शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्र ‘शायनिंग’

By admin | Updated: July 6, 2016 00:13 IST

रामदास आठवले व डॉ. सुभाष भामरे यांना राज्यमंत्री म्हणून मिळालेले स्थान लक्षात घेता, केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्राचे महत्त्व निश्चितपणे वाढले

- संजीव साबडेमुंबई : नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील फेरबदलानंतर प्रकाश जावडेकर यांना कॅबिनेट मंत्री म्हणून पदोन्नती आणि रामदास आठवले व डॉ. सुभाष भामरे यांना राज्यमंत्री म्हणून मिळालेले स्थान लक्षात घेता, केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्राचे महत्त्व निश्चितपणे वाढले आहे. नितीन गडकरी, सुरेश प्रभु, प्रकाश जावडेकर, अनंत गीते, हंसराज अहीर, पीयूष गोयल, डॉ. सुभाष भामरे आणि रामदास आठवले असे तब्बल आठ जण मोदी मंत्रिमंडळात आहेत. शिवाय महाराष्ट्रातील तीन राज्यमंत्र्यांकडे गृह, संरक्षण व समाजकल्याण ही महत्त्वाची खाती पंतप्रधानांनी दिली आहेत.महाराष्ट्रात भाजपा भक्कम व्हावी आणि शिवसेनेला शह देणे शक्य व्हावे, असा उघड हेतू यातून दिसत आहे. बहुधा त्याचमुळे विस्तारात शिवसेनेला मंत्री वा राज्यमंत्रीपद देण्यात आले नाही. इतकेच नव्हे, तर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेनेशी भाजपा नेत्यांनी वा पंतप्रधानांनी चर्चाही केली नाही.

(गुजरात दंगलीत मोदींना लक्ष्य करणारे झाले कॅबिनेट मंत्री)

नितीन गडकरी यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलवाहतूक आणि बंदरे विकास अशी अतिशय महत्त्वाची खाती आहेत. त्यांनी मंत्री झाल्यापासून रस्तेबांधणीपासून बंदरेविकासापर्यंत सर्व खात्यांत कामांचा धडाकाच लावला आहे. अतिशय कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची केंद्रात आणि देशभर ओळख आहे.सुरशे प्रभु यांच्याकडे रेल्वे मंत्रीपदाचा कारभार असून, त्यांनी केलेल्या विकासामुळे रेल्वेचे कामकाज सुधारले आहे. शिवाय राज्यातील अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभु यांनी थेट प्रवाशांना रेल्वे खात्याला जोडले आहे. त्यातून सुधारणाही होत आहेत. आतापर्यंत वने व पर्यावरण खाती स्वतंत्रपणे हाताळणाऱ्या प्रकाश जावडेकर यांना पदोन्नतीबरोबरच मनुष्यबळ विकास हे तितकेच महत्त्वाचे खाते मिळाले. स्मृती इराणी यांच्याकडून ते काढून घेतले हेही लक्षणीयच म्हणावे लागेल. जावडेकर यांनी आतापर्यंत असलेल्या खात्याचे काम उत्कृष्टपणे करताना अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली आणि ते मार्गी लावले. त्याशिवाय पीयूष गोयल यांच्याकडेही ऊर्जा, खाणी, कोळसा, अपारंपरिक ऊर्जा अशी महत्त्वाची खाती देउन पंतप्रधानांनी त्यांच्यावर जो विश्वास दाखवला, तो गोयल यांनी सार्थ करून दाखवला आहे.

(भामरे यांच्या समावेशाने खडसेंच्या वर्चस्वाला शह)

राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रसायने आणि उर्वरक खात्यात चांगले नाम करून पंतप्रधानांनाचा विश्वास संपादन केल्याचे दिसत आहे. बहुधा त्याचमुळे फेरबदलांमध्ये गृह खात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यात त्यांना राज्यमंत्री म्हणून आणले आहे. मंगळवारी शपथ घेतलेले डॉ. सुभाष भामरे यांना नवे राज्यमंत्री म्हणून फारसे महत्त्वाचे खाते मिळणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हाताखाली राज्यमंत्री म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळणार आहे. रामदास आठवले यांना राज्यमंत्री केल्याने दलित समाज आपल्यासोबत राहील, याचा प्रयत्न भाजपा कायम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. आंबेडकरी चळवळीचे व दलित समाजाचे मोठे नेते असलेल्या आठवले यांना समाजकल्याण खाते देण्यात आले आहे. त्यांनी दलित, आदिवासी शोषित यांच्या कल्याणाचे काम खात्यामार्फत करावे, हीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे.शिवसेनेचे अनंत गीते यांच्याकडे अवजड उद्योग खाते असले तरी त्यात काही करून दाखवण्यासारखे काही नाही. शिवाय असलेल्या खात्यात त्यांनी काही वैशिष्ट्यपूर्ण काम करून दाखवल्याचे दिसलेले नाही वा ते प्रभावी संसदपटू वा मंत्री म्हणून काम करताना जाणवलेले नाही. केंद्रात मंत्री झालेले गोपीनाथ मुंडे यांचे अकाली निधन झाले, तर रावसाहेब दानवे यांना राज्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून यावे लागले. पण त्यांच्या जागाही आता भरण्यात आल्या, असाही आजच्या शपथविधीचा अर्थ लावता येईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)