शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

गुंतवणूकदारांच्या पसंतीस महाराष्ट्रच अव्वल

By admin | Updated: December 31, 2015 04:20 IST

आपल्या राज्यातील गुंतवणूक धोरण, पायाभूत सुविधा उत्कृष्ट असल्याचे सांगत आपलेच राज्य गुंतवणुकीसाठी अव्वल असल्याचे दावे विविध राज्यांकडून होत असतात. पण उद्योगांची शिखर संस्था

मुंबई : आपल्या राज्यातील गुंतवणूक धोरण, पायाभूत सुविधा उत्कृष्ट असल्याचे सांगत आपलेच राज्य गुंतवणुकीसाठी अव्वल असल्याचे दावे विविध राज्यांकडून होत असतात. पण उद्योगांची शिखर संस्था असलेल्या ‘असोचेम’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून गुंतवणूकदारांच्या पसंतिक्रमात महाराष्ट्रच अव्वल असल्याचे दिसून आले आहे. विविध राज्यांतील गुंतवणुकीचे तुलनात्मक विश्लेषण या विषयावर २१ राज्यांतील गुंतवणुकीचे चित्र, स्थिती आणि कल यांचा वेध घेत असोचेमने एक अहवाल तयार केला आहे. २००९ ते २०१४ या कालावधीतील गुंतवणुकीच्या स्थितीचा आढावा या अहवालात घेण्यात आला असून देशी व विदेशी अशा सर्व गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रालाच पहिली पसंती दिल्याचे दिसून आले आहे. तर दुसऱ्या स्थानावर गुजरातचा क्रमांक होता आणि तिसऱ्या स्थानावर ओडिशा राज्य राहिले. देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी एक चतुर्थांश गुंतवणूक ही केवळ महाराष्ट्र, गुजरात आणि ओडिशा अशा तीन राज्यांत झाली असल्याचे दिसून आले. यावरून त्या तीन राज्यांना असलेली मागणी आणि या राज्यांतील उद्योगाचे स्थान अधोरेखित होते, असे मत असोचेमचे महासचिव डी.एस. रावत यांनी व्यक्त केले. या अहवालाच्या आधारे, डिसेंबर २०१४ च्या अखेरीस देशातील विविध राज्यांत झालेल्या गुंतवणुकीच्या आकडेवारीच्या अनुषंगाने सांगायचे झाल्यास, देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी १० टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात झाली आहे. सुमारे १५ लाख कोटी रुपयांची ही गुंतवणूक आहे. तर महाराष्ट्राशी तगडी स्पर्धा करत ९.२ टक्क्यांच्या गुंतवणुकीसह गुजरातने दुसरा क्रमांक गाठला आहे. गुंतवणुकीत साडेसात टक्क्यांच्या हिश्शासह ओडिशा तिसऱ्या क्रमांकावर तर कर्नाटक ६.८ टक्के, तामिळनाडू ६.५ टक्के अशी क्रमवारी राहिली आहे. देशातील २१ राज्यांत जी एकूण गुंतवणूक झाली त्यापैकी ८४.५ लाख कोटी रुपये गुंतवणूक ही खासगी उद्योगांकडून झाली. टक्केवारीत हे प्रमाण ५५ टक्के इतके आहे. २००९ ते २०१४ या कालावधीत प्रत्येक वर्षी गुंतवणुकीच्या प्रमाणात सरासरी ११ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसते.