शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

महाराष्ट्राला विनाशकारी भूकंपाचा धोका नाही

By admin | Updated: April 11, 2016 02:39 IST

हिंदूकुश पर्वताच्या भागात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपाने दिल्लीसह उत्तर भारताच्या मोठ्या भागाला हादरून सोडले असले तरी महाराष्ट्राला कोणताही धोका नाही.

नितीन अग्रवाल,  नवी दिल्लीहिंदूकुश पर्वताच्या भागात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपाने दिल्लीसह उत्तर भारताच्या मोठ्या भागाला हादरून सोडले असले तरी महाराष्ट्राला कोणताही धोका नाही. केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या काही भागाला संवेदनशील मानले; मात्र भूगर्भीय हालचालींच्यादृष्टीने ही स्थिती सर्वात कमी धोकादायक मानली जाते.भूकंपाचा धोका पाहू जाता देशाला चार झोनमध्ये विभाजित करण्यात आल्याचे भूविज्ञान मंत्रालयाचे दस्तऐवज सांगतात. यातील पाचवा झोन सर्वाधिक धोकादायक असून, दुसऱ्या झोनला कमी धोकादायक मानले जाते. > संवेदनशील १०७ शहरांच्या यादीत मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणेही...भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएस) अहवालात भूकंपाबद्दल संवेदनशील अशा १०७ शहरांची यादी तयार करण्यात आली असून त्यात मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, तारापूर आणि ठाणे या शहरांचा समावेश आहे. ही शहरे कमी संवेदनशील अशा दुसऱ्या आणि तिसऱ्या झोनमध्ये येत असल्यामुळे भूकंपाचा धोकाही कमी आहे. बीआयएसने महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीच्या काही भागाला धोकादायक अशा झोन चारमध्ये ठेवले आहे. या झोनमध्ये जम्मू-काश्मीर, हिमाचल, दिल्ली, सिक्कीम, उत्तर प्रदेश, बिहार आणि प. बंगालचा उत्तर भाग, गुजरात आणि राजस्थानचा समावेश आहे> सर्वाधिक धोकादायक झोनमध्ये जम्मू-काश्मीर, हिमाचलजम्मू-काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड, गुजरातचे रण (कच्छ), उत्तर बिहारचा काही भाग आणि अंदमान-निकोबार बेटाचा समावेश सर्वाधिक धोकादायक अशा झोन पाचमध्ये आहे. केरळ, गोवा, लक्षद्वीप, पंजाबचा काही भाग, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, ओडिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा काही भाग, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, प. बंगाल, राजस्थानसह उर्वरित भाग कमी धोकादायक अशा झोन तीन आणि दोनमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. भूकंपाच्या संकट निर्देशांकाची गणना भूवैज्ञानिक आणि भूआकृतिविज्ञानासह एकूण ७ मानकांच्या आधारे करण्यात आली आहे. बीआयएसने भूकंपामुळे इमारतींना होणारा धोका टाळण्यासाठी भूकंपविरोधी इमारतींचे डिझाईन तयार केले आहे. सध्याच्या इमारतींना भूकंपरोधक बनविण्यासाठी रिट्रोफिटिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.