शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

व्यवस्थेवर अंकुश ठेवणे हे पत्रकारांचे मुख्य काम

By admin | Updated: May 1, 2017 03:14 IST

सध्या ट्रोलिंगद्वारे सोशल मीडियावर खोटी माहिती खरी म्हणून पसरवली जाते आहे. यामध्ये कॉर्पोरेट्स, राजकारणी, सरकारद्वारे

पुणे : सध्या ट्रोलिंगद्वारे सोशल मीडियावर खोटी माहिती खरी म्हणून पसरवली जाते आहे. यामध्ये कॉर्पोरेट्स, राजकारणी, सरकारद्वारे हे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे पत्रकारांचे मुख्य काम हे सरकारी व्यवस्थेवर लक्ष ठेवणे आणि अन्यायाला वाचा फोडणे हे आहे. घटनांच्या पार्श्वभूमीवर मांडणी करताना आपली माध्यम म्हणून तेवढी क्षमता आहे याचा विचार करावा. तंत्रज्ञानामुळे माणसांसह शासन व्यवस्था बदलली आहे; परंतु पत्रकारांना बदलता आलेले नाही असे मत ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी व्यक्त केले. पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, उल्हास पवार, वि. अ. जोशी, विकास वाळुंजकर उपस्थित होते. दामले व बापट यांच्या हस्ते ‘लोकमत’चे संदीप प्रधान यांना मुख्य पुरस्कार देण्यात आला. तर शंतनू डोईफोडे, ज्ञानेश्वर बिजले, नम्रता वागळे यांना आश्वासक पत्रकारितेचा पुरस्कार देण्यात आला. दामले म्हणाले, ‘‘जशा वस्तू आणि सेवांचा सुकाळ झाला तस तसे पत्रकारिता बदलत गेली आहे. दूरदर्शनमुळे दृकश्राव्य माध्यमांना महत्त्व आले आहे. त्याचा भारतात मोठा परिणाम झाला आहे. ते मुद्रित पत्रकारितेचं पुढचं स्वरूप आहे. लोकांसमोर बातमी देण्याची घाई असल्याने सखोल माहिती देता येत नाही. पत्रकारांनी व्यवसायाशी एकनिष्ठता जपत वाचन वाढवले पाहिजे. आमिषांपासून दूर असावे. आपण खऱ्या अर्थाने माहितीचे स्रोत असतो याचे भान ठेवणे आवश्यक आहे. अभ्यासपूर्ण लिखाण व विवेचन कमीकमी होत चालले की काय अशी परिस्थिती आहे.’’ प्रास्ताविक उल्हास पवार यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. सतीश देसाई यांनी केले. (प्रतिनिधी)बापट म्हणाले, पत्रकारांनी समाजाचे प्रबोधन करण्यासोबतच शासन आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम केले पाहिजे. पत्रकारिता हे समाजाला दिशा देणारे क्षेत्र असल्याने त्यांनी निर्भीडपणे लिखाण करावे. वाचन, अभ्यास, दांडगा संपर्क हे भिडे यांचे वैशिष्ट्य होते. पत्रकारांच्या पेन्शन आणि आरोग्याचाही प्रश्न महत्त्वाचा आहे. अलीकडच्या काळात काही पत्रकारांची भीती वाटते. त्यांना भेटलो नाही, जाहिरात दिली नाही की काहीतरी विरोधात छापून येण्याची भीती सतत असते. पूर्वी पत्रकारांना संपादकांचा दर्जा होता. पत्रकारांचे व्यावसायिक हेतू असतील तर सामाजिक आशय बातम्यांमधून उमटत नाही.’