शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

महाराष्ट्र ‘गार’पटला

By admin | Updated: April 12, 2015 02:40 IST

राज्याच्या बहुतांश भागाला शनिवारी अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपून काढले़ गेल्या चोवीस तासांत १३ जणांचा बळी गेला

चोवीस तासांत १३ बळी : आंबा, गहू, ज्वारीचे नुकसान; राज्यभरात अवकाळीचे थैमानमुंबई : राज्याच्या बहुतांश भागाला शनिवारी अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपून काढले़ गेल्या चोवीस तासांत १३ जणांचा बळी गेला असून, शुक्रवारी पाच जणांचा वीज पडून मृत्यू झाला होता़ तर शनिवारी विविध भागांत वीज कोसळून सहा जणांचा, तर अन्य घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला़ यामध्ये बीडमध्ये तीन, बुलडाणा दोन, तर औरंगाबाद, अकोला आणि नंदुरबारमध्ये प्रत्येकी एकाचा समावेश आहे़ पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात गारपिटीसह अवकाळीचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याला शनिवारी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला़ बीड, परभणीत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे कांदा, आंबा, गहू, ज्वारी व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे़ बीड जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने दाणादाण उडविली. वीज पडून औरंगाबादजवळ शेख शमशाद शेख तय्यब (२२) या शेतमजूर महिलेचा, बीड जिल्ह्यात श्रीराम सोपान पाचनकर (४२), दत्ता खाडे (१८) यांचा मृत्यू झाला़ बीडच्या पाटोदा तालुक्यात भिंत पडून शकुंतला रायचंद संचेती (७०) ही महिला मृत्युमुखी पडली़ परभणी आणि जालना जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)कर्नाटक ते लक्षद्वीपपर्यंत कमी दाबाचा पट्टागुजरातवर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे, त्याचबरोबर दक्षिण गुजरातपासून महाराष्ट्र, कर्नाटक ते लक्षद्वीपपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे बाष्पयुक्त वारे ओढले जात असून, त्यातून राज्यात अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे.सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, वडूजमध्ये लिंबूच्या आकाराच्या गाराही पडल्या.पश्चिम वऱ्हाडला अवकाळी पावसाने शनिवारी दुपारी पुन्हा एकदा झोडपले. वीज पडून लोणार तालुक्यात गजानन चोरमारे (३२) हा ठार झाला़ मलकापूर येथे वादळी वाऱ्याने टीनपत्रे उडून शे़ हुसेन शे़ ग्यासोद्दीन याचा दुर्दैवी मृत्यू झाला़ खान्देशात वादळी पावसासह काही ठिकाणी गारपीट झाली. नंदुरबार जिल्ह्यातील बामखेडा येथे वीज पडून देवीदास भिका ठाकरे हा मजूर ठार झाला. भुसावळ, चाळीसगावसह बोदवड येथे पावसासह गारपीट झाली.