शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

महाराष्ट्रही होरपळला!

By admin | Updated: April 16, 2016 02:34 IST

देशभरात आलेल्या उष्णतेच्या लाटेत महाराष्ट्रही होरपळून निघाला आहे. खान्देशात उष्माघाताने एकाचा बळी घेतला. विदर्भातील तापमान ४४ अंशांच्या वर गेले असून तेथे दुपारी

पुणे/नागपूर/सोलापूर : देशभरात आलेल्या उष्णतेच्या लाटेत महाराष्ट्रही होरपळून निघाला आहे. खान्देशात उष्माघाताने एकाचा बळी घेतला. विदर्भातील तापमान ४४ अंशांच्या वर गेले असून तेथे दुपारी अघोषित संचारबंदी लागल्यासारखे चित्र पाहायला मिळत आहे. मराठवाडा, खान्देशाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातही झळा तीव्र झाल्या आहेत. बहुतांश शहरांतील तापमान ४० अंशांपुढे असून सोलापुरातील पारा ४३ अंशांवर गेला आहे. पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.विदर्भ, मराठवाड्यात शुक्रवारी तुलनेने उन्हाची तीव्रता जास्त होती. वर्धा येथे राज्यातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात हंगामात पहिल्यांदाच पारा ४५ वर गेला आहे. नागपुरात शुक्रवार यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वांत उष्ण दिवस ठरला. विदर्भात अकोला, चंद्रपूर, नागपूर या शहरांचे तापमान ४४ अंशांच्या पुढे होते. तर अमरावती, बुलडाणा, यवतमाळ या शहरांतील तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांच्या दरम्यान राहिला. एप्रिलमध्ये विदर्भातील तापमान ४४.५ अंशांपर्यंत वर चढते. परंतु यंदा तो विक्रम मोडून तापमान ४५ अंशांच्या वर जाण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.मराठवाड्यातही परभणीचे तापमान ४४ अंशांच्या पुढे गेले. मध्य महाराष्ट्रालाही उन्हाचा तडाखा बसत असून शुक्रवारी मालेगाव येथे वर्ध्यापाठोपाठ ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगावचा पाराही ४३ अंशांच्या पुढे होता.पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र तापमानाने चाळिशी पार केली असून तीव्र झळांनी दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट होता. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमधील तापमानही सरासरीपेक्षा ४.७ अंशाने अधिक होते. सोलापूरचा पारा ४३ अंशाच्या पुढे तर पुण्यासह अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा येथील तापमान ४० ते ४२ अंशांच्या दरम्यान होते. मुंबईसह रत्नागिरी, अलिबाग, डहाणू या भागात तापमान सरासरीच्या जवळपास राहिले. सोलापुरात शुक्रवारी यंदाच्या वर्षातील सर्वोच्च ४३.७ अं. से. तापमानाची नोंद झाली. मार्चमध्ये काही दिवस पाऱ्याने चाळिशी पार केली होती. एप्रिलमध्ये तापमानात सातत्याने वाढ होत आहे. १२ एप्रिल रोजी ४२.६ अं. से. तापमान नोंदले गेले. गुरुवारी त्यात वाढ झाली. शुक्रवारी तर पारा ४३़७ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत़ (लोकमत न्यूज नेटवर्क) उष्माघाताचा पहिला बळीजळगाव : कंडारी (ता. भुसावळ) येथील शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख यशवंत रामा चौधरी (४७, रा.भादली) यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय आहे़ ही घटना गुरुवारी भरदुपारी दीडच्या सुमारास घडली. खान्देशात हा उष्माघाताचा पहिला बळी ठरला आहे. कामानिमित्त बाहेर पडलेल्या चौधरी यांना अवस्थ वाटू लागले़ त्यानंतर ते झोपले आणि झोपेतच त्यांना रक्ताची उलटी होऊन त्यांचा मृत्यू झाला़, अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. प्रमुख शहरांतील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)मुंबई ३२, पुणे ४१.५, अहमदनगर ४१.७, जळगाव ४३.६, कोल्हापूर ४०.६, महाबळेश्वर ३६.४, मालेगाव ४४.८, नाशिक ३९.९, सांगली ४२.६, सातारा ४०.८, सोलापूर ४३.७, रत्नागिरी ३३.१, अलिबाग ३२.१, उस्मानाबाद ४२, परभणी ४४, अकोला ४४.४, अमरावती ४३.२, बुलडाणा ४२.२, चंद्रपूर ४४.६, गोंदिया ४१.८, नागपूर ४४.२, वाशिम ३९.२, यवतमाळ ४३.