शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

महाराष्ट्राचे पाणी गुजरातला नको

By admin | Updated: March 11, 2015 02:29 IST

दमणगंगा-पिंजाळ लिंक व पार-तापी-नर्मदा लिंक या दोन नद्या जोड प्रकल्पांतर्गत महाराष्ट्राचे पाणी गुजरातला वळवण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबई : दमणगंगा-पिंजाळ लिंक व पार-तापी-नर्मदा लिंक या दोन नद्या जोड प्रकल्पांतर्गत महाराष्ट्राचे पाणी गुजरातला वळवण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाविरोधात जलचिंतन संस्थेने मंगळवारपासून आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी शेतकरी कामगार पक्षाने उपोषणास पाठिंबा देत २० मार्चपासून जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.दमणगंगा-पिंजाळ लिंक प्रकल्पाच्या माध्यमातून ३६ टीएमसी आणि पार-तापी-नर्मदा लिंक प्रकल्पाच्या माध्यमातून ३० टीएमसी पाणी गुजरातला देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केला आहे. जाधव यांच्या म्हणण्यानुसार, या दोन्ही लिंक प्रकल्पास राज्य सरकारने सहमती देण्यासाठी केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी ७ जानेवारीला मुंबईत एक बैठक घेतली होती. त्यानंतर १६ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी पत्राद्वारे राज्याचे पाणी गुजरातला देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र या दोन्ही प्रकल्पांमुळे जितका गुजरातला जितका फायदा होईल तितकाच महाराष्ट्राला तोटा होणार असल्याचा दावा संस्थेने केला आहे. सध्या गुजरातची सिंचन क्षमता ४५ टक्क्यांवर पोहोचली असून, राज्याची सिंचन क्षमता केवळ १८ टक्के इतकी आहे. अशा परिस्थितीत राज्याला या पाण्याची अधिक गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पार-तापी-नर्मदा प्रकल्पामुळे कारण कसमादे परिसर, गिरणा धरणावर अवलंबून असलेला जळगाव जिल्हा, नाशिक जिल्ह्यातील चांदवड, येवला, मनमाड, नांदगाव या दुष्काळी भागाला पाणी मिळणार नाही, शिवाय गोदावरी खोरे हे तुटीचे आहे. दमणगंगा-गोदावरी लिंक प्रकल्प राबवला तर नाशिक, नगर, मराठवाडा हे पाणीयुद्ध थांबेल. तर दमणगंगा-पिंजाळ लिंक प्रकल्प राबवल्यास दमणगंगेवरच्या शिल्लक पाण्यावरील राज्याचा हक्क गमवावा लागेल. त्यामुळे राज्याला या खोऱ्यात एखादा प्रकल्प राबवायचा असेल, तर केंद्रीय जल आयोगाच्या परवानगीवर अवलंंबून राहावे लागेल. शेकापचे आमदार जयंत पाटील, धैर्यशील पाटील आणि पंडित पाटील यांनी पाठिंबा दिला. राज्यात जनआंदोलन उभारून प्रकल्पाला विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)