शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या वारकरी शिक्षण संस्थेने गाठली शंभरी!

By admin | Updated: March 19, 2017 02:16 IST

शताब्दी सोहळा: आळंदीकडे भाविकांची ओढ

ब्रह्मनंद जाधवबुलडाणा, दि. १८- श्रीक्षेत्र आळंदी येथे जोग महाराज यांच्याद्वारे संस्थापित महाराष्ट्र राज्य वारकरी शिक्षण संस्थेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त वारकरी सांप्रदायाच्यावतीने २२ ते २९ मार्च रोजी होणार्‍या शताब्दी सोहळ्यासाठी आळंदीला राज्याच्या कानाकोपर्‍यातून भाविकांचा ओढा वाढणार असून, समाजप्रबोधनाचे कार्य करणारे राज्यभरातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक मंडळी या सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती मूळचे बुलडाणा जिल्हय़ातील असणारे महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज जंवजाळ यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली. महाराष्ट्रातील संतांचे विचार समाजात रुजविण्यासाठी तसेच कीर्तन, प्रवचन, गायक व वादक घडविण्यासाठी संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्रीक्षेत्र आळंदी येथे जोग महाराज यांनी महाराष्ट्र राज्य वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. समाजाकडून संचालित, सक्रिय अनौपचारिक संत साहित्याची शिकवण देणारी संस्था म्हणजे वारकरी शिक्षण संस्था. महाराष्ट्र राज्य वारकरी शिक्षण संस्थेला १00 वर्ष पूर्ण झाले आहेत. यादरम्यान या वारकरी शिक्षण संस्थेने महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाला कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक व वारकरी मंडळी तयार करून दिले. महाराष्ट्र राज्य वारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव श्रीक्षेत्र आळंदी येथे २२ ते २९ मार्चला आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पहिली वारकरी शिक्षण संस्थाविष्णुबुवा जोग महाराज यांनी मारुतीबुवा गुरव आणि मारुतीबुवा ठोंबरे यांच्या आग्रहावरून चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा शके १८३९ म्हणजेच २४ मार्च १९१७ रोजी आळंदी देवाची येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराजवळ या वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. इ.स. १९१७ ते १९२0 या काळात विष्णुबुवा जोग हे या संस्थेचे अध्यक्ष होते. ही संस्था महाराष्ट्रातील पहिली वारकरी संस्था आहे. या संस्थेने आतापर्यंत हजारो कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक व वारकरी मंडळी घडविली. तसेच महाराष्ट्रातील खेडोपाडी शुद्ध वारकरी परंपरेचे भजन सुरू केले. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात कीर्तनकार, प्रवचनकार, गायक , वादक व वारकरी मंडळी घडविण्याचे कार्य महाराष्ट्र राज्य वारकरी शिक्षण संस्थेकडून गेल्या १00 वर्षांंपासून होत आहे. त्यानिमित्त आयोजित शताब्दी महोत्सवाला श्रीक्षेत्र आळंदी येथे वारकरी तसेच वारकरी सांप्रदायाप्रती जिव्हाळा असलेल्या सर्व भाविकांनी उपस्थित रहावे. - प्रकाश महाराज जवंजाळ, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ.