शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

स्वच्छ भारताच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय - राष्ट्रपतींकडून कौतुक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 04:53 IST

स्वच्छ भारताच्या निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी केले.

मुंबई : स्वच्छ भारताच्या निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी केले.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नागरी भागातील हागणदारीमुक्तीबाबतच्या ‘संकल्पपूर्ती’ कार्यक्रमास राष्ट्रपती कोविंद, त्यांच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी राज्यातील संपूर्ण नागरी भाग हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली. राष्ट्रपती आणि राज्यपालांना स्मृतिचिन्ह देण्यात आले. राज्याचा नागरी भाग हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व संबंधित घटकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. याबाबत राष्ट्रपतींनी राज्याचे अभिनंदन केले.महाराष्ट्राची सुमारे ४९ टक्के लोकसंख्या शहरांमध्ये राहते. त्यामुळे अर्धा महाराष्ट्र आज हागणदारीमुक्त झाला आहे. स्वच्छतेसाठी काम करणे ही ख-या अर्थाने मानवतेची सेवा आहे, असेही ते म्हणाले.मानसिकता बदलण्याची गरजलोकांची मानसिकता, तसेच सवयी बदलण्याची गरज आहे. त्या दृष्टीने राज्य शासनाने ‘गुड मॉर्निंग’, ‘गुड इव्हिनिंग’ पथके स्थापन करून या कामाला पुढे नेले. राज्याने दोन वर्षांत ४० लाख शौचालयांची निर्मिती केली. ३१ मार्चपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.राष्ट्रपतींचा पहिलाच मुंबई दौरापदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद रविवारी पहिल्यांदाच एक दिवसाच्या मुंबई भेटीवर आले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाले. या वेळी तिन्ही सेनादलांच्या संयुक्त तुकडीने राष्ट्रपतींना सलामी दिली.मुंबईकरांचे कौतुकमुंबईत एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील दुर्घटनेतील मृतांना राष्ट्रपतींनी श्रद्धांजली वाहिली. मुंबईवासी नेहमीच आव्हानांचा सामना करीत पुढे जात असतात, या शब्दांत त्यांनी मुंबईकरांचे कौतुक केले.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद