शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
3
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
4
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
5
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
6
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
7
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
8
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
9
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
10
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
11
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
12
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
13
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
14
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
15
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
16
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
17
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
18
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
19
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
20
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप

महाराष्ट्राचे पाणी गुजरातला नको

By admin | Updated: March 11, 2015 02:29 IST

दमणगंगा-पिंजाळ लिंक व पार-तापी-नर्मदा लिंक या दोन नद्या जोड प्रकल्पांतर्गत महाराष्ट्राचे पाणी गुजरातला वळवण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबई : दमणगंगा-पिंजाळ लिंक व पार-तापी-नर्मदा लिंक या दोन नद्या जोड प्रकल्पांतर्गत महाराष्ट्राचे पाणी गुजरातला वळवण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाविरोधात जलचिंतन संस्थेने मंगळवारपासून आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी शेतकरी कामगार पक्षाने उपोषणास पाठिंबा देत २० मार्चपासून जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.दमणगंगा-पिंजाळ लिंक प्रकल्पाच्या माध्यमातून ३६ टीएमसी आणि पार-तापी-नर्मदा लिंक प्रकल्पाच्या माध्यमातून ३० टीएमसी पाणी गुजरातला देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केला आहे. जाधव यांच्या म्हणण्यानुसार, या दोन्ही लिंक प्रकल्पास राज्य सरकारने सहमती देण्यासाठी केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी ७ जानेवारीला मुंबईत एक बैठक घेतली होती. त्यानंतर १६ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी पत्राद्वारे राज्याचे पाणी गुजरातला देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र या दोन्ही प्रकल्पांमुळे जितका गुजरातला जितका फायदा होईल तितकाच महाराष्ट्राला तोटा होणार असल्याचा दावा संस्थेने केला आहे. सध्या गुजरातची सिंचन क्षमता ४५ टक्क्यांवर पोहोचली असून, राज्याची सिंचन क्षमता केवळ १८ टक्के इतकी आहे. अशा परिस्थितीत राज्याला या पाण्याची अधिक गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पार-तापी-नर्मदा प्रकल्पामुळे कारण कसमादे परिसर, गिरणा धरणावर अवलंबून असलेला जळगाव जिल्हा, नाशिक जिल्ह्यातील चांदवड, येवला, मनमाड, नांदगाव या दुष्काळी भागाला पाणी मिळणार नाही, शिवाय गोदावरी खोरे हे तुटीचे आहे. दमणगंगा-गोदावरी लिंक प्रकल्प राबवला तर नाशिक, नगर, मराठवाडा हे पाणीयुद्ध थांबेल. तर दमणगंगा-पिंजाळ लिंक प्रकल्प राबवल्यास दमणगंगेवरच्या शिल्लक पाण्यावरील राज्याचा हक्क गमवावा लागेल. त्यामुळे राज्याला या खोऱ्यात एखादा प्रकल्प राबवायचा असेल, तर केंद्रीय जल आयोगाच्या परवानगीवर अवलंंबून राहावे लागेल. शेकापचे आमदार जयंत पाटील, धैर्यशील पाटील आणि पंडित पाटील यांनी पाठिंबा दिला. राज्यात जनआंदोलन उभारून प्रकल्पाला विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)