शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते अपघातांत महाराष्ट्र तिसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2017 03:23 IST

वाढत जाणाऱ्या वाहनसंख्येमुळे अपघातही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची बाब समोर आली आहे.

मुंबई : वाढत जाणाऱ्या वाहनसंख्येमुळे अपघातही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची बाब समोर आली आहे. २०१६ मध्ये झालेल्या रस्ते अपघातांमध्ये तब्बल १२ हजार ८८३ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. देशभरात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागत असून पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे तामिळनाडू व उत्तरप्रदेश हे राज्य असल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. हे पाहता रस्ते अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभागाकडून प्रयत्न केले जात असून त्याचाच एक भाग म्हणून एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. २१ मार्च रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यशाळा आयोजित केल्याची माहिती देण्यात आली. २0१६ मध्ये ३९ हजार ८४८ अपघातांमध्ये १२ हजार ८८३ जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर ३५ हजार ८९४ जण जखमी झाले. या अपघातांमध्ये १५ ते ४९ वयोगटाचा सर्वात जास्त समावेश असल्याचे सांगण्यात आले. रस्ते अपघातांमधील साधनसंपत्ती व जिवितहानी कमी करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने २0२0 सालापर्यंत विकसनशील देशांमध्ये एकूण अपघातसंख्या ५0 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर रस्ते अपघात कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभाग व महाराष्ट्र परिवहन विभाग यांच्या संयुक्तपणे प्रयत्न करत असून मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)