शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात साखरेचे भाव शरद पवार यांनीच पाडले

By admin | Updated: November 20, 2014 11:41 IST

अहमदनगर जिल्ह्यातील काळे, कोल्हेंसह सगळे कारखानदार काटामार, उताराचोर आहेत, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी येथे केला.

 महाराष्ट्रात साखरेचे भाव शरद पवार यांनीच पाडले

 
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील काळे, कोल्हेंसह सगळे कारखानदार काटामार, उताराचोर आहेत, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी येथे केला.
संघटनेच्या वतीने आयोजित ऊस व दूध परिषदेत ते बोलत होते. कोल्हापूरच्या साखर कारखान्यांचा जादा उतारा निघत असताना अहमदनगर जिल्ह्याचा साखर उतारा १२ टक्क्यांपेक्षा कमी कसा? असा सवाल करून ते म्हणाले, या जिल्ह्यातील सर्वच कारखानदार उतारा चोरतात, काटा मारतात. यात काळे, कोल्हेंसह सगळेच सामील आहेत. १ टक्के उतारा चोरणे म्हणजे १0 किलो साखर चोरणे. त्यामुळे टनामागे २७0 रूपये चोरी करुन ते कारखानदारांच्या घरात जातात.
सरकारचा कर बुडवला जातो. सरकार व शेतकर्‍यांची फसवणूक करुन बिनशिक्क्यांचे पोते बाजारात विकून तो पैसा निवडणुकीत वापरला जातो. एकाच काट्यावर साखर, ऊस व रिकाम्या तसेच भरलेल्या ट्रकचे वजन होत नाही, हेच यामागचे इंगित आहे. ही चोरी थांबविण्यासाठी आपल्या प्रयत्नातून देशभरात खासदार निधीतून सहकारी साखर कारखान्यांसमोर इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे बसविण्यास सुरुवात झाली आहे. आता आमचे सरकार आल्यामुळे आमदार निधीही यासाठी देण्याची मागणी आहे. जो आमदार त्यासाठी निधी देणार नाही, तो काटामारांना सामील असल्याचे समजण्यात येईल. नगर जिल्ह्यातील उतारा चोरी थांबल्यास १२.५0 टक्क्यांपेक्षा जास्त उतारा मिळून शेतकर्‍यांनाही जादा भाव मिळेल. 
यंदाच्या हंगामासाठी १५ दिवसात विनाकपात पहिली उचल २७00 रूपये प्रतिटन मिळाली पाहिजे. ही आमची मागणी नियमाप्रमाणे आहे. या मागणीसाठी २५ नोव्हेंबरला पुण्यातील साखर आयुक्तालयावर शेतकर्‍यांचा आसूड मोर्चा नेला जाणार आहे. पूर्वीचे सरकार ऐकत नव्हते.
आताचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला हा मोर्चा काढावा लागणार नसल्याचे सांगून चर्चेसाठी लगेचच हात पुढे केला आहे. राज्यात २0 टक्के दूध भेसळ करणारे राजकारणी आहेत. त्यांच्या मुसक्या बांधल्यास शेतकर्‍याच्या दुधाला योग्य भाव मिळेल. शरद पवारांनी अलिबागच्या शिबिरात माझ्या दूध संस्थेचा विषय काढला. माझ्या संस्थेचे दररोज ७0 हजार लीटर संकलन असून प्रति लीटर २३.५0 रूपये दर देत आहे. पवारांनी सहकारी साखर कारखान्यांचा परवाना मिळणार नाही, अशी व्यवस्था करून ठेवली आहे, अन्यथा त्यांना कारखानाही काढून दाखवला असता', असे आव्हानही त्यांनी पवारांनादिले. 
चंद्रकांत उंडे यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे यांनी प्रास्ताविक केले. माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत, प्रकाश देठे, प्रभावती घोगरे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर यांची भाषणे झाली. माजी आमदार दौलतराव पवार, हेरंब औटी, गुलाबराव डेरे आदी यावेळी हजर होते. (प्रतिनिधी) 
 
■ राज्यातील कारखानदारांनी एम.आर. पी. पेक्षा कमी भाव दिल्यास त्यांना बेड्या घालू. शेतकर्‍यांचे प्रश्न हे सरकार सोडवणार नसेल, तर त्यांनाही माफ करणार नाही. प्रसंगी ५ वर्षे रस्त्यावर राहू. ऊसप्रश्नी सरकारला २५ पर्यंत मुदत दिली आहे. साखरेच्या सट्टाबाजारांशी शरद पवारांचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांनीच मुद्दाम साखरेचे भाव पाडले. आता उसाला भाव मिळत नाही म्हणून भाजपा सरकारला बदनाम करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. 
- सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी संघटना. भाव पवारांनीच पाडले