शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र बदलतोय- गडकरी

By admin | Updated: November 1, 2016 04:17 IST

केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कामे केली

नागपूर- केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कामे केली परंतु ती सर्व सागंता येणे त्यांनाही शक्य झाले नाही. दीक्षाभूमीला अ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा, ड्रॅगन पॅलेस व चिचोलीचा विकास, ताजबागचा विकास आदी अनेक कामे आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश बदलत आहे, तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र बदलत आहे तसेच शहरात प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात नागपूरही बदलत आहे, असे ते म्हणाले. भारनियमनमुक्त राज्य केवळ फडणवीस सरकारनेच केले. मिहानमध्ये ५० हजारापेक्षा जास्त रोजगार मिळेल. सध्या २७ कंपन्या सुरू असून ९७०० लोकांना रोजगार मिळाला आहे. पाच वर्षे पूर्ण होतील, तेव्हा कंपन्यांची नावे व लोकांना मिळालेला रोजगार नावानिशी जाहीर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. भद्रावती येथे कोळशापासून युरिया तयार करण्याचा प्रकल्प लवकरच सुरू होत आहे. एकूणच दोन वर्षात भरपूर कामे झाली. ही केवळ न्यूज रिल होती. संपूर्ण फिल्म अजून बाकी आहे, असे सांगत सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवा असे आवाहनही त्यांनी केले. ।शेतकऱ्यांना १८ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे राहिले. १८ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. विमाधारक शेतकऱ्यांची संख्या ८० लाखापर्यंत नेण्यात आली. एका वर्षातच चार हजार कोटी विम्यापोटी दिले. अमरावती येथे टेक्स्टाईल पार्क सुरू केले. त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. आता लवकरच ह्यफार्म टू फॅशनह्ण(शेतीपासून फॅशनपर्यंत) ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार ह्यअप्रॉल पार्कह्ण सुरू केले जाणार आहे. नागपुरातही संत्र्यावर अधारित प्रक्रिया केंद्र लवकरच सुरू होणार आहे. राज्यातील ११ जिल्ह्यात अ‍ॅग्रो प्रोसेसिंग युनिट सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गुन्हेगारीमध्येसुद्धा राज्याचा ग्राफ कमी होत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही लावले जात आहेत. यामुळे वाहतूकही स्मार्ट झाली आहे. राईट टू सर्व्हिसमुळे ३७० सेवांचा समावेश करण्यात आला आहे. ९९ टक्के लोकांना या सेवा वेळात मिळत आहेत. स्मार्ट शहरेच नव्हे तर गावेही स्मार्ट होत आहेत. डिजिटलायझेशनवर चांगले काम होत आहे. नागपूर जिल्हा डिजिटयलायझेशन झाला आहे. २०१८ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र डिजिटलायझेशन होईल, असा दावाही त्यांनी केला. शहर ग्रामीण प्रत्येक क्षेत्रात पथदर्शी काम केले. महाराष्ट्र देशातील नंबर एकचे राज्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक आ. सुधाकर कोहळे यांनी केले. संचालन नगरसेवक संदीप जोशी यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. ।विदर्भासाठी तीन रुपयाने विजेचे दर कमी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेही अभिनंदन केले. विदर्भात वीज होते पण विदर्भालाच त्याचा लाभ मिळत नसल्याची ओरड केली जात होती. बावनकुळे यांनी विदर्भासाठी तीन रुपयांनी विजेचे दर कमी केल्याची माहिती दिली. शंभरापेक्षा अधिक जागा जिंकून देणारशहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांनी आपल्या प्रास्ताविकेत मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे नागपूरच्या विकासाला कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे. या विकास कामाच्या जोरावर येत्या मनपा निवडणुकीमध्ये १०० पेक्षा अधिक जागा जिंकून देणारा, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. >गडकरींची राज्याला सर्वाधिक मदत महाराष्ट्राला आजवर कुणीही केली नसेल इतकी मदत नितीन गडकरी यांनी केली आहे. महामार्गासाठी त्यांनी हजारो कोटी रुपये दिले. त्यामुळेच नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग सुरू करीत आहोत. हा केवळ महामार्ग नाही. तो विकासाचा मार्ग आहे. २४ जिल्ह्याला याचा लाभ होईल. यावर आणखी २४ नवीन शहरे निर्माण केली जात आहेत. या महामार्गाद्वारे फायबर आॅप्टिक केबल टाकले जात आहे. यासोबतच गॅस व पेट्रोकेमिकल पाईप टाकण्याची विनंती आपण केंद्राला केली होती. ती सुद्धा मान्य झाली आहे. आता गॅस आणि पेट्रोकेमिकल लाईन या महमार्गाखालून टाकली जाणार आहे. त्यामुळे या महामार्गाच्या दोन्ही बाजूला गॅस व पेट्रोकेमिकलवर आधारित उद्योग स्थापन करता येऊ शकतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. >लकवाछाप मंत्र्यांमुळे कामे थांबलीकेंद्रीय मंत्री गडकरी यांनी पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत आघाडी सरकारचा समाचार घेतला. लकवाछाप मंत्र्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक कामे थांबली. लकवाछाप हा माझा शब्द नसून शरद पवारांनी दिलेला शब्द असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नाव्हा शेवा ते शेवडी हा ट्रान्सहार्बर लिंकचा आराखडा मी तयार करून दिला होता. परंतु ते काम थांबले. आता ते काम पुन्हा सुरू केले जाईल. फुले, शाहू आंबेडकरांचे नाव घेऊन महाराष्ट्राला गर्तेत लोटण्यात आले. परंतु गेल्या दोन वर्षात गतिशील निर्णय घेण्यात आले.