शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रही होरपळला!

By admin | Updated: April 16, 2016 02:34 IST

देशभरात आलेल्या उष्णतेच्या लाटेत महाराष्ट्रही होरपळून निघाला आहे. खान्देशात उष्माघाताने एकाचा बळी घेतला. विदर्भातील तापमान ४४ अंशांच्या वर गेले असून तेथे दुपारी

पुणे/नागपूर/सोलापूर : देशभरात आलेल्या उष्णतेच्या लाटेत महाराष्ट्रही होरपळून निघाला आहे. खान्देशात उष्माघाताने एकाचा बळी घेतला. विदर्भातील तापमान ४४ अंशांच्या वर गेले असून तेथे दुपारी अघोषित संचारबंदी लागल्यासारखे चित्र पाहायला मिळत आहे. मराठवाडा, खान्देशाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातही झळा तीव्र झाल्या आहेत. बहुतांश शहरांतील तापमान ४० अंशांपुढे असून सोलापुरातील पारा ४३ अंशांवर गेला आहे. पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.विदर्भ, मराठवाड्यात शुक्रवारी तुलनेने उन्हाची तीव्रता जास्त होती. वर्धा येथे राज्यातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात हंगामात पहिल्यांदाच पारा ४५ वर गेला आहे. नागपुरात शुक्रवार यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वांत उष्ण दिवस ठरला. विदर्भात अकोला, चंद्रपूर, नागपूर या शहरांचे तापमान ४४ अंशांच्या पुढे होते. तर अमरावती, बुलडाणा, यवतमाळ या शहरांतील तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंशांच्या दरम्यान राहिला. एप्रिलमध्ये विदर्भातील तापमान ४४.५ अंशांपर्यंत वर चढते. परंतु यंदा तो विक्रम मोडून तापमान ४५ अंशांच्या वर जाण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.मराठवाड्यातही परभणीचे तापमान ४४ अंशांच्या पुढे गेले. मध्य महाराष्ट्रालाही उन्हाचा तडाखा बसत असून शुक्रवारी मालेगाव येथे वर्ध्यापाठोपाठ ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगावचा पाराही ४३ अंशांच्या पुढे होता.पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र तापमानाने चाळिशी पार केली असून तीव्र झळांनी दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट होता. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमधील तापमानही सरासरीपेक्षा ४.७ अंशाने अधिक होते. सोलापूरचा पारा ४३ अंशाच्या पुढे तर पुण्यासह अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा येथील तापमान ४० ते ४२ अंशांच्या दरम्यान होते. मुंबईसह रत्नागिरी, अलिबाग, डहाणू या भागात तापमान सरासरीच्या जवळपास राहिले. सोलापुरात शुक्रवारी यंदाच्या वर्षातील सर्वोच्च ४३.७ अं. से. तापमानाची नोंद झाली. मार्चमध्ये काही दिवस पाऱ्याने चाळिशी पार केली होती. एप्रिलमध्ये तापमानात सातत्याने वाढ होत आहे. १२ एप्रिल रोजी ४२.६ अं. से. तापमान नोंदले गेले. गुरुवारी त्यात वाढ झाली. शुक्रवारी तर पारा ४३़७ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत़ (लोकमत न्यूज नेटवर्क) उष्माघाताचा पहिला बळीजळगाव : कंडारी (ता. भुसावळ) येथील शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख यशवंत रामा चौधरी (४७, रा.भादली) यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय आहे़ ही घटना गुरुवारी भरदुपारी दीडच्या सुमारास घडली. खान्देशात हा उष्माघाताचा पहिला बळी ठरला आहे. कामानिमित्त बाहेर पडलेल्या चौधरी यांना अवस्थ वाटू लागले़ त्यानंतर ते झोपले आणि झोपेतच त्यांना रक्ताची उलटी होऊन त्यांचा मृत्यू झाला़, अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. प्रमुख शहरांतील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)मुंबई ३२, पुणे ४१.५, अहमदनगर ४१.७, जळगाव ४३.६, कोल्हापूर ४०.६, महाबळेश्वर ३६.४, मालेगाव ४४.८, नाशिक ३९.९, सांगली ४२.६, सातारा ४०.८, सोलापूर ४३.७, रत्नागिरी ३३.१, अलिबाग ३२.१, उस्मानाबाद ४२, परभणी ४४, अकोला ४४.४, अमरावती ४३.२, बुलडाणा ४२.२, चंद्रपूर ४४.६, गोंदिया ४१.८, नागपूर ४४.२, वाशिम ३९.२, यवतमाळ ४३.