शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

महाराष्ट्र, मध्य प्रदेशात सर्वाधिक बालगुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2017 00:39 IST

देशात दरवर्षी बालगुन्ह्यांची सरासरी ३५ हजार प्रकरणे समोर येतात. यातील एक तृतीयांशहून अधिक प्रकरणे केवळ महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील असतात

नितीन अग्रवाल / नवी दिल्ली देशात दरवर्षी बालगुन्ह्यांची सरासरी ३५ हजार प्रकरणे समोर येतात. यातील एक तृतीयांशहून अधिक प्रकरणे केवळ महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील असतात, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज गंगाराम अहिर यांनी बुधवारी लोकसभेत दिली. किशोरवयीन मुलांकडून गुन्हे होण्याचे सर्वाधिक प्रकार महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात घडत आहेत. भाजपचे कपिल पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना अहिर यांनी लोकसभेत ही माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या तीन वर्षांत देशभरात एकूण १,३३,१२१ किशोरवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. यात महाराष्ट्रातील २२,६१० आणि मध्यप्रदेशातील २३,०३७ मुलांचा समावेश होता. २०१३ च्या तुलनेत २०१४ आणि २०१५ मध्ये दोन्ही राज्यांत बालगुन्ह्यांच्या प्रमाणात थोडी घट झाली आहे. यादरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांच्या संख्येत मध्यप्रदेशमध्ये वाढ, तर महाराष्ट्रात घट झाली. मुलांमधील गुन्हेगारी प्रवृत्तीमागील कारणांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अहिर म्हणाले की, सरकारने याबाबत कोणताही अभ्यास केलेला नाही. बालसुधारगृहांची स्थिती सुधारण्यासाठी गेल्या वर्षी १५ जानेवारीपासून नवा कायदा आणण्यात आला आहे, असेही हंसराज अहिर म्हणाले.