शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
3
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
4
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
5
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
6
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
7
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
8
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
9
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
10
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
11
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
12
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
13
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
14
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
15
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
16
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
17
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
18
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
19
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
20
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

पंचायत राज संस्थांच्या सक्षमीकरणात महाराष्ट्र आघाडीवर - राज्यपाल

By admin | Updated: March 21, 2016 03:08 IST

पंचायतराज संस्था अधिक सक्षम आणि बळकट करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. आता ७३व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायतराज संस्थांना

मुंबई : पंचायतराज संस्था अधिक सक्षम आणि बळकट करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. आता ७३व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायतराज संस्थांना विविध अधिकार बहाल करून त्यांना अधिक स्वयंपूर्ण आणि सक्षम करावे, असे आवाहन राज्यपाल विद्यासागर राव यांनी केले. यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायतराज संस्था, गुणवंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा रविवारी राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दीपक केसरकर राज्यातील विविध जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, सरपंच, अधिकारी उपस्थित होते. राज्याचा अर्थसंकल्पही कृषी आणि ग्रामविकासाला चालना देणारा आहे. दुष्काळमुक्तीसाठी ‘जलयुक्त शिवार’ योजनेत सर्वांनी अधिकाधिक योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपालांनी या वेळी केले. ग्रामीण भागाच्या विकासासाठी आतापर्यंत विविध योजना आखूनही गावांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. हे चित्र बदलण्यासाठी नियोजनबद्ध विकास करणे गरजेचे आहे. यासाठी गावांनी पुढील पाच वर्षांचे विकास आराखडे तयार करून नियोजनबद्ध विकासाचा कार्यक्रम राबवावा, असे आवाहन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. (प्रतिनिधी)यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कोल्हापूर, लातूर व अहमदनगर या जिल्हा परिषदांना अनुक्रमे पहिले तीन राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले, तसेच ब्रह्मपुरी (जि.चंद्रपूर), कराड (जि. सातारा) या पंचायत समित्यांना अनुक्रमे पहिले दोन, तर राहुरी (जि. अहमदनगर) व मालवण (जि. सिंधुदुर्ग) या पंचायत समित्यांना तिसरा पुरस्कार विभागून देण्यात आला. महालगाव (ता. कामठी, जि. नागपूर), लोणी बु. (ता. राहाता, जि. अहमदनगर), कसबा उत्तूर (ता. आजरा, जि. कोल्हापूर) या ग्रामपंचायतींना अनुक्रमे प्रथम तीन पारितोषिके प्रदान करण्यात आली. एकूण २ कोटी ७० लाख इतक्या रकमेचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.