शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

कृष्णेच्या पाण्यावर महाराष्ट्राचाच हक्क

By admin | Updated: January 11, 2017 04:44 IST

कृष्णा नदीच्या पाणीवाटपाचे नव्याने वाटप करून महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी मिळावे

सांगली : कृष्णा नदीच्या पाणीवाटपाचे नव्याने वाटप करून महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी मिळावे, अशी याचिका तेलंगणा सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. सोमवारी ही याचिका फेटाळत महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे ६६६ टीएमसी (दशलक्ष घनफूट) पाणी कायम ठेवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. मूळ आंध्र प्रदेशच्या वाट्याला आलेल्या पाण्यातूनच आंध्र आणि तेलंगणा राज्याला पाण्याचे वाटप करण्याचा निर्णयही न्यायालयाने दिला.आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन आंध्र आणि तेलंगणा अशा दोन राज्यांची निर्मिती झाली आहे. त्यानंतर पुन्हा कृष्णा नदीतील पाणी वाटपाचा प्रश्न निर्माण झाला होता. तेलंगणा सरकारने महाराष्ट्राच्या वाट्यातील ६६६ टीएमसी पाण्यातून पाणी मिळावे, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती मदन लोकूर व प्रफुल्ल पंत यांच्या संयुक्त खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी महाराष्ट्र सरकारच्यावतीने अ‍ॅड. दीपक नारगोलकर यांनी बाजू मांडली.तेलंगणा व आंध्रप्रदेशच्या पाणीतंट्यात महाराष्ट्रासह कर्नाटकलाही ओढण्यात आले होते. आंध्र प्रदेशच्या फेररचनेनंतर २०१४ मध्ये आंध्र प्रदेश फेररचना कायदा अस्तित्वात आला आहे. तेलंगणाच्या निर्मितीनंतर पाणीवाटपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी एकत्रित आंध्र प्रदेशच्या वाट्याला आलेले १००५ टीएमसी पाणी दोन्ही राज्यांनी परस्परांमध्ये वाटून घ्यावे, असे राष्ट्रीय पाणीलवादाने स्पष्ट केले होते. तरीही तेलंगणा आणि आंध्रप्रदेशने महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी मिळावे, यासाठी लवादाकडे धाव घेतली होती. गतवर्षी आॅक्टोबरमध्ये लवादाचे राष्ट्रीय अध्यक्ष न्यायमूर्ती ब्रिजेश कुमार आणि सदस्य न्या. बी. पी. दास, न्या. राम मोहन रेड्डी यांनी दोन्ही राज्यांची मागणी फेटाळली होती. त्यानंतर या निर्णयाला तेलंगणाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. (प्रतिनिधी) पाण्याचे फेरवाटप करण्यास नकार तेलंगणा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांनी स्वतंत्रपणे युक्तिवाद केला. कलम ८९ च्या आंध्र प्रदेश राज्य निर्मिती कायदा २०१४ नुसार पाणी वाटपाचा दाखला देत खंडपीठाने महाराष्ट्र व कर्नाटकच्या पाण्याचे फेरवाटप करण्यास नकार दिला. तसेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी एकत्रित आंध्रच्या वाट्याचे १००५ टीएमसी पाणी आपसात वाटून घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.