शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमच्याशिवाय कोणतेही सरकार चालणार नाही, आम्ही किंगमेकर राहणार'; नवाब मलिकांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 14:17 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात काहीही होऊ शकते, असे स्पष्ट संकेत नवाब मलिक यांनी दिले आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचारसभा सुरू आहेत. दोन्ही बाजूंनी सरकार येण्याचा दावा केला जात आहे.माजी मंत्री आमदार नवाब मलिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढत आहेत. मलिक यांनी सरकारबाबत मोठे विधान केले आहे. 'निकालानंतर काहीही होऊ शकते', असं विधान त्यांनी केले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 

नवाब मलिक यांनी काही दिवसापूर्वी खासदार शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला होता. दरम्यान, माजी मंत्री आमदार नवाब मलिक यांनी टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी निकालानंतर काहीही होऊ शकते, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.   

Maharashtra Election 2024: विधानसभेचा पहिला ओपिनियन पोल, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

"भाजपाचे लोक माझ्याविरोधात लढत आहे, जनतेने मला उमेदवारी घ्या म्हणून सांगितले आहे. या मतदारसंघात एक वेगळाच निकाल समोर येणार आहे. जनतेचा आम्हाला भरगोस पाठिंबा मिळणार आहे. आम्ही महायुतीमध्ये असलो तरीही आम्ही विचारधारा कधीही सोडली नाही. टफ फाईट असताना किंग मेकर आम्ही ठरणार आहे, अजित पवार किंगमेकरच्या भूमिकेत राहणार आहेत, असा दावा माजी मंत्री नवाब मलिक यांनी केला. 

नवाब मलिक म्हणाले, बारामतीमधून अजित पवार निवडून येतील. पवार कुटुंबाने एकत्र यावे अशी सर्वांची इच्छा आहे, असंही मलिक म्हणाले. भाजपाच्या 'बटोगे तो कटोगे' या स्लोगनवर बोलताना मलिक म्हणाले, ही  वाह्यात स्लोगन आहे.  या स्लोगनमुळे यांचा फायदा होणार नाही, उलट याचा तोटा होणार आहे.  उत्तर प्रदेशमधील निकाल या राजकारणामुळे असे निकाल आले आहेत. आता 'एक है तो सेफ है', मला वाटतंय भाजपाचा दृष्टीकोण बदलत आहे. आम्ही हिंदू, मुस्लिम, शिख सर्वांनी एक राहिले पाहिजे.  जाती, धर्मा, भाषा असताना सर्व लोक एक राहिले पाहिजे अशी आमची विचारधारा आहे. जर भाजापाची विचारधारा बदलत असेलतर चांगली गोष्ट आहे, असंही नवाब मलिक म्हणाले. 

'निकालानंतर काहीही होऊ शकते'

"माझ्या शर्तीवर पाठिंबा राहिलं. काही वेगळ्या गोष्टी होत असेल तर आमचा पाठिंबा राहणार नाही. आम्ही सरकारमध्ये किंगमेकर राहणार आहे. २३ तारीख येऊद्या कोण कोणासोबत राहते हे त्यावेळी कळेल, असं मोठं विधान नवाब मलिक यांनी केले. सगळ्यांनीच आता पॉलिटीकल अॅडजस्टमेंट केली आहे, २०१९ च्या निवडणुकीत जसं झाले तसे याही निवडणुकीत निकालानंतर काहीही होऊ शकते, असा दावा नवाब मलिक यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024Ajit Pawarअजित पवारnawab malikनवाब मलिकSharad Pawarशरद पवार