शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर - प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 05:08 IST

जगभरात आर्थिक मंदीचे सावट असतानाही भारताबरोबरच महाराष्ट्रही परदेशी गुंतवणुकीत आघाडीवर आहे.

मुंबई : जगभरात आर्थिक मंदीचे सावट असतानाही भारताबरोबरच महाराष्ट्रही परदेशी गुंतवणुकीत आघाडीवर आहे. देशात होणाऱ्या आर्थिक गुंतवणुकीच्या ५० टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात होत असल्याचे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. ‘लोकमत’ एक्सलन्स अ‍ॅवॉडर््स या दिमाखदार सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून प्रभू बोलत होते. उद्योग आणि राजकारण करताना ‘लोकमत’ची साथ लागतेच हे मनोमन पटल्याचे त्यांनी या वेळी आवर्जून नमूद केले. त्यामुळेच उद्योग, सेवा क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्यांना मिळालेला हा सन्मान महत्त्वाचा टप्पा असून, त्याविषयी त्यांचे कौतुक असल्याचे ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांपेक्षा कमी काळात देशाचे उज्ज्वल चित्र जगभर निर्माण केले आहे. त्यामुळे देशात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बदलत्या लोकमतामुळेही गुंतवणूक वाढली आहे. येत्या काळात आपली अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर अग्रस्थानी असणार आहे. पुढच्या काळात जगातील प्रगत देशांसोबत महाराष्ट्राचीही तुलना केली जाईल, असा आशावादही त्यांनी या वेळी व्यक्त केला. प्रभू पुढे म्हणाले की, उद्योग-धंद्यांबरोबरच आता सेवाक्षेत्र विकसित होत आहे. गुंतवणुकीत या क्षेत्राचा वाटा ६० टक्के इतका आहे. भविष्यात हा वाटा आणखी वाढेल, अशी आशा आहे. उत्पादकता नव्हेतर, सेवाक्षेत्रात गुंतवणूक वाढली पाहिजे. त्यामुळे आता शेतीबरोबरच शेतकऱ्यांचा विकास यावर मुख्यमंत्र्यांनी धोरण आखले आहे. गेल्या ५० वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांचा विकास झालेला नाही, त्याकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कृतिशील धोरण राबवित आहेत. आपल्याकडे उद्योजकतेला पूरक वातावरण असल्यामुळे भविष्यातही गुंतवणूक वाढेल. चीनमध्ये उद्योजकता वाढविण्यासाठी सरकार पायाभूत सुविधांकडे लक्ष पुरवित आहे. पण, मुळात उद्योजकता असण्याची गरज असते. आपल्याकडे उद्योजकता अधिक असल्यामुळे गुंतवणूक होते, असेही प्रभू शेवटी म्हणाले. (प्रतिनिधी)>‘...नाहीतर जेवायला मिळणार नाही’महाराष्ट्र, मुंबईबद्दल बोलत असताना गोव्याबद्दलही बोलले पाहिजे. माझी बायको गोव्याची आहे, नाहीतर घरी गेल्यावर जेवण मिळणार नाही, असे प्रभू म्हणताच हास्याची लकेर उमटली. गोवा, महाराष्ट्र ही भावंडे आहेत. राज्याला ७२० किमीची किनारपट्टी लाभलेली आहे. त्यामुळे गोव्यातील पर्यटनाप्रमाणेच महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास व्हायला हवा, असेही ते म्हणाले. >‘देशांतर्गत पर्यटन वाढावे’पर्यटन क्षेत्राचा विकास होण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न होत आहेत, मात्र आता देशांतर्गत पर्यटन वाढीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. देशांतर्गत पर्यटन वाढल्यावर जगाच्या कानाकोपऱ्यांतून पर्यटक आपल्याकडे आकर्षित होतील, अशी अपेक्षा प्रभू यांनी या वेळी व्यक्त केली.