शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर - प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 05:08 IST

जगभरात आर्थिक मंदीचे सावट असतानाही भारताबरोबरच महाराष्ट्रही परदेशी गुंतवणुकीत आघाडीवर आहे.

मुंबई : जगभरात आर्थिक मंदीचे सावट असतानाही भारताबरोबरच महाराष्ट्रही परदेशी गुंतवणुकीत आघाडीवर आहे. देशात होणाऱ्या आर्थिक गुंतवणुकीच्या ५० टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात होत असल्याचे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. ‘लोकमत’ एक्सलन्स अ‍ॅवॉडर््स या दिमाखदार सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून प्रभू बोलत होते. उद्योग आणि राजकारण करताना ‘लोकमत’ची साथ लागतेच हे मनोमन पटल्याचे त्यांनी या वेळी आवर्जून नमूद केले. त्यामुळेच उद्योग, सेवा क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्यांना मिळालेला हा सन्मान महत्त्वाचा टप्पा असून, त्याविषयी त्यांचे कौतुक असल्याचे ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांपेक्षा कमी काळात देशाचे उज्ज्वल चित्र जगभर निर्माण केले आहे. त्यामुळे देशात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बदलत्या लोकमतामुळेही गुंतवणूक वाढली आहे. येत्या काळात आपली अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर अग्रस्थानी असणार आहे. पुढच्या काळात जगातील प्रगत देशांसोबत महाराष्ट्राचीही तुलना केली जाईल, असा आशावादही त्यांनी या वेळी व्यक्त केला. प्रभू पुढे म्हणाले की, उद्योग-धंद्यांबरोबरच आता सेवाक्षेत्र विकसित होत आहे. गुंतवणुकीत या क्षेत्राचा वाटा ६० टक्के इतका आहे. भविष्यात हा वाटा आणखी वाढेल, अशी आशा आहे. उत्पादकता नव्हेतर, सेवाक्षेत्रात गुंतवणूक वाढली पाहिजे. त्यामुळे आता शेतीबरोबरच शेतकऱ्यांचा विकास यावर मुख्यमंत्र्यांनी धोरण आखले आहे. गेल्या ५० वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांचा विकास झालेला नाही, त्याकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कृतिशील धोरण राबवित आहेत. आपल्याकडे उद्योजकतेला पूरक वातावरण असल्यामुळे भविष्यातही गुंतवणूक वाढेल. चीनमध्ये उद्योजकता वाढविण्यासाठी सरकार पायाभूत सुविधांकडे लक्ष पुरवित आहे. पण, मुळात उद्योजकता असण्याची गरज असते. आपल्याकडे उद्योजकता अधिक असल्यामुळे गुंतवणूक होते, असेही प्रभू शेवटी म्हणाले. (प्रतिनिधी)>‘...नाहीतर जेवायला मिळणार नाही’महाराष्ट्र, मुंबईबद्दल बोलत असताना गोव्याबद्दलही बोलले पाहिजे. माझी बायको गोव्याची आहे, नाहीतर घरी गेल्यावर जेवण मिळणार नाही, असे प्रभू म्हणताच हास्याची लकेर उमटली. गोवा, महाराष्ट्र ही भावंडे आहेत. राज्याला ७२० किमीची किनारपट्टी लाभलेली आहे. त्यामुळे गोव्यातील पर्यटनाप्रमाणेच महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास व्हायला हवा, असेही ते म्हणाले. >‘देशांतर्गत पर्यटन वाढावे’पर्यटन क्षेत्राचा विकास होण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न होत आहेत, मात्र आता देशांतर्गत पर्यटन वाढीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. देशांतर्गत पर्यटन वाढल्यावर जगाच्या कानाकोपऱ्यांतून पर्यटक आपल्याकडे आकर्षित होतील, अशी अपेक्षा प्रभू यांनी या वेळी व्यक्त केली.