शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही!

By admin | Updated: August 2, 2016 05:40 IST

१०५ हुतात्मांच्या बलिदानानंतर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे.

मुंबई : १०५ हुतात्मांच्या बलिदानानंतर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे. तुमच्या राजकीय स्वार्थासाठी या राज्याचे तुकडे पडू देणार नाही, अशा शब्दात शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकारला ठणकावले. महाराष्ट्र अखंडच राहील, असा ठराव आणण्याची मागणी करत विरोधकांनी विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले. सकाळी कामकाज सुरू होताच, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व काँग्रेस नेते नारायण राणे यांनी अखंड महाराष्ट्राचा मुद्यावर स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. आज अण्णाभाऊ साठे यांची ९६वी जयंती आहे. आपल्या साहित्यातून त्यांनी अखंड महाराष्ट्राची ज्योत तेवत ठेवली. पोवाडे रचले, चळवळ उभी केली. सुमारे ४६ हजार जणांनी अखंड महाराष्ट्रासाठी तुरुंगवास पत्करला. त्यामुळे अखंड महाराष्ट्रावर सरकारची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी केली. लोकसभेत भाजपाच्या एका खासदाराने वेगळ्या विदर्भाचा ठराव आणला. त्याला राज्यातील एका मंत्र्यानेही पाठिंबा दिला. या मंत्र्यांनी अखंड महाराष्ट्राची शपथ घेतली आहे, विदर्भाची नाही. त्यामुळे राज्य तोडण्याआधी सत्तेतून बाहेर पडा, असा इशाराही मुंडे यांनी दिला. त्यानंतर, विरोधी बाकांवरील सदस्यांनी सभापतींसमोरील हौदात जमा होत घोषणाबाजी केली. त्यामुळे कामकाज तहकूब करावे लागले. कामकाज पुन्हा सुरू झाले, तेव्हा राणे यांनी विभाजन हवे असेल, तर आधी सत्तेतून बाहेर पडा आणि मैदानात या, असे आव्हान भाजपाला दिले. मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत. त्यांनी विदर्भाचा विकास जरूर करावा. विदर्भातील जनतेलाही विभाजन नव्हे, तर विकास हवा आहे, परंतु मुख्यमंत्र्यांची भूमिकाही विभाजनाची असेल, तर त्यांनी आधी राजीनामा द्यावा, अशी मागणी राणे यांनी केली. (प्रतिनिधी)>ठराव मंजूर करा ! : नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘राजकीय इच्छाशक्ती दाखवत सभागृहात अखंड महाराष्ट्राचा ठराव एकमताने मंजूर करण्यात यावा. भाजपा नेते उलटसुलट विधाने करून चुकीचा संदेश पसवत आहेत.’