शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचा महावितरणवर मोर्चा

By admin | Updated: May 17, 2016 04:04 IST

पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्यांवर अद्यापही वीज पोहोचलेली नाही. ज्या ठिकाणी वीजजोडणी करण्यात आली आहे

कळंबोली : पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्यांवर अद्यापही वीज पोहोचलेली नाही. ज्या ठिकाणी वीजजोडणी करण्यात आली आहे, तिथे वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, भरमसाट वीज बिल आदी समस्यांमुळे आदिवासी त्रस्त आहेत. याविरोधात सोमवारी श्रमजीवी संघटनेने महावितरणच्या भिंगारी कार्यालयावर मोर्चा काढून असंतोष व्यक्त केला. यावेळी संघटनेच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी वाड्या - पाडे आहेत. बहुंताशी ठिकाणी आजही वीज पोहचली नसल्याने आदिवासी अंधारात चाचपडत आहेत. वारंवार मागणी करूनही त्यांना वीजजोडणी दिली जात नसल्याचा आरोप आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ज्या वाड्यांमध्ये वीज पोहोचली आहे, तिथे वारंवार भारनियमन करण्यात येत असल्याने वीज असून नसल्यासारखी आहे. असे असले तरी त्यांना बिले मात्र वाढीव व भरमसाट पाठविले जात असल्याच्या अनेक तक्र ारी आहेत. वाढीव वीज बिल न भरल्यास, लागलीच वीज पुरवठा खंडित केला जात असल्याचेही आदिवासींचे म्हणणे आहे. मौजे निताळी येथील खानचा बंगला या कातकरी वाडीकरिता वीजपुरवठा योजना २०१४ मध्येच मंजुरी झाली आहे. मात्र अद्यापही या ठिकाणी वीज पोहचलेली नाही. या संदर्भात गेल्या वर्षी १९ फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी लवकरच काम सुरू करून ते पूर्ण करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले होते. हे आश्वासन हवेतच विरले असून अद्यापही वाडीवर दिवे लागले नाहीत. आदिवासी वाडीवर जर मीटर रिडिंग घेवून वीजबिल पाठवले जात असेल तर अवास्तव वीज बिल येते कसे, असा प्रश्न आदिवासींनी उपस्थित केला असून वाढीव बिल कमी न करता वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे आहे. जास्त बिल कमी करून त्यांना वीज बिल भरण्याकरिता मुदतद्यावी, नवीन मीटर बसविण्याकरिता कमी शुल्क आकारले जावे, अशी मागणी सोमवारी मोर्चेकऱ्यांनी केली. संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संजय गुरव, तालुकाध्यक्ष भीमा गोसावी, तालुका संघटक जानू कातकरी, योगिता दुर्गे, कचरू कातकरी, बाया कातकरी यांच्याशी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. (वार्ताहर)