शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रोजगारात महाराष्ट्र अव्वलच

By admin | Updated: August 1, 2014 11:33 IST

देशात रोजगार असलेल्यांची संख्या गेल्या आठ वर्षांमध्ये २०१३ पर्यंत ३४.३५ टक्क्यांनी वाढून १२.७७ कोटी झाली आहे.

नवी दिल्ली : देशात रोजगार असलेल्यांची संख्या गेल्या आठ वर्षांमध्ये २०१३ पर्यंत ३४.३५ टक्क्यांनी वाढून १२.७७ कोटी झाली आहे. काल प्रसिद्ध झालेल्या सहाव्या आर्थिक गणनेतील आकडेवारीनुसार, रोजगारवाढीचा वार्षिक दर या काळात ४ टक्के एवढा होता. या काळात वार्षिक लोकसंख्यावाढीचा दर २ टक्के एवढा होता.देशातील एकूण रोजगारांपैकी ११.२६ टक्के रोजगार एकट्या महाराष्ट्रात आहेत. कामावर असलेल्या लोकांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. यानंतर उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि गुजरात यांचा क्रमांक लागतो. आर्थिक गणनेत प्रथमच यावेळी हातमाग आणि वस्त्रोद्योग क्षेत्राचा समावेश करण्यात आला. देशभरात या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे प्रमाण ३.७५ टक्के आहे.२००५ च्या तुलनेत शहरी भागात रोजगार २०१३ च्या तुलनेत ३७.४६ टक्क्यांनी वाढून ६.१४ कोटी झाले. दुसरीकडे ग्रामीण भागात ३१.५९ टक्क्यांनी वाढून ६.६२ कोटी राहिले. केंद्रशासित प्रदेशांत २०१३मध्ये दिल्लीत सर्वाधिक २९.८४ लाख नोकरदार आहेत. यानंतर २.३८ लाख कर्मचाऱ्यांसह चंदीगडचे स्थान राहिले. पुडुचेरीत २.१७ लाख कर्मचारी होते.२०११च्या जनगणनेनुसार देशाची लोकसंख्या १२१ कोटींहून अधिक होती. आर्थिक गणनेत कृषी, लोक प्रशासन, संरक्षण आणि अनिवार्य सामाजिक सुरक्षा सेवा यांचा समावेश करण्यात आला नाही. या क्षेत्रांचा यात समावेश केल्यास रोजगारवाढीचे प्रमाण घटेल. २००५ ते २०१३ या काळात संस्था किंवा कंपन्यांची संख्या ४१.७३ टक्क्यांनी वाढून ५.८४ कोटी राहिली. यामध्ये ६० टक्के आस्थापने ग्रामीण भागात आहेत.रोजगारवाढीत उत्तर प्रदेशची बाजी उत्तर प्रदेशात याच काळात रोजगारवाढीचे प्रमाण ७५ टक्क्यांहून अधिक नोंदले गेले. लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगारमध्ये मणिपूर, आसाम आणि सिक्कीम यांच्यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. यात गुजरात नवव्या स्थानावर आहे. रोजगार स्थितीबाबत विचारले असता, राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे चेअरमन प्रणव सेन यांनी सांगितले की, आठ वर्षांत रोजगारामध्ये ३४ टक्क्यांनी वाढ नोंदली गेली. म्हणजेच वार्षिक ४ टक्क्यांहून अधिक दराने रोजगारात वाढ झाली. लोकसंख्येत वार्षिक २ टक्के दराने वाढ नोंदली. (लोकमत न्यूज नेटवर्क)