शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

रस्ते अपघातांत महाराष्ट्र तिसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2017 03:23 IST

वाढत जाणाऱ्या वाहनसंख्येमुळे अपघातही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची बाब समोर आली आहे.

मुंबई : वाढत जाणाऱ्या वाहनसंख्येमुळे अपघातही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची बाब समोर आली आहे. २०१६ मध्ये झालेल्या रस्ते अपघातांमध्ये तब्बल १२ हजार ८८३ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. देशभरात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागत असून पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे तामिळनाडू व उत्तरप्रदेश हे राज्य असल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. हे पाहता रस्ते अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभागाकडून प्रयत्न केले जात असून त्याचाच एक भाग म्हणून एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. २१ मार्च रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यशाळा आयोजित केल्याची माहिती देण्यात आली. २0१६ मध्ये ३९ हजार ८४८ अपघातांमध्ये १२ हजार ८८३ जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर ३५ हजार ८९४ जण जखमी झाले. या अपघातांमध्ये १५ ते ४९ वयोगटाचा सर्वात जास्त समावेश असल्याचे सांगण्यात आले. रस्ते अपघातांमधील साधनसंपत्ती व जिवितहानी कमी करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने २0२0 सालापर्यंत विकसनशील देशांमध्ये एकूण अपघातसंख्या ५0 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर रस्ते अपघात कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभाग व महाराष्ट्र परिवहन विभाग यांच्या संयुक्तपणे प्रयत्न करत असून मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)