शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातच्या छायेत महाराष्ट्र

By admin | Updated: May 10, 2015 00:09 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने एक वर्ष पूर्ण केले. या काळात महाराष्ट्राच्या पदरात काय पडले? मराठी माणसाला ‘अच्छे दिन’ आले का?

 संदीप प्रधान -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने एक वर्ष पूर्ण केले. या काळात महाराष्ट्राच्या पदरात काय पडले? मराठी माणसाला ‘अच्छे दिन’ आले का? केंद्रात आणि महाराष्ट्रात यापूर्वी १० वर्षे एकाच पक्षाचे सरकार होते. त्या सरकारमध्ये आणि आताच्या सरकारमध्ये गुणात्मकदृष्ट्या काही फरक आहे का? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला तर एक गोष्ट कबूल करायला हवी ती अशी की, सरकार हा असा अजस्त्र डायनॉसॉर आहे की त्यामध्ये तत्काळ बदल करणे हे इतके सहजसाध्य काम नाही. राजकारणातील तेच परस्परविरोध, नोकरशाहीच्या अंगी मुरलेला तोच निबरपणा, कार्यकर्त्यांमधील लोचटपणाचा स्थायीभाव, जनतेच्या पराकोटीच्या वाढलेल्या (किंवा मोदींनी वाढवून ठेवलेल्या) अपेक्षांचे ओझे यातून हा सरकाररूपी डायनॉसॉरवाटचाल करतो तेव्हा त्याची गती जलद होण्यास म्हणजेच माणसाळण्यास विलंब लागतो.केंद्रातील सरकार वर्ष पूर्ण करीत असताना गेल्या काही दिवसांत दोन ठळक वाद नजरेस आले. त्यातील पहिला गारपिटीमुळे केवळ ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी सभागृहात केलेले वक्तव्य व त्यावरून उठलेली आरोप-प्रत्यारोपांची राळ तर दुसरा अवकाळी पावसाने महाराष्ट्रात किती नुकसान झाले याचा अहवाल महाराष्ट्र सरकारकडून प्राप्त झाला नसल्याचा त्याच राधामोहन सिंह यांनी केलेला खुलासा व त्यावरून सरकारची झालेली गोची हे आहेत. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असताना आणि या सरकारची सूत्रे नरेंद्र मोदी यांच्यासारख्या करड्या शिस्तीच्या पंतप्रधानांच्या हातात असताना महाराष्ट्रातील सरकारवर दोषारोप ठेवला जातो हेच या दोन सरकारांमध्ये पुरेसा संवाद व समन्वय नसल्याचा ढळढळीत पुरावा आहे.विशेष करून सत्तेत सहभागी होऊन विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेच्या हाती कोलीत देण्याचा हा प्रकार आहे. केंद्रात व राज्यात भाजपा सरकार असल्याने काही प्रमाणात फरक पडल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे सहकारी करतात. पर्यावरणाशी संबंधित समित्या गेल्या दोन वर्षे झाल्या नव्हत्या. त्यांना पर्यावरण खाते महाराष्ट्रातील प्रकाश जावडेकर यांच्याकडे असल्याने मंजुरी मिळाली.यामुळे अरबी समुद्रात उभे केले जाणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व इंदू मिलच्या जमिनीवर उभे राहणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक यांना गती लाभेल, असे वाटते. एकीकडे हे सकारात्मक पाऊल पडत असताना राज्यातील पर्यावरण खात्यात हजारो फायली गेली तीन वर्षे पडून आहेत, हे वास्तव नजरेआड करता येणार नाही. नवी मुंबई विमानतळाच्या आठ मंजुऱ्या मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व संबंधितांशी संपर्क साधल्यावर १५ दिवसांत प्राप्त झाल्याचा सरकारचा दावा आहे. राज्यातील तीन बंदरे रेल्वेमार्गाने जोडण्याचा निर्णयही असाच केंद्र-राज्य समन्वयाचा परिपाक आहे.