शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

महाराष्ट्रातील प्राध्यापकांना पंजाबतर्फे ‘जी आया नू’

By admin | Updated: June 11, 2015 01:29 IST

मी तब्बल ३० वर्षांनंतर महाराष्ट्रात पुन्हा आलो आहे. या मराठी मातीचा काय गुण आहे कळत नाही, पण इथे आल्यानंतर मनाला फार मोठे समाधान मिळते.

संत नामदेव पुरस्काराच्या निमित्ताने महाराष्ट्रात आल्यानंतर कसे वाटते आहे?मी तब्बल ३० वर्षांनंतर महाराष्ट्रात पुन्हा आलो आहे. या मराठी मातीचा काय गुण आहे कळत नाही, पण इथे आल्यानंतर मनाला फार मोठे समाधान मिळते. यापूर्वीही मला असाच अनुभव आला होता. संत नामदेव अध्यात्माची पताका घेऊन पंजाबात आले, तर गुरू गोविंदसिंग महाराष्ट्रात नांदेड येथे आले होते. महाराष्ट्र आणि पंजाबचे हे नाते दृढ व्हावे, यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची इच्छा आहे.त्या दिशेने आपण काही पावले उचलली आहेत का?- पंजाबमधील विद्यापीठामध्ये संत नामदेव अध्यासन सुरू केले आहे. संत नामदेवांचा व संत साहित्याचा अभ्यास असणाऱ्या महाराष्ट्रातील प्राध्यापकांचे तिथे स्वागत आहे. महाराष्ट्रातून संत साहित्याच्या अभ्यासकांनी तिथे येऊन आमच्या विद्यार्थ्यांना शिकवावे. दोन्ही राज्यांमध्ये सांस्कृतिक, आध्यात्मिक आदानप्रदान व्हावे, असे मला वाटते. तुम्ही हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाला भेट दिलीत, त्यामागची भावना काय होती ?- भारतीय स्वातंत्र्ययुद्धात पंजाब व महाराष्ट्राचा फार मोठा वाटा आहे. राजगुरू, विष्णू गणेश पिंगळे ही क्रांतिकारक मंडळी पंजाबात आली होती. मी त्यांच्या वारसांना भेटलो. त्यांना स्वत:साठी काहीही नको. हुतात्मा झालेल्या आपल्या पूर्वजांचे नाव कायम राहावे, एवढेच त्यांना हवे आहे. सैन्य दलात शीख बांधव नेहमी आघाडीवर कसे असतात? - शिखांचा स्वभावच लढाऊ आहे. कोणत्याही लढाईत शीख नेहमीच संख्येने जास्त असतात, हा इतिहास आहे. स्वातंत्र्ययुद्धातही शिखांचा मोठा सहभाग होता. अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारेही शीखच जास्त. आम्हाला त्याचा अभिमान आहे.देशातील धार्मिक उन्मादाच्या वातावरणास भाजपाला जबाबदार धरले जात आहे; त्याविषयी तुम्ही काय सांगाल? - पंजाबातील भाजपाबरोबरची आमची युती ही राजकीय घटना आहे. सर्व धर्मांबाबत आम्हाला आदरच आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक भारतीयानेही दुसऱ्याच्या धर्माबाबत असाच आदर बाळगला पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे. पंजाबातील दहशतवादाची सद्य:स्थिती काय आहे?- पंजाबने खूप वाईट दिवस पाहिले आहेत. देशातील अशांत प्रांत म्हणून पंजाब ओळखला जात होता. त्या अस्थिरतेतून आता आम्ही बाहेर आलो आहोत. आज देशातील सर्वात शांत, सामाजिक सलोखा जपणारा व तितकाच समृद्ध प्रांत म्हणून पंजाब पुन्हा ओळखला जाऊ लागला आहे. प्रांतभेद आणि जातीय राजकारण संपवण्यासाठी काय करायला हवे?- देशातील संतांचे विचारच आपल्या देशाला तारू शकतात. गुरुवाणीनुसार आपले आचरण राहिले तर कसलेही वाद होणार नाहीत, भांडणे होणार नाहीत. परस्परांचा संवाद वाढवला पाहिजे. देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री ते आताचे देशातील सर्वात ज्येष्ठ मुख्यमंत्री असे दोन्ही विक्रम तुमच्या नावावर आहेत. इतक्या वर्षांच्या राजकीय कारकिर्दीबाबत काय वाटते?- काम करण्याची मला आवड आहे, मी ते करीत आलो आहे. देशातील राजकारणाची शैली बदलली आहे, मात्र तो काळाचा परिणाम आहे. काही गोष्टी आहेत, मात्र त्याविषयी आता बोलता येणार नाही. शरद पवार यांच्याबरोबरची मैत्री तर राजकारणाच्या पलीकडची आहे. राज ठाकरे यांची युवकांमध्ये क्रेझ आहे. त्यांना मी पंजाबला येण्याचे खास निमंत्रण दिले आहे.