शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

व्यवस्थेवर अंकुश ठेवणे हे पत्रकारांचे मुख्य काम

By admin | Updated: May 1, 2017 03:14 IST

सध्या ट्रोलिंगद्वारे सोशल मीडियावर खोटी माहिती खरी म्हणून पसरवली जाते आहे. यामध्ये कॉर्पोरेट्स, राजकारणी, सरकारद्वारे

पुणे : सध्या ट्रोलिंगद्वारे सोशल मीडियावर खोटी माहिती खरी म्हणून पसरवली जाते आहे. यामध्ये कॉर्पोरेट्स, राजकारणी, सरकारद्वारे हे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे पत्रकारांचे मुख्य काम हे सरकारी व्यवस्थेवर लक्ष ठेवणे आणि अन्यायाला वाचा फोडणे हे आहे. घटनांच्या पार्श्वभूमीवर मांडणी करताना आपली माध्यम म्हणून तेवढी क्षमता आहे याचा विचार करावा. तंत्रज्ञानामुळे माणसांसह शासन व्यवस्था बदलली आहे; परंतु पत्रकारांना बदलता आलेले नाही असे मत ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी व्यक्त केले. पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, उल्हास पवार, वि. अ. जोशी, विकास वाळुंजकर उपस्थित होते. दामले व बापट यांच्या हस्ते ‘लोकमत’चे संदीप प्रधान यांना मुख्य पुरस्कार देण्यात आला. तर शंतनू डोईफोडे, ज्ञानेश्वर बिजले, नम्रता वागळे यांना आश्वासक पत्रकारितेचा पुरस्कार देण्यात आला. दामले म्हणाले, ‘‘जशा वस्तू आणि सेवांचा सुकाळ झाला तस तसे पत्रकारिता बदलत गेली आहे. दूरदर्शनमुळे दृकश्राव्य माध्यमांना महत्त्व आले आहे. त्याचा भारतात मोठा परिणाम झाला आहे. ते मुद्रित पत्रकारितेचं पुढचं स्वरूप आहे. लोकांसमोर बातमी देण्याची घाई असल्याने सखोल माहिती देता येत नाही. पत्रकारांनी व्यवसायाशी एकनिष्ठता जपत वाचन वाढवले पाहिजे. आमिषांपासून दूर असावे. आपण खऱ्या अर्थाने माहितीचे स्रोत असतो याचे भान ठेवणे आवश्यक आहे. अभ्यासपूर्ण लिखाण व विवेचन कमीकमी होत चालले की काय अशी परिस्थिती आहे.’’ प्रास्ताविक उल्हास पवार यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. सतीश देसाई यांनी केले. (प्रतिनिधी)बापट म्हणाले, पत्रकारांनी समाजाचे प्रबोधन करण्यासोबतच शासन आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम केले पाहिजे. पत्रकारिता हे समाजाला दिशा देणारे क्षेत्र असल्याने त्यांनी निर्भीडपणे लिखाण करावे. वाचन, अभ्यास, दांडगा संपर्क हे भिडे यांचे वैशिष्ट्य होते. पत्रकारांच्या पेन्शन आणि आरोग्याचाही प्रश्न महत्त्वाचा आहे. अलीकडच्या काळात काही पत्रकारांची भीती वाटते. त्यांना भेटलो नाही, जाहिरात दिली नाही की काहीतरी विरोधात छापून येण्याची भीती सतत असते. पूर्वी पत्रकारांना संपादकांचा दर्जा होता. पत्रकारांचे व्यावसायिक हेतू असतील तर सामाजिक आशय बातम्यांमधून उमटत नाही.’