शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

शेतकरी आत्महत्यांमध्ये 42 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

By admin | Updated: January 6, 2017 10:51 IST

शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली असून 2014 ते 2015 मध्ये आकडा 42 टक्क्यांनी वाढला आहे. महाराष्ट्रात एकूण 3030 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली असून 2014 ते 2015 मध्ये आकडा 42 टक्क्यांनी वाढला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 2014 मध्ये एकूण 5650 शेतक-यांनी आत्महत्या केली होती. या आकडेवारीत मोठी वाढ झाली असून 8007 पर्यंत पोहोचला आहे. देशभरातील अनेक राज्यांना 2014 आणि 2015 मध्ये सलग दोन वर्ष दुष्काळाचा सामना करावा लागला. महाराष्ट्रातही शेतक-यांनी सलग दोन वर्ष दुष्काळाला तोंड दिलं आहे. 
 
फक्त एकट्या महाराष्ट्रात एकूण 3030 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. 37.8 टक्के शेतकरी आत्महत्यांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.त्यानंतर तेलंगणा दुस-या क्रमांकावर आहे. तेलंगणात 1358 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. तेलंगणामध्ये 1997 शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून तिस-या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटकमधील एकूण सहा राज्यांमध्ये आत्महत्येची टक्केवारी 94.1 इतकी आहे. 
 
काही राज्यांमध्ये एकाही शेतक-याने आत्महत्या न केल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये बिहार, पश्चिम बंगाल, गोवा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड, मिझोरम, नागालँड आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये 2015 मध्ये एकाही शेतक-याने आत्महत्या केलेली नाही. 
 
शेतमजूरांच्या आत्महत्येतही महाराष्ट्रातील आकडा सर्वात जास्त आहे. एकूण 1261 शेतमजूरांनी आत्महत्या केली आहे. यानंतर मध्यप्रदेश 709 आणि तामिळनाडू 604 आत्महत्यांसह दुस-या आणि तिस-या क्रमांकावर आहे. देशभरातील आत्महत्येच्या आकडेवारी दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2014 मध्ये 12,360 जणांनी आत्महत्या केली होती. जो आकडा 2015 मध्ये 12,602 वर पोहोचला आहे.