शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

शेतकऱ्यांसह ग्रामीण विकास हाच शासनाचा मुख्य अजेंडा- फडणवीस

By admin | Updated: July 3, 2017 22:28 IST

विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदलण्याची सुरुवात झाली आहे.

ऑनलाइन लोकमतपंढरपूर दि. 3 - विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदलण्याची सुरुवात झाली आहे. हागणदारीमुक्तीत महाराष्ट्र देशात अव्वल असून, शेतकऱ्यांसह ग्रामीण विकास हाच शासनाचा मुख्य अजेंडा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. स्वच्छता दिंडी 2017चा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. यानिमित्त येथील पंचायत समितीच्या आवारात आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्वच्छता दिंडीचा गेल्या बारा वर्षांपासून सुंदर उपक्रम सुरू आहे. या दिंडीच्या माध्यमातून राज्यभरातील वारकऱ्यांच्यात जनजागृती होते. या स्वच्छता दिंडीत सहभागी असणाऱ्या कलाकारांचे काम प्रभावी आहे. दिंडीचा उपक्रम स्तुत्य असून याची व्याप्ती वाढण्याची आवश्यकता आहे. या माध्यमातून गावोगावी जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जावेत. पंढरपूर तालुका हागणदारीमुक्त झाल्याचा विशेष आनंद आहे. निर्मलता आणि स्वच्छतेच्या ठिकाणीच ईश्वराचा वास असतो. त्यामुळे स्वच्छतेचे काम महत्वाचे आहे. भविष्यात पालखी सोहळ्यातील विसाव्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी स्वच्छतागृहे उभारण्याचा सरकारचा मानस आहे. हागणदारी मुक्तीत राज्याची उत्तम काम झाले असून महाराष्ट्र देशात अव्वल आहे. स्वच्छ भारत करण्याचे प्रधानमंत्री मोदींचे स्वप्न या माध्यमातून पूर्ण होत आहे.शौचालय निर्मिती हे रोजगार निर्मितीचेही साधन आहे. गेल्या दोन वर्षात राज्यातील ११ जिल्हे, १५५ तालुके आणि १६ हजार ९४५ ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्या आहेत. शौचालयाच्या निर्मितीमुळे संबंधित कुटुंबांचा आरोग्यावरील मोठा खर्च कमी होतो. गेल्या दोन वर्षात ४० लाख नवीन शौचालये राज्यात बांधण्यात आली आहेत. या बरोबरच आपल्याला प्रधानमंत्र्यांचे भारत बेघर मुक्त करण्याचे स्वप्न साकारायचे आहे. त्यासाठी सर्वांनी तयार राहणायचे आवाहन देवेंद्र फडणवीस यावेळी केले. बबनराव लोणीकर म्हणाले, २०१८ पर्यंत महाराष्ट्र हागणदारी मुक्त करण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्यासाठी शासनच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत देशात अव्वल असणारा महाराष्ट्र आपल्याला कायमच अग्रेसर ठेवायचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी विजयकुमार देशमुख, सदाभाऊ खोत यांची भाषणे झाली. स्वच्छता दिंडीत प्रबोधनाचे काम करणाऱ्या कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शौचालयाच्या आदर्श प्रतिकृतीचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.