शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

जयपूरमध्ये महाराष्ट्राचा दबदबा

By admin | Updated: November 18, 2016 05:22 IST

‘पिंक सिटी’ जयपूर येथे नुकताच झालेल्या चौथ्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत बलाढ्य महाराष्ट्राने आपला दबदबा राखला.

मुंबई : ‘पिंक सिटी’ जयपूर येथे नुकताच झालेल्या चौथ्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत बलाढ्य महाराष्ट्राने आपला दबदबा राखला. विशेष म्हणजे तिसऱ्यांदा सांघिक विजेतेपदावर कब्जा करताना महाराष्ट्राने या खेळातील आपले वर्चस्व स्पष्ट केले. ३ सुवर्ण आणि प्रत्येकी एक रौप्य व कांस्य अशी एकूण ५ पदकांची कमाई करुन महाराष्ट्राने सांघिक विजेतेपद उंचावले. त्याचवेळी यजमान राजस्थान संघाने उपविजेतेपद पटकावले.सवाई मानसिंग स्टेडियम येथे झालेल्या या स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या मनिष राव - भूषण पोतणीस या कसलेल्या जोडीने अपेक्षित बाजी मारताना यजमान राजस्थानच्या भरत राज - प्रशांत यांचा ११-५, ११-७ असा धुव्वा उडवला. मनिष - भूषण यांच्या आक्रमक खेळापुढे यजमानांच्या जोडीचा काहीच निभाव लागला नाही.महिला दुहेरीमध्येही करिष्मा - ॠतुजा यांनी एकतर्फी बाजी मारताना महाराष्ट्राच्या पदरी आणखी एक सुवर्ण पदकाची भर टाकली. सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतलेल्या करिष्मा - ॠतुजा यांनी राजस्थानच्या गरिमा - मधुलिका यांचा ११-२, ११-३ असा फडशा पाडला.त्याचवेळी, मिश्र दुहेरीमध्ये मात्र महाराष्ट्राच्या अतुल एडवर्ड - नताशा बेग या बलाढ्य जोडीला झुंजावे लागले. राजस्थानच्या अश्वनी - कविता यांनी तीन सेटपर्यंत झुंज देत महाराष्ट्राच्या जोडीला कडवी टक्कर दिली. मात्र, आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा चांगला अनुभव असलेल्या अतुलने नताशासह मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना अश्वनी - कविता यांचे आव्हान ११-१, ५-११, ११-६ असे परतावले. (क्रीडा प्रतिनिधी)