शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

स्थलांतरित विद्यार्थ्यांना आणणार मुख्य प्रवाहात

By admin | Updated: October 5, 2015 03:40 IST

ऊसतोडणी कामगाराच्या विजय या मुलाचे इयत्ता पाचवीचे शिक्षण सुरू असतानाच कुटुंबाने सोलापुरातून सांगलीत स्थलांतर केले. विजयचे शिक्षणमध्येच थांबले...

संदीप प्रधान, मुंबईऊसतोडणी कामगाराच्या विजय या मुलाचे इयत्ता पाचवीचे शिक्षण सुरू असतानाच कुटुंबाने सोलापुरातून सांगलीत स्थलांतर केले. विजयचे शिक्षणमध्येच थांबले... वीटभट्टीत दिवसरात्र राबणाऱ्या कुटुंबातील सुमन चौथीत असताना कुटुंबाने पोटापाण्याकरिता शहराकडे जाण्याचा निर्णय घेतला. सुमनची शिक्षणाची हौस तेथेच संपली... अशा सुमारे ७० हजार स्थलांतरित मुला-मुलींचे शिक्षण मध्येच थांबू नये याकरिता त्यांना ‘शिक्षण हमीपत्र’ देऊन त्यांचे सॉफ्टवेअरद्वारे ट्रॅकिंग करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची योजना अंमलात येऊ घातली आहे.शिक्षण हक्क कायद्यात स्थलांतरितांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडण्याचा मोठा अडसर असल्याने ऊसतोडणी कामगार, वीजभट्टी कामगार, दगड-खाण कामगार, बांधकाम मजूर अशा किमान आठ प्रकारच्या मोलमजुरीकरिता पाठीवर बिऱ्हाड घेऊन फिरणाऱ्यांच्या मुलांचे सरकारने सर्वेक्षण केले. अशा कुटुंबातील शाळेत जाण्यायोग्य मुला-मुलींची संख्या ७० हजारांच्या घरात आहे. स्थलांतरित मुलांची नोंदणी करून त्यांना ‘शिक्षण हमीपत्र’ देण्यात येणार आहे. ज्याची नोंद सरकारकडील एका सॉफ्टवेअरवर असेल. एखाद्या विद्यार्थी-विद्यार्थिनीच्या पालकांनी स्थलांतर केले व त्याचे शिक्षण थांबले तर लागलीच ते ज्या शाळेत जात होते त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी तशी नोंदणी करून सरकारला माहिती द्यायची आहे. विशिष्ट विद्यार्थी अथवा विद्यार्थिनी कुठे स्थलांतरित झाली ते ट्रॅकिंगद्वारे शोधून काढले जाईल. असा स्थलांतरित विद्यार्थी पुन्हा शाळेत आणणे ही तो वास्तव्य करीत असलेल्या ठिकाणी असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकाची जबाबदारी असेल. त्या विद्यार्थ्याचे पालक ज्या कंत्राटदाराकडे काम करीत असतील त्याचा क्रमांक मुख्याध्यापकांना देऊन विद्यार्थ्याला शाळेत आणण्याकरिता प्रयत्न केले जातील, अशी माहिती राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी दिली.अनेकदा स्थलांतर करताना अशी कागदपत्रे या कुटुंबाकडून गहाळ झाल्याने त्यांच्या मुलांना शाळेत पुढील इयत्तेत प्रवेश मिळत नव्हता. शिक्षण हमीपत्र दिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती संगणकात नोंदली गेलेली असल्याने राज्यात कुठेही बसून त्याची पडताळणी करता येणार आहे.