शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

रस्ते अपघातांत महाराष्ट्र तिसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2017 03:23 IST

वाढत जाणाऱ्या वाहनसंख्येमुळे अपघातही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची बाब समोर आली आहे.

मुंबई : वाढत जाणाऱ्या वाहनसंख्येमुळे अपघातही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची बाब समोर आली आहे. २०१६ मध्ये झालेल्या रस्ते अपघातांमध्ये तब्बल १२ हजार ८८३ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. देशभरात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागत असून पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे तामिळनाडू व उत्तरप्रदेश हे राज्य असल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. हे पाहता रस्ते अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभागाकडून प्रयत्न केले जात असून त्याचाच एक भाग म्हणून एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. २१ मार्च रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यशाळा आयोजित केल्याची माहिती देण्यात आली. २0१६ मध्ये ३९ हजार ८४८ अपघातांमध्ये १२ हजार ८८३ जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर ३५ हजार ८९४ जण जखमी झाले. या अपघातांमध्ये १५ ते ४९ वयोगटाचा सर्वात जास्त समावेश असल्याचे सांगण्यात आले. रस्ते अपघातांमधील साधनसंपत्ती व जिवितहानी कमी करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने २0२0 सालापर्यंत विकसनशील देशांमध्ये एकूण अपघातसंख्या ५0 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर रस्ते अपघात कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभाग व महाराष्ट्र परिवहन विभाग यांच्या संयुक्तपणे प्रयत्न करत असून मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)