शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

महाराष्ट्र अखंडच राहायला हवा

By admin | Updated: November 9, 2016 03:00 IST

सहिष्णुता हा भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा; शांतता आपल्या संस्कृतीचा पाया आहे. सध्याच्या काळात राजकारण, समाजकारणाचा पाया ढासळू लागला आहे.

पुणे : सहिष्णुता हा भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा; शांतता आपल्या संस्कृतीचा पाया आहे. सध्याच्या काळात राजकारण, समाजकारणाचा पाया ढासळू लागला आहे. बेभान राजकारण्यांना ताळ्यावर ठेवायचे असेल तर तत्त्वज्ञांनी भारतीय तत्त्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवायला हवे. इतरांना दोष न देता आत्मपरीक्षण करण्याची हीच वेळ आहे. महाराष्ट्र एकसंध ठेवायचा असेल तर एकतेचे सूत्र अवलंबायला हवे. अखंडित महाराष्ट्र जपण्याचे काम लेखणीतून झाले पाहिजे, असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.रामकृष्णहरी कृषी प्रतिष्ठानतर्फे ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांना ‘प्रा. रामकृष्ण मोरे जीवनगौरव पुरस्कारा’ने मंगळवारी सन्मानित करण्यात आले. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी द्वादशीवार यांच्या ‘कोऽऽहम’ या तत्त्वचिंतनात्मक कादंबरीच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशनही करण्यात आले. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस यशवंत हप्पे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती रामभाऊ बराटे, उल्हास पवार आदी मान्यवर उपस्थित होते. ‘सभापती ना धड इकडचा असतो, ना तिकडचा’ अशी टिपण्णी करत नाईक निंबाळकर म्हणाले, ‘‘राजकारणी गेल्यावर त्याच्या नावाचा एखादा फलक, अर्धाकृती पुतळा यापलीकडे त्याचे स्मरण राहात नाही. जग वेगवान झाले आहे, त्याच वेगाने स्मृतिभ्रंश होत आहे की काय, अशी शंका उत्पन्न होते. राजकारणात फार कमी लोक एकमेकांची आठवण काढतात. एखादी गोष्ट ठसवून सांगणे, हेच आमचे राजकीय तत्त्वज्ञान आहे’’, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात यांनी प्रास्ताविक केले.