शहरं
Join us  
Trending Stories
1
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
2
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
3
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
4
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
5
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
6
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
7
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
8
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
9
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
10
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
11
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
12
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
13
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
14
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
15
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
16
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
17
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
18
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
19
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
20
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्रात भरपाई आता अडीचपटच!

By admin | Updated: December 31, 2014 10:01 IST

केंद्र सरकारने नवीन भूसंपादन कायद्यात ग्रामीण भागात प्रचलित बाजारभावाच्या चारपट भरपाई देण्याची तरतूद कायम ठेवली

भूसंपादन वटहुकूम : शिफारशीपेक्षा दीडपट कमी, प्रकल्पग्रस्तांना फटकासंदीप प्रधान - मुंबईकेंद्र सरकारने नवीन भूसंपादन कायद्यात ग्रामीण भागात प्रचलित बाजारभावाच्या चारपट भरपाई देण्याची तरतूद कायम ठेवली असली तरी महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात केलेल्या नियमावलीनुसार केवळ कमाल अडीचपट भरपाई दिली जाणार आहे. शहरात दुप्पट भरपाई देण्याची तरतूद तशीच्या तशी स्वीकारलेली आहे.काँग्रेस राजवटीत नवीन भूसंपादन कायदा केला गेला. त्यामधील सोशल इम्पॅक्ट अ‍ॅसेसमेंट आणि ठरावीक उद्दिष्टांकरिता जमीन संपादित करताना ७० टक्के जमीन मालकांच्या संमतीची अट केंद्रातील भाजपा सरकारने सोमवारी वगळली. मात्र जमिनीच्या दराबाबतची तरतूद तशीच ठेवली. २०१३ च्या भूसंपादन कायद्याच्या कलम २६ मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांना जमिनीचे मूल्य निश्चित करण्याच्या असलेल्या अधिकारानुसार नागरी क्षेत्रापासून ग्रामीण क्षेत्राकडील अंतर जसजसे वाढत जाईल तसतसे मल्टिप्लायर फॅक्टर राज्य सरकारने निश्चित केले आहेत. महापालिका क्षेत्रापासून ० ते १० कि.मी. या अंतरामधील जमीन संपादनाकरिता मल्टिप्लायर फॅक्टर १ राहणार आहे. महापालिका क्षेत्रापासून १० ते २५ कि.मी. अंतरामधील जमीन संपादनाकरिता मल्टिप्लायर फॅक्टर १.०५ राहणार आहे, तर महापालिका क्षेत्रापासून २५ कि.मी. व त्यापेक्षा अधिक अंतरावरील जमीन संपादनाकरिता मल्टिप्लायर फॅक्टर १.१० राहणार आहे.विमानतळवासीयांना २२.५ टक्के विकसित जमीननवी मुंबई विमानतळाकरिता जमीन संपादित करताना जमीनमालकांना एकरी २२.५ टक्के विकसित जमीन देण्यात येणार आहे. त्यामुळे एक एकर विकसित जमीन मिळणाऱ्याला बाजारभावानुसार चार कोटी रुपये मूल्याची जमीन मिळेल. या जमिनीपैकी १२.५ टक्के जमिनीवर १.५, तर उर्वरित १० टक्के जमिनीवर २.५ एफएसआय दिला जाणार आहे. याखेरीज ज्यांची घरे या प्रकल्पामुळे बाधित होणार त्यांना अन्यत्र घरबांधणीकरिता प्रति चौ.फू. एक हजार रुपये, घरातील सामानसुमान हलविण्याकरिता वाहतूक खर्च, विमानतळाचे १० रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स, असे लाभ दिले जाणार आहेत.जैतापूरवासीयांना २२.५ लाख प्रति हेक्टरजैतापूर येथील सुमारे १० हजार मे.वॅ़ वीजनिर्मिती क्षमता असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाकरिता प्रकल्पग्रस्तांना प्रति हेक्टर २२.५ लाख रुपये भरपाई देण्यात येणार आहे. २५ कोटी रुपये परिसर विकासाकरिता, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशांना अणुऊर्जा प्रकल्पातून सवलतीच्या दरातील वीजपुरवठा, एक आयटीआय व एका हॉस्पिटलची उभारणी, नाटे व साखरी येथील मच्छीमारांना नवीन बोटी व नवीन मासळी मार्केट.