शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राने पवारांना तो सन्मान दिला नाही, रामराजे नाईक निंबाळकर यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 04:15 IST

देशातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व असणाºया शरद पवार यांनी महाराष्ट्राला इतके काही दिले की त्याची मोजदाद करता येणार नाही. राज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान मिळवून देणारे हे व्यक्तिमत्व. पण, महाराष्ट्राने या व्यक्तिमत्त्वाची त्याप्रमाणात कदर केली नाही.

मुंबई : देशातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व असणाºया शरद पवार यांनी महाराष्ट्राला इतके काही दिले की त्याची मोजदाद करता येणार नाही. राज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान मिळवून देणारे हे व्यक्तिमत्व. पण, महाराष्ट्राने या व्यक्तिमत्त्वाची त्याप्रमाणात कदर केली नाही. त्यांना त्या सन्मानापर्यंत (पंतप्रधान पदापर्यंत) पोहोचवले नाही. त्यांना अपयश दिले, अशी खंत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.शरद पवार तसेच गणपतराव देशमुख यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विधान परिषदेत या दोन्ही नेत्यांचा गौरव करणारा ठराव संमत करण्यात आला. त्यावर निंबाळकर बोलत होते. शरद पवार व गणपतरावांचा विधिमंडळात राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या उपस्थितीत गौरव करावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे सदस्य सुनील तटकरे यांनी केली.राजकारणात यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर राहिलेले शरद पवार यशवंतरावांबरोबर काँग्रेसमध्ये परत गेले नाहीत. हा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पुरोगामी लोकशाही दलाच्या सरकारचे मुख्यमंत्री पवार यांना राजधानी दिल्लीत बोलावले. संजय गांधी यांच्याबरोबर काम करावे, अशी सूचना इंदिराजींनी केली. पण, पवार यांनी धाडस दाखवत काँग्रेसमध्ये परतण्यास नकार दिला. त्यामुळे दुसºयाच दिवशी त्यांचे सरकार बरखास्त झाल्याची आठवण तटकरे यांनी करून दिली.गणपतराव देशमुख यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना हे संपूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास असलेले चालते बोलते विद्यापीठ आहे असे गौरोवोद्गार मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी काढले. देशमुख यांची धेयनिष्ठा, तत्वनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचा हा गौरव असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.महाराष्ट्र आणि देशाचे राजकारण, समाजकारण, क्रीडा, साहित्य सर्वच क्षेत्रातील शरद पवार यांचे कार्य प्रत्येकाला अभिमान वाटावा असे आहे, असे गौरवोद्गार काँग्रेस सदस्य नारायण राणे यांनी काढले. या देशातील युवकांसाठी त्यांचे जीवन मार्गदर्शक ठरणारे आहे. शरद पवार म्हणजे या देशातील राजकारण आणि विकासाचे चालते बोलते विद्यापीठ आहेत. एकाच वेळी इतक्या क्षेत्रात काम करणारे पवार म्हणजे पीएचडीचा विषय आहे, असेही राणे म्हणाले.उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कपिल पाटील, जोगेंद्र कवाडे, नीलम गोºहे आदींनी या प्रस्तावाला पाठिंबा देताना आपले विचार मांडले.