पेण : पेण तालुक्यातील वीज ग्राहक महावितरणचा गलथान कारभारामुळे नाराज आहेत. पेण शहरातील चिचेपाडा येथील विजेचा खांब टेम्पोवर कोसळला. सुदैवाने अपघातात कोणी जखमी झाले नसले तरी परिसरातील अनेक वीज खांब जीर्ण झाले असून कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. पेण शहरातील जांभळे क्लासेस जवळील विजेचा पोल धोकादायक स्थितीत असल्याबाबतची तक्रार नागरिकांनी महावितरणकडे केली होती. गेल्या महिन्यापूर्वी पेणचे आ. धैर्यशील पाटील यांनी महावितरणची आढावा बैठक घेतली असताना त्यावेळेस या अधिकारीवर्गाची कानउघाडणी केली होती.पेण शहर आणि ग्रामीण परिसरातील फिडरबाबत अधिकारीवर्गाला ही कामे तातडीने मार्गी लावण्यास सांगितले होते. >अधिकाऱ्यांची टाळाटाळपेण परिसरात अनेक ठिकाणचे ट्रान्सफॉर्मरची अवस्था दयनीय झाली आहे. याठिकाणी असलेल्या केबल्सही जीर्ण झाल्या आहेत. वीज गेल्यावर ग्राहकांनी तक्रार केल्यास पेट्रोलिंग चालू असल्याचे टाळाटाळीचे उत्तर अधिकारी वर्गाकडून देण्यात येते.
महावितरणच्या गलथान कारभाराने ग्राहक हैराण
By admin | Updated: July 1, 2016 03:00 IST