शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महाराष्ट्रात साखरेचे भाव शरद पवार यांनीच पाडले

By admin | Updated: November 20, 2014 11:41 IST

अहमदनगर जिल्ह्यातील काळे, कोल्हेंसह सगळे कारखानदार काटामार, उताराचोर आहेत, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी येथे केला.

 महाराष्ट्रात साखरेचे भाव शरद पवार यांनीच पाडले

 
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील काळे, कोल्हेंसह सगळे कारखानदार काटामार, उताराचोर आहेत, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी येथे केला.
संघटनेच्या वतीने आयोजित ऊस व दूध परिषदेत ते बोलत होते. कोल्हापूरच्या साखर कारखान्यांचा जादा उतारा निघत असताना अहमदनगर जिल्ह्याचा साखर उतारा १२ टक्क्यांपेक्षा कमी कसा? असा सवाल करून ते म्हणाले, या जिल्ह्यातील सर्वच कारखानदार उतारा चोरतात, काटा मारतात. यात काळे, कोल्हेंसह सगळेच सामील आहेत. १ टक्के उतारा चोरणे म्हणजे १0 किलो साखर चोरणे. त्यामुळे टनामागे २७0 रूपये चोरी करुन ते कारखानदारांच्या घरात जातात.
सरकारचा कर बुडवला जातो. सरकार व शेतकर्‍यांची फसवणूक करुन बिनशिक्क्यांचे पोते बाजारात विकून तो पैसा निवडणुकीत वापरला जातो. एकाच काट्यावर साखर, ऊस व रिकाम्या तसेच भरलेल्या ट्रकचे वजन होत नाही, हेच यामागचे इंगित आहे. ही चोरी थांबविण्यासाठी आपल्या प्रयत्नातून देशभरात खासदार निधीतून सहकारी साखर कारखान्यांसमोर इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे बसविण्यास सुरुवात झाली आहे. आता आमचे सरकार आल्यामुळे आमदार निधीही यासाठी देण्याची मागणी आहे. जो आमदार त्यासाठी निधी देणार नाही, तो काटामारांना सामील असल्याचे समजण्यात येईल. नगर जिल्ह्यातील उतारा चोरी थांबल्यास १२.५0 टक्क्यांपेक्षा जास्त उतारा मिळून शेतकर्‍यांनाही जादा भाव मिळेल. 
यंदाच्या हंगामासाठी १५ दिवसात विनाकपात पहिली उचल २७00 रूपये प्रतिटन मिळाली पाहिजे. ही आमची मागणी नियमाप्रमाणे आहे. या मागणीसाठी २५ नोव्हेंबरला पुण्यातील साखर आयुक्तालयावर शेतकर्‍यांचा आसूड मोर्चा नेला जाणार आहे. पूर्वीचे सरकार ऐकत नव्हते.
आताचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला हा मोर्चा काढावा लागणार नसल्याचे सांगून चर्चेसाठी लगेचच हात पुढे केला आहे. राज्यात २0 टक्के दूध भेसळ करणारे राजकारणी आहेत. त्यांच्या मुसक्या बांधल्यास शेतकर्‍याच्या दुधाला योग्य भाव मिळेल. शरद पवारांनी अलिबागच्या शिबिरात माझ्या दूध संस्थेचा विषय काढला. माझ्या संस्थेचे दररोज ७0 हजार लीटर संकलन असून प्रति लीटर २३.५0 रूपये दर देत आहे. पवारांनी सहकारी साखर कारखान्यांचा परवाना मिळणार नाही, अशी व्यवस्था करून ठेवली आहे, अन्यथा त्यांना कारखानाही काढून दाखवला असता', असे आव्हानही त्यांनी पवारांनादिले. 
चंद्रकांत उंडे यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे यांनी प्रास्ताविक केले. माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत, प्रकाश देठे, प्रभावती घोगरे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर यांची भाषणे झाली. माजी आमदार दौलतराव पवार, हेरंब औटी, गुलाबराव डेरे आदी यावेळी हजर होते. (प्रतिनिधी) 
 
■ राज्यातील कारखानदारांनी एम.आर. पी. पेक्षा कमी भाव दिल्यास त्यांना बेड्या घालू. शेतकर्‍यांचे प्रश्न हे सरकार सोडवणार नसेल, तर त्यांनाही माफ करणार नाही. प्रसंगी ५ वर्षे रस्त्यावर राहू. ऊसप्रश्नी सरकारला २५ पर्यंत मुदत दिली आहे. साखरेच्या सट्टाबाजारांशी शरद पवारांचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांनीच मुद्दाम साखरेचे भाव पाडले. आता उसाला भाव मिळत नाही म्हणून भाजपा सरकारला बदनाम करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. 
- सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी संघटना. भाव पवारांनीच पाडले