शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही!

By admin | Updated: August 2, 2016 05:40 IST

१०५ हुतात्मांच्या बलिदानानंतर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे.

मुंबई : १०५ हुतात्मांच्या बलिदानानंतर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे. तुमच्या राजकीय स्वार्थासाठी या राज्याचे तुकडे पडू देणार नाही, अशा शब्दात शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकारला ठणकावले. महाराष्ट्र अखंडच राहील, असा ठराव आणण्याची मागणी करत विरोधकांनी विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले. सकाळी कामकाज सुरू होताच, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व काँग्रेस नेते नारायण राणे यांनी अखंड महाराष्ट्राचा मुद्यावर स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. आज अण्णाभाऊ साठे यांची ९६वी जयंती आहे. आपल्या साहित्यातून त्यांनी अखंड महाराष्ट्राची ज्योत तेवत ठेवली. पोवाडे रचले, चळवळ उभी केली. सुमारे ४६ हजार जणांनी अखंड महाराष्ट्रासाठी तुरुंगवास पत्करला. त्यामुळे अखंड महाराष्ट्रावर सरकारची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी केली. लोकसभेत भाजपाच्या एका खासदाराने वेगळ्या विदर्भाचा ठराव आणला. त्याला राज्यातील एका मंत्र्यानेही पाठिंबा दिला. या मंत्र्यांनी अखंड महाराष्ट्राची शपथ घेतली आहे, विदर्भाची नाही. त्यामुळे राज्य तोडण्याआधी सत्तेतून बाहेर पडा, असा इशाराही मुंडे यांनी दिला. त्यानंतर, विरोधी बाकांवरील सदस्यांनी सभापतींसमोरील हौदात जमा होत घोषणाबाजी केली. त्यामुळे कामकाज तहकूब करावे लागले. कामकाज पुन्हा सुरू झाले, तेव्हा राणे यांनी विभाजन हवे असेल, तर आधी सत्तेतून बाहेर पडा आणि मैदानात या, असे आव्हान भाजपाला दिले. मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत. त्यांनी विदर्भाचा विकास जरूर करावा. विदर्भातील जनतेलाही विभाजन नव्हे, तर विकास हवा आहे, परंतु मुख्यमंत्र्यांची भूमिकाही विभाजनाची असेल, तर त्यांनी आधी राजीनामा द्यावा, अशी मागणी राणे यांनी केली. (प्रतिनिधी)>ठराव मंजूर करा ! : नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘राजकीय इच्छाशक्ती दाखवत सभागृहात अखंड महाराष्ट्राचा ठराव एकमताने मंजूर करण्यात यावा. भाजपा नेते उलटसुलट विधाने करून चुकीचा संदेश पसवत आहेत.’