शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

‘महावितरण’ने केंद्रीय, खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी करावी

By admin | Updated: December 9, 2014 00:55 IST

प्रताप होगाडे : महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेची मागणी

इचलकरंजी : महावितरण कंपनीच्यावतीने पुरविण्यात येणाऱ्या विजेच्या दरवाढीचा २६१५ कोटी रुपयांचा फटका वीज ग्राहकांना बसणार आहे. महानिर्मितीकडे असलेल्या औष्णिक केंद्रातील वीज घेतल्यामुळे पाच हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडत आहे. परिणामी, महानिर्मितीकडील वीज खरेदी बंद करावी. तसेच केंद्रीय क्षेत्र व खासगी कंपन्यांकडून मिळणारी स्वस्ताची वीज खरेदी करावी, अशी मागणी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी ऊर्जा आयोगाकडे केली आहे.महानिर्मितीचा अकार्यक्षम कारभार व कोळसा खरेदीमध्ये असलेला भ्रष्टाचार यामुळेच वाढीव उत्पादन खर्च पडत आहे. सन २०१२-१३ मध्ये केंद्रीय क्षेत्राचा सरासरी सौरयंत्र भारांक ७९.१८ होता, तर याच काळात महानिर्मितीचा भारांक ५८.१० होता. सन २०१३-१४ मध्ये केंद्राचा भारांक ७६.१८ इतका, तर महानिर्मितीचा भारांक ५१.७० होता. वीज उत्पादन कमी, तेवढा दर जास्त. त्यामुळेच खासगी आणि सार्वजनिक औष्णिक पुरवठादारापेक्षा महानिर्मितीची औष्णिक वीज सरासरी १ रुपये २५ पैसे प्रतियुनिट दराने महाग पडत आहे. त्याचा दरवर्षी पाच हजार कोटी रुपयांचा बोजा राज्यातील वीज ग्राहकांवर पडत आहे.सन २०१२-१३ मध्ये महानिर्मितीने दाखविलेला प्रकल्पनिहाय वीज उत्पादनाचा खर्च प्रतियुनिट पुढीलप्रमाणे : चंद्रपूर - ३ रुपये ०३ पैसे, खापरखेडा - ३.९७ रुपये, परळी - ४.३७ रुपये, पारस - ३.३८ रुपये, भुसावळ - ४.७५ रुपये, कोराडी - ५.१३ रुपये, नाशिक - ५.६२ रुपये. या सर्व उत्पादनाची सरासरी ४.२० रुपये प्रतियुनिट अशी आहे. राष्ट्रीय औष्णिक वीज मंडळाकडील वीज २.४७ रुपये प्रतियुनिट इतकी आहे. याचा अर्थ महानिर्मितीची वीज महाग आहे.तसेच चालू वर्षीसुद्धा सन २०१३-१४ साली महानिर्मितीचा औष्णिक वीज दर सरासरी ४ रुपये २० पैसे प्रतियुनिटपेक्षा अधिक राहील; पण केंद्रीय क्षेत्राचा दर २ रुपये ८० पैसे, जिंदाल ३ रुपये ४९ पैसे, अदानी २ रुपये ५५ पैसे, मुंद्रा २ रुपये ६२ पैसे, इंडिया बुल्स ३ रुपये ३० पैसे, एम्को एनर्जी २ रुपये ९९ पैसे असा आहे. त्यामुळे महावितरणने महानिर्मितीपेक्षा स्वस्त मिळणारी केंद्रीय किंवा खासगी क्षेत्रातील वीज खरेदी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.