शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळाच्या कामात महासंघाचा हस्तक्षेप!

By admin | Updated: May 24, 2016 03:24 IST

विधिमंडळाच्या सभागृहात चार अधिकाऱ्यांचे झालेले निलंबन आधी मागे घ्या, नंतर जी काय चौकशी करायची ती करा, अशी आडमुठी भूमिका राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने घेतली आहे.

- अतुल कुलकर्णी,  मुंबईविधिमंडळाच्या सभागृहात चार अधिकाऱ्यांचे झालेले निलंबन आधी मागे घ्या, नंतर जी काय चौकशी करायची ती करा, अशी आडमुठी भूमिका राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने घेतली आहे. यामुळे विधिमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप झाल्याची तीव्र भावना विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केल्याने विधिमंडळापेक्षा महासंघ मोठा आहे का? असा सवाल केला आहे. या प्रकारामुळे मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली असून मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावरच हे प्रश्नचिन्ह असल्याचे मतही त्या अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ‘पगारात भागवा’ असे रास्त अभियान चालवणाऱ्या महासंघानेच भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असणाऱ्या अधिकाऱ्यांची पाठराखण केल्यामुळे महासंघाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.लोकमतने २९७ कोटींचा औषध खरेदी घोटाळा उघडकीस आणला होता. त्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषदेत सखोल चर्चा केली, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक ज्येष्ठ सदस्यांनी औषध खरेदीच्या गैरव्यवहाराचे पुरावे सभागृहात सादर केले आणि त्याच्या आधारेच चार अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली होती. ही घोषणा होण्याआधी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागाचे सचिव, मुख्य सचिव यांच्याशी चर्चा करुन या विषयाची फाईल तयार करण्याचे आदेश दिले व निलंबनाचे आदेश दिले होते. महासंघाने मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय यांना एक पत्र दिले आहे. त्यात, आरोग्य संचालकांसह चार अधिकाऱ्यांचे निलंबन तात्काळ मागे घ्यावे व डॉ. भगवान सहाय यांच्या समितीला जी काही चौकशी करायची आहे ती नंतर करावी अशी मागणी केली आहे. शिवाय अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. भगवान सहाय यांनी अद्याप चौकशी सुरु केलेली नाही असा दावाही केला आहे. त्यामुळे सहाय यांच्यावरही महासंघाने हेत्वारोप केल्याची आयएएस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वास्तविक डॉ. सहाय यांना चौकशी समितीसाठी म्हणून आरोग्य विभागाने लायझनिंग आॅफीसर म्हणून एक अधिकारी देऊ केले आहेत. त्यांच्याकडे कागदपत्रे पोहोचविण्यात आली आहेत, चौकशीची प्रक्रिया सुरु असताना हे पत्र दिले गेल्याने केवळ विधीमंडळाच्या कामातच नाही तर चौकशी प्रक्रियेतही हस्तक्षेप झाल्याचे वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचे मत आहे.विधिमंडळात एकदा चर्चा झाल्यानंतर, संबंधीत विभागाच्या मंत्र्यांनी सभागृहात निर्णय जाहीर केला, चौकशी सुरु झाली, अशावेळी महासंघ जर अशी भूमिका घेत असेल तर ते चुकीचेच नव्हे तर विधीमंडळाच्या सर्व सदस्यांवर अविश्वास दाखवणे आहे. महासंघाने अनेक गोष्टीत कायम विधायक भूमिका घेतल्या आहेत, त्यामुळे ही भूमिका महासंघाचीच आहे की नाही असे वाटते. त्यामुळे या मागचे बोलवते धनी कोण हे देखील आता चौकशी समितीने शोधायला हवे.- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेतेआपण भेटून बोलू... आम्ही पत्र दिले हे खरे आहे पण चौकशी केल्याशिवाय निलंबन करु नये एवढीच आमची मागणी होती, त्यापेक्षा यात काहीही नाही, तरीही अधिक माहिती घेऊन सांगतो, आपण भेटून बोलू...- मनोहर पोकळे, अध्यक्ष, महासंघ