शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

शेतकऱ्यांसह ग्रामीण विकास हाच शासनाचा मुख्य अजेंडा- फडणवीस

By admin | Updated: July 3, 2017 22:28 IST

विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदलण्याची सुरुवात झाली आहे.

ऑनलाइन लोकमतपंढरपूर दि. 3 - विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदलण्याची सुरुवात झाली आहे. हागणदारीमुक्तीत महाराष्ट्र देशात अव्वल असून, शेतकऱ्यांसह ग्रामीण विकास हाच शासनाचा मुख्य अजेंडा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. स्वच्छता दिंडी 2017चा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. यानिमित्त येथील पंचायत समितीच्या आवारात आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्वच्छता दिंडीचा गेल्या बारा वर्षांपासून सुंदर उपक्रम सुरू आहे. या दिंडीच्या माध्यमातून राज्यभरातील वारकऱ्यांच्यात जनजागृती होते. या स्वच्छता दिंडीत सहभागी असणाऱ्या कलाकारांचे काम प्रभावी आहे. दिंडीचा उपक्रम स्तुत्य असून याची व्याप्ती वाढण्याची आवश्यकता आहे. या माध्यमातून गावोगावी जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जावेत. पंढरपूर तालुका हागणदारीमुक्त झाल्याचा विशेष आनंद आहे. निर्मलता आणि स्वच्छतेच्या ठिकाणीच ईश्वराचा वास असतो. त्यामुळे स्वच्छतेचे काम महत्वाचे आहे. भविष्यात पालखी सोहळ्यातील विसाव्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी स्वच्छतागृहे उभारण्याचा सरकारचा मानस आहे. हागणदारी मुक्तीत राज्याची उत्तम काम झाले असून महाराष्ट्र देशात अव्वल आहे. स्वच्छ भारत करण्याचे प्रधानमंत्री मोदींचे स्वप्न या माध्यमातून पूर्ण होत आहे.शौचालय निर्मिती हे रोजगार निर्मितीचेही साधन आहे. गेल्या दोन वर्षात राज्यातील ११ जिल्हे, १५५ तालुके आणि १६ हजार ९४५ ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्या आहेत. शौचालयाच्या निर्मितीमुळे संबंधित कुटुंबांचा आरोग्यावरील मोठा खर्च कमी होतो. गेल्या दोन वर्षात ४० लाख नवीन शौचालये राज्यात बांधण्यात आली आहेत. या बरोबरच आपल्याला प्रधानमंत्र्यांचे भारत बेघर मुक्त करण्याचे स्वप्न साकारायचे आहे. त्यासाठी सर्वांनी तयार राहणायचे आवाहन देवेंद्र फडणवीस यावेळी केले. बबनराव लोणीकर म्हणाले, २०१८ पर्यंत महाराष्ट्र हागणदारी मुक्त करण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्यासाठी शासनच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत देशात अव्वल असणारा महाराष्ट्र आपल्याला कायमच अग्रेसर ठेवायचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी विजयकुमार देशमुख, सदाभाऊ खोत यांची भाषणे झाली. स्वच्छता दिंडीत प्रबोधनाचे काम करणाऱ्या कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शौचालयाच्या आदर्श प्रतिकृतीचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.