शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

वळवाच्या सरींनी महाराष्ट्र चिंब!

By admin | Updated: June 6, 2016 03:38 IST

दुष्काळ आणि उन्हाच्या तडाख्याने भेगाळलेला महाराष्ट्र रविवारी वळवाच्या जोरदार सरींनी चिंब झाला. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा आला असला, तरीही राजधानी मुंबई

मुंबई : दुष्काळ आणि उन्हाच्या तडाख्याने भेगाळलेला महाराष्ट्र रविवारी वळवाच्या जोरदार सरींनी चिंब झाला. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा आला असला, तरीही राजधानी मुंबई अद्यापही ‘चातकी’ आऽऽ वासून आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला़ मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, कोकण-गोव्यात काही ठिकाणी व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ (लोकमत न्यूज नेटवर्क)वळवाच्या पावसाने गेल्या २४ तासांत राज्यभरातील आठ जणांचा बळी घेतला आहे. बुलडाण्यामधील खामगाव तालुक्यातील गारडगाव येथे ज्ञानेश्वर सुपडाजी वाडेकर (२७), अहमदनगर तालुक्यातील अरणगाव येथील दादा शंकर ढमढरे (५५), परभणी जिल्ह्यात सेलू तालुक्यातील नरसापूर आणि जिंतूर तालुक्यातील दत्तराव नरोटे (३५), सूर्यभान तुकाराम मस्के, जालना जिल्ह्यातील परतूर येथील आशामती भगवनाराव खवणे (५०) यांचा वीज पडून मृत्यू झाला. बीडमधील केज तालुक्यात विद्युत खांब अंगावर पडून शेषराव किसनराव गुजर (५५), जालन्यातील मंठा तालुक्यात अंगावर झाड कोसळून देविदास सरोदे (५५) यांचा मृत्यू झाला. सोलापुरातील माढा तालुक्यातील आहेरगाव येथे सुनील पाटील या शेतकऱ्याच्या अंगावर गोठा पडल्याने मृत्यू त्याचा झाला.