शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे मिळाला बुस्ट, आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताची लष्करी रँकिंग वाढली!
2
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
3
एकतर्फी प्रेमातून मुलाचं 'LIVE Suicide', आधी पेट्रोल ओतून पेटून घेतलं, मग रुग्णालयाच्या छतावरून मारली उडी
4
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
5
SMAT 2025 : आयुष म्हात्रेचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
7
IND vs SA ODI Series : टेस्टमध्ये नापास! इथं पाहा गंभीर 'गुरुजीं'चं वनडेतील 'प्रगतीपुस्तक'
8
११ जहाल नलक्षवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण; हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा
9
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
10
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
11
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
12
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
13
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
14
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
15
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
16
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
17
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
18
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
19
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
20
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुद्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र सरकार असंवेदनशील

By admin | Updated: April 24, 2017 03:24 IST

राज्यातील सरकार हे शेतकरी, दलित, कष्टकरी आणि कामगार वर्गासाठी असंवेदनशील असल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष

कोल्हापूर : राज्यातील सरकार हे शेतकरी, दलित, कष्टकरी आणि कामगार वर्गासाठी असंवेदनशील असल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी येथे केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी गरजेची आहे; पण ही कर्जमाफी स्वप्नच राहणार असे वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे आयोजित कार्यक्रमासाठी प्रा. कवाडे कोल्हापुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, गेल्या अडीच वर्षांपासून आम्ही शेतकऱ्याचा सात-बारा उतारा कोरा करावा, अशी मागणी लावून धरली आहे. सरकारकडे नागपूर ते मुंबई महामार्ग करण्यासाठी तसेच मुंबई ते गुजरातपर्यंत बुलेट ट्रेन चालविण्यासाठी पैसे आहेत; पण शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी पैसे नाहीत, असे सांगितले जाते, हे दुर्दैव आहे.दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्यांबाबतही प्रा. कवाडे यांनी शासनाला टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले, या प्रकरणी सरकारी यंत्रणेला आरोपी माहीत आहेत; पण ते विचारधारेशी संबंधित असल्याने त्या आरोपींना सरकार पकडत नाही, ही शोकांतिका आहे. देशभर बॉम्बस्फोट घडवीत असणाऱ्या ‘सनातन’ संस्थेवर ‘आरएसएस’च्या दबावामुळे शासन बंदी आणू शकत नाही. आरक्षणासाठी मराठासह ओबीसी समाजाचे सुमारे साडेपाच कोटी लोक मोर्चाच्या निमित्ताने रस्त्यांवर उतरले; पण त्याचा शासनाने कोणताही विचार केला नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)