शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

आदिवासींचा महावितरणवर मोर्चा

By admin | Updated: May 17, 2016 04:04 IST

पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्यांवर अद्यापही वीज पोहोचलेली नाही. ज्या ठिकाणी वीजजोडणी करण्यात आली आहे

कळंबोली : पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्यांवर अद्यापही वीज पोहोचलेली नाही. ज्या ठिकाणी वीजजोडणी करण्यात आली आहे, तिथे वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, भरमसाट वीज बिल आदी समस्यांमुळे आदिवासी त्रस्त आहेत. याविरोधात सोमवारी श्रमजीवी संघटनेने महावितरणच्या भिंगारी कार्यालयावर मोर्चा काढून असंतोष व्यक्त केला. यावेळी संघटनेच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी वाड्या - पाडे आहेत. बहुंताशी ठिकाणी आजही वीज पोहचली नसल्याने आदिवासी अंधारात चाचपडत आहेत. वारंवार मागणी करूनही त्यांना वीजजोडणी दिली जात नसल्याचा आरोप आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ज्या वाड्यांमध्ये वीज पोहोचली आहे, तिथे वारंवार भारनियमन करण्यात येत असल्याने वीज असून नसल्यासारखी आहे. असे असले तरी त्यांना बिले मात्र वाढीव व भरमसाट पाठविले जात असल्याच्या अनेक तक्र ारी आहेत. वाढीव वीज बिल न भरल्यास, लागलीच वीज पुरवठा खंडित केला जात असल्याचेही आदिवासींचे म्हणणे आहे. मौजे निताळी येथील खानचा बंगला या कातकरी वाडीकरिता वीजपुरवठा योजना २०१४ मध्येच मंजुरी झाली आहे. मात्र अद्यापही या ठिकाणी वीज पोहचलेली नाही. या संदर्भात गेल्या वर्षी १९ फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी लवकरच काम सुरू करून ते पूर्ण करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले होते. हे आश्वासन हवेतच विरले असून अद्यापही वाडीवर दिवे लागले नाहीत. आदिवासी वाडीवर जर मीटर रिडिंग घेवून वीजबिल पाठवले जात असेल तर अवास्तव वीज बिल येते कसे, असा प्रश्न आदिवासींनी उपस्थित केला असून वाढीव बिल कमी न करता वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे आहे. जास्त बिल कमी करून त्यांना वीज बिल भरण्याकरिता मुदतद्यावी, नवीन मीटर बसविण्याकरिता कमी शुल्क आकारले जावे, अशी मागणी सोमवारी मोर्चेकऱ्यांनी केली. संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संजय गुरव, तालुकाध्यक्ष भीमा गोसावी, तालुका संघटक जानू कातकरी, योगिता दुर्गे, कचरू कातकरी, बाया कातकरी यांच्याशी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. (वार्ताहर)