शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आधार नोंदणीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर ; उ. प्र. अव्वल

By admin | Updated: December 28, 2015 03:48 IST

रेशनिंग, रॉकेल आणि गॅस अनुदानासाठी सक्ती असलेल्या आधार कार्ड नोंदणी प्रक्रियेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर असून, उत्तर प्रदेशात सर्वाधिक नोंदणीची नोंद करण्यात आली आहे.

चेतन ननावरे. मुंबईरेशनिंग, रॉकेल आणि गॅस अनुदानासाठी सक्ती असलेल्या आधार कार्ड नोंदणी प्रक्रियेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर असून, उत्तर प्रदेशात सर्वाधिक नोंदणीची नोंद करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०१५ पर्यंत झालेल्या नोंदणी प्रक्रियेत राज्यात १० कोटी १४ लाख २६ हजार ३७० लोकांनी नोंदणी केल्याचे निदर्शनास आले आहे.सर्वाधिक नोंदणी करणाऱ्या राज्यात उत्तर प्रदेशचे नाव पहिले असून यूपीमध्ये एकूण १३ कोटी ३२ लाख ५१ हजार ९१४ लोकांनी नोंदणी केल्याचा माहिती आहे. यूपीमध्ये सुमारे २१ कोटी ११ लाख ५ हजार ३८१ लोक राहत असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यानुसार ही टक्केवारी ६३.१ टक्के इतकी कमी आहे, याउलट महाराष्ट्रात ११ कोटी ८८ लाख ६१ हजार ४२७ नागरिक राहत असल्याचा अंदाज असून, त्यानुसार राज्यातील नोंदणीचे प्रमाण ८५.३ टक्के इतके आहे.आसाम आणि मेघालय राज्यांनी केंद्र सरकारच्या आवाहनाकडे पाठ फिरवली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये २ टक्क्यांहून कमी नोंदणी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आसाममध्ये सुमारे ३ कोटी २९ लाख ६८ हजार ९९७ लोक राहत असून, त्यातील केवळ ६ लाख ४१ हजार १९८ नागरिकांनी आधार कार्ड नोंदणी केली आहे. हे प्रमाण १.९ टक्के इतके आहे, तर मेघालयमध्ये सर्वात कमी नोंदणी झाली असून, येथील सुमारे ३१ लाख ३५ हजार १५० लोकांमधील केवळ ५७ हजार ०२० लोकांनी नोंदणी केली आहे. याचाच अर्थ, फक्त १.८ टक्के लोकांनीच नोंदणी करण्याची तसदी घेतली आहे. पूर्वेकडील राज्यांची नोंदणीकडे पाठपूर्वेकडील राज्यांमधून आधार कार्ड नोंदणीस अल्प प्रतिसाद मिळाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यात प्रामुख्याने मेघालय, आसाम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर या राज्यांचा समावेश आहे. यामधील मणिपूर वगळता, एकाही राज्यामध्ये ५० टक्क्यांहून अधिक नोंदणी झालेली नाही.