शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

महाराष्ट्राच्या वारकरी शिक्षण संस्थेने गाठली शंभरी!

By admin | Updated: March 19, 2017 02:16 IST

शताब्दी सोहळा: आळंदीकडे भाविकांची ओढ

ब्रह्मनंद जाधवबुलडाणा, दि. १८- श्रीक्षेत्र आळंदी येथे जोग महाराज यांच्याद्वारे संस्थापित महाराष्ट्र राज्य वारकरी शिक्षण संस्थेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त वारकरी सांप्रदायाच्यावतीने २२ ते २९ मार्च रोजी होणार्‍या शताब्दी सोहळ्यासाठी आळंदीला राज्याच्या कानाकोपर्‍यातून भाविकांचा ओढा वाढणार असून, समाजप्रबोधनाचे कार्य करणारे राज्यभरातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक मंडळी या सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती मूळचे बुलडाणा जिल्हय़ातील असणारे महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज जंवजाळ यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली. महाराष्ट्रातील संतांचे विचार समाजात रुजविण्यासाठी तसेच कीर्तन, प्रवचन, गायक व वादक घडविण्यासाठी संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्रीक्षेत्र आळंदी येथे जोग महाराज यांनी महाराष्ट्र राज्य वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. समाजाकडून संचालित, सक्रिय अनौपचारिक संत साहित्याची शिकवण देणारी संस्था म्हणजे वारकरी शिक्षण संस्था. महाराष्ट्र राज्य वारकरी शिक्षण संस्थेला १00 वर्ष पूर्ण झाले आहेत. यादरम्यान या वारकरी शिक्षण संस्थेने महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाला कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक व वारकरी मंडळी तयार करून दिले. महाराष्ट्र राज्य वारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव श्रीक्षेत्र आळंदी येथे २२ ते २९ मार्चला आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पहिली वारकरी शिक्षण संस्थाविष्णुबुवा जोग महाराज यांनी मारुतीबुवा गुरव आणि मारुतीबुवा ठोंबरे यांच्या आग्रहावरून चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा शके १८३९ म्हणजेच २४ मार्च १९१७ रोजी आळंदी देवाची येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराजवळ या वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. इ.स. १९१७ ते १९२0 या काळात विष्णुबुवा जोग हे या संस्थेचे अध्यक्ष होते. ही संस्था महाराष्ट्रातील पहिली वारकरी संस्था आहे. या संस्थेने आतापर्यंत हजारो कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक व वारकरी मंडळी घडविली. तसेच महाराष्ट्रातील खेडोपाडी शुद्ध वारकरी परंपरेचे भजन सुरू केले. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात कीर्तनकार, प्रवचनकार, गायक , वादक व वारकरी मंडळी घडविण्याचे कार्य महाराष्ट्र राज्य वारकरी शिक्षण संस्थेकडून गेल्या १00 वर्षांंपासून होत आहे. त्यानिमित्त आयोजित शताब्दी महोत्सवाला श्रीक्षेत्र आळंदी येथे वारकरी तसेच वारकरी सांप्रदायाप्रती जिव्हाळा असलेल्या सर्व भाविकांनी उपस्थित रहावे. - प्रकाश महाराज जवंजाळ, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ.