शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

महाराष्ट्र सरकार असंवेदनशील

By admin | Updated: April 24, 2017 03:24 IST

राज्यातील सरकार हे शेतकरी, दलित, कष्टकरी आणि कामगार वर्गासाठी असंवेदनशील असल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष

कोल्हापूर : राज्यातील सरकार हे शेतकरी, दलित, कष्टकरी आणि कामगार वर्गासाठी असंवेदनशील असल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी येथे केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी गरजेची आहे; पण ही कर्जमाफी स्वप्नच राहणार असे वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे आयोजित कार्यक्रमासाठी प्रा. कवाडे कोल्हापुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, गेल्या अडीच वर्षांपासून आम्ही शेतकऱ्याचा सात-बारा उतारा कोरा करावा, अशी मागणी लावून धरली आहे. सरकारकडे नागपूर ते मुंबई महामार्ग करण्यासाठी तसेच मुंबई ते गुजरातपर्यंत बुलेट ट्रेन चालविण्यासाठी पैसे आहेत; पण शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी पैसे नाहीत, असे सांगितले जाते, हे दुर्दैव आहे.दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्यांबाबतही प्रा. कवाडे यांनी शासनाला टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले, या प्रकरणी सरकारी यंत्रणेला आरोपी माहीत आहेत; पण ते विचारधारेशी संबंधित असल्याने त्या आरोपींना सरकार पकडत नाही, ही शोकांतिका आहे. देशभर बॉम्बस्फोट घडवीत असणाऱ्या ‘सनातन’ संस्थेवर ‘आरएसएस’च्या दबावामुळे शासन बंदी आणू शकत नाही. आरक्षणासाठी मराठासह ओबीसी समाजाचे सुमारे साडेपाच कोटी लोक मोर्चाच्या निमित्ताने रस्त्यांवर उतरले; पण त्याचा शासनाने कोणताही विचार केला नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)