शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
5
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
6
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
7
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
8
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
9
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
10
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
11
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
12
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
13
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
14
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
15
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
16
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
18
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
19
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
20
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग

...तर महाराष्ट्राचा अफगाण होईल!

By admin | Updated: October 2, 2015 04:21 IST

सनातन संस्थेत मानवी बॉम्ब तयार केले जात असून त्यांना रोखले नाही, तर लवकरच महाराष्ट्राचा अफगाणिस्तान होईल, अशी भीती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव

मुंबई : सनातन संस्थेत मानवी बॉम्ब तयार केले जात असून त्यांना रोखले नाही, तर लवकरच महाराष्ट्राचा अफगाणिस्तान होईल, अशी भीती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी गुरुवारी व्यक्त केली.मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मानव यांनी, सनातनचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा आधार घेत सनातनवर गंभीर आरोप केले. सनातनविरोधात असलेल्या पोलीस, पुरोगामी कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते हे पाताळातील सैतान असल्याची भावना साधकांमध्ये रुजवली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. सनातनच्या आश्रमांमध्ये टप्प्याटप्प्याने साधकांचे ब्रेनवॉश करून सर्व प्रकार घडवले जात आहेत. डॉ. जयंत आठवले यांनी १९८३ साली लिहिलेल्या ‘क्लिनिकल हिप्नोसिस’ या पुस्तकात आठवले यांनी हॅल्युसिनेशन्स प्रकारात व्यक्तीला वेगवेगळे भास निर्माण करता येतात, असा दावा केला आहे. शिवाय संमोहित करण्याच्या प्रकारात एखाद्या व्यक्तीच्या हातून हवी तशी घटना घडवली जाते. मात्र ती घटना केल्यानंतर संबंधित व्यक्ती पकडली गेली, तर जीव जाईपर्यंत मारहाण केली तरी ती व्यक्ती काय केले? कसे केले? कुठे केले? आणि कोणाच्या सांगण्यावरून केले? हे सांगू शकत नाही. कारण त्या व्यक्तीला काहीच आठवत नाही.हे ध्यानी घेता डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी पकडले, तरी त्यांचे ब्रेनवॉश केल्याची शक्यता असल्याने कबुलीजबाब मिळणे कठीण असल्याचा दावाही त्यांनी केला.आश्रमात गैरकृत्ये नाहीत -सनातनचा दावापणजी : सनातनच्या रामनाथी आश्रमात कोणत्याही गैरकृत्ये होत नाहीत. त्यामुळे आश्रम हटविण्याचा प्रश्नच येत नाही, असे सनातन संस्थेच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे. तसेच राज्य सरकारने श्रीराम सेनेवर घातलेली बंदी चुकीची असल्याचे मत सनातन प्रभातचे माजी समूह संपादक दुर्गेश सामंत, हिंदू जनजागृती समितीचे राज्य समन्वयक मनोज सोळंकी, महेश पारकर यांनी पत्रकार परिषद व्यक्त केले. रामनाथ युवा संघाने हा आश्रम हटविण्यासाठी ७ दिवसांची मुदत दिली असून अन्यथा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आरोप खोडून काढण्यासाठी ही पत्रकार परिषद होती.——————अहवालानंतरच निर्णय - पार्सेकरसनातन संस्थेबाबत अगोदर महाराष्ट्राच्या गृह खात्याचा अहवाल येऊ द्या. त्या अहवालातील निष्कर्ष पाहिल्यानंतरच त्या विषयी गोवा सरकार काय ती पाऊले उचलू शकेल, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी सांगितले.राजभवनवर राजेंद्र आर्लेकर यांचा मंत्रीपदी शपथविधी पार पडल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सनातन ही दहशतवादी संघटना असल्याचे तुम्हाला वाटते काय, असे पत्रकारांनी विचारले असता, आम्हाला तसा अनुभव आलेला नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र माझे व्यक्तिगत मत काहीही असले, तरी महाराष्ट्राच्या गृह खात्याकडून कोणते निष्कर्ष काढले जातात, ते पाहावे लागेल.