आहोत. तरीही देशाचे हित जपत असताना राज्याचा आर्थिक कणा मोडणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी, अशी भूमिका विरोधी पक्षनेत्यांनी मांडली.वस्तू व सेवा करासंदर्भात (जीएसटी) संसदेने केलेल्या १२२ व्या घटनादुरुस्तीला समर्थन देण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सोमवारी आयोजित करण्यात आले होते. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधकांनी सरकारवर टीका करण्याची संधी दवडली नाही.जीएसटीवरील चर्चेला सुरुवात करताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, काँग्रेसचे पी. चिदंबरम वित्तमंत्री असताना त्यांनी जीएसटीचा पाया रचला. आज भाजपा फुकटचे श्रेय लाटत आहे. काँग्रेसने आखून दिलेल्या आर्थिक दिशेनेच आम्ही जात आहोत हे आजच्या सत्ताधाऱ्यांनी खुल्या दिलाने स्वीकारावे. हे सरकार काँग्रेसच्या ध्येयधोरणांना केवळ ‘कॉपी पेस्ट’ करीत आहे. ‘नयी सुबह के चर्चे करते थे जो, आज हमारा ही सूरज लिए वह उजागर हुए’ अशा शब्दांत विखे यांनी भाजपाला सुनावले. या विधेयकाचा मूळ हेतू शोधण्यासाठी सीआयडी चौकशी लावावी लागेल, असेही विखे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)मुंबईबाबत सर्वपक्षीय चिंताजीएसटी लागू झाल्यानंतर मुंबईवर निधीबाबत अन्याय होऊ शकतो, अशी शंका सर्वच पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राला जीएसटीमध्ये योग्य वाटा मिळवून देण्यासाठी वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या चकरा बंद करून दिल्लीतच तळ ठोकावा, अशी भावना जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्र्यांचे उत्तर... जीएसटीमुळे राज्याची आर्थिक स्वायत्तता संपून केंद्र सरकारवर अवलंबून राहावे लागणार असल्याचा विरोधकांचा आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावला. जीएसटी कर जेव्हा जमा होईल तेव्हाच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने राज्याचा हिस्सा राज्याकडे आणि केंद्राचा हिस्सा केंद्र सरकारच्या खात्यात जमा होणार आहे. कर आधी केंद्राकडे जमा होणार आणि नंतर राज्याकडे येणार, असा प्रकारच शिल्लक ठेवण्यात आला नाही. याच धर्तीवर मुंबईसारख्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी वितरित करण्यासाठी संस्थात्मक व्यवस्था निर्माण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.मनातील हुकूमशाही निर्णयांत - जयंत पाटीलकेंद्र वा राज्य सरकारने जीएसटी लागू करताना मनमानी करण्याऐवजी या निर्णयाने प्रभावित होणार असलेल्या विविध घटकांशी चर्चा करण्याची भूमिका घेतली पाहिजे. सध्या तरी हुकूमशाही मनात असली की ती निर्णयांत दिसते, अशीच अवस्था असल्याची टीका राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी केली. दीर्घकाळ वित्तमंत्री राहिलेले पाटील यांनी, जीएसटी लागू केल्याने राज्याचे सुमारे २५ हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. उद्या केंद्र सरकार ते भरून द्यायला निघाले तर इतर राज्ये त्याला कडाडून विरोध करतील, असा इशारा दिला. सेवाक्षेत्रात अग्रणी असलेल्या महाराष्ट्राला जीएसटीच्या निमित्ताने इतर राज्यांच्या पंक्तीत केंद्र नेऊन बसवीत असल्याची टीकाही त्यांनी केली. जीएसटीमुळे केंद्र सरकारचा सर्वात मोठा फायदा होणार असून महाराष्ट्राला मात्र फटका बसेल. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या लघू उद्योगांना त्यांचे उत्पादन बाजारात येईपर्यंतच्या प्रक्रियेत कर भरावा लागणार आहे. त्यामुळे या क्षेत्राचे मोठे नुकसान होईल, असे ते म्हणाले.महाराष्ट्राचे नुकसान होईल - मुंडेकाळाचा महिमा कसा असतो, ज्या मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जीएसटीला विरोध केला तेच देशाचे पंतप्रधान झाल्यावर जीएसटीबाबत आग्रही आहेत, असा टोला विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत लगावला. जीएसटीला आम्ही पाठींबा देऊ मात्र राज्याच्या हितालाच आमचे प्राधान्य राहील. या सुधारणेनंतर मुंबईसारख्या महानगरपालिका आर्थिकदृष्टया पंगू होण्याची शक्यता आहे. यावर विशेष स्वातंत्र्य पॅकेजच्या माध्यमातून केंद्र सरकारने तोडगा काढायला हवा. जीएसटी अंमलात आल्यानंतर नेमका किती कर भरावा लागेल याबाबत स्पष्टता नाही. ग्रामीण जनतेवर कराचा अतिरिक्त बोजा पडणार आहे त्यांना अनुदानाच्या रुपात मदत करावी. जीएसटीमुळे महागाई वाढणार आहे. मोबाईल बिलापासून प्रत्येक सेवा महागणार आहेत. शिवाय, उत्पादक राज्यांपेक्षा उपभोक्ता राज्य जीएसटीमुळे लाभान्वित होणार असल्याने महाराष्ट्रासारख्या उत्पादक राज्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे राज्याला जीएसटीमधून विशेष वाट्याची तरतूद करावी अथवा मूळ घटना दुरुस्तीतील एक टक्का अधिभार लावण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही मुंडे यांनी केली. विधान परिषदेत जीएसटीवरील चर्चेत अनिल सोले, शरद रणपिसे, राहुल नार्वेकर, भाई जगताप, जोगेंद्र कवाडे, कपिल पाटील, जनार्दन चांदूरकर, हेमंत टकले, प्रकाश गजभिये आदी सदस्यांनी सहभाग घेतला.मुंबईला थेट निधी मिळावा - नीलम गोऱ्हे जीएसटी आल्यानंतर महापालिकेच्या करांचे उत्पन्न घटणार आहे. देशाच्या एकूण कस्टम ड्युटीपैकी ६० टक्के मुंबईतून, सेंट्रल एक्साईजपैकी २० टक्के, परदेशी व्यापारापैकी ४० टक्के तर मुंबईतून कापोर्रेट कर ४० हजार कोटींची जमा होतो. त्यामुळे मुंबईला थेट निधी मिळावा यासाठी तरतूद करावी अशी मागणी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी केली.महापालिका भाजपाच्या मर्जीवर - पवारगेली अनेक वर्षे शिवसेनेचे वर्चस्व असलेली मुंबई महापालिका जीएसटीमुळे आता आर्थिकदृष्ट्या भाजपाची सत्ता असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या भरवशावर चालेल, असा टोला माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हाणला. ते म्हणाले की, केंद्र सरकार मुंबई महापालिकेला जीएसटीअंतर्गत थेट निधी देणार नाहीच. हा निधी राज्य सरकारमार्फत महापालिकेला दिला जाईल. त्यामुळे मुंबईला निधी कधी आणि किती द्यायचा हे भाजपाचे मुख्यमंत्री अन् वित्त मंत्री ठरवतील. शिवसेनेच्या हाती काहीही राहणार नाही. सध्या जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांना निधी देण्याबाबत असेच चालले आहे.जीएसटीसाठी वेगळा आयोग नेमा - चव्हाणजीएसटीबाबत राज्यांची तक्रार ऐकून निवाडा देण्यासाठी केंद्रीय पातळीवर एक आयोग नेमावा. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठीही स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याची गरज आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांची विकासाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका आहे. या संस्था जीएसटी आल्यानंतर आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिल्या नाहीत तर ७४ व्या घटनादुरुस्तीचा हेतूच पराभूत होईल. केंद्राशी संबंधित राज्यांच्या तक्रारी आणि राज्याशी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठीची यंत्रणा न्यायिक स्वरुपाची असली पाहिजे, असे चव्हाण म्हणाले.