शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

गुजरातच्या छायेत महाराष्ट्र

By admin | Updated: May 10, 2015 00:09 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने एक वर्ष पूर्ण केले. या काळात महाराष्ट्राच्या पदरात काय पडले? मराठी माणसाला ‘अच्छे दिन’ आले का?

 संदीप प्रधान -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने एक वर्ष पूर्ण केले. या काळात महाराष्ट्राच्या पदरात काय पडले? मराठी माणसाला ‘अच्छे दिन’ आले का? केंद्रात आणि महाराष्ट्रात यापूर्वी १० वर्षे एकाच पक्षाचे सरकार होते. त्या सरकारमध्ये आणि आताच्या सरकारमध्ये गुणात्मकदृष्ट्या काही फरक आहे का? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला तर एक गोष्ट कबूल करायला हवी ती अशी की, सरकार हा असा अजस्त्र डायनॉसॉर आहे की त्यामध्ये तत्काळ बदल करणे हे इतके सहजसाध्य काम नाही. राजकारणातील तेच परस्परविरोध, नोकरशाहीच्या अंगी मुरलेला तोच निबरपणा, कार्यकर्त्यांमधील लोचटपणाचा स्थायीभाव, जनतेच्या पराकोटीच्या वाढलेल्या (किंवा मोदींनी वाढवून ठेवलेल्या) अपेक्षांचे ओझे यातून हा सरकाररूपी डायनॉसॉरवाटचाल करतो तेव्हा त्याची गती जलद होण्यास म्हणजेच माणसाळण्यास विलंब लागतो.केंद्रातील सरकार वर्ष पूर्ण करीत असताना गेल्या काही दिवसांत दोन ठळक वाद नजरेस आले. त्यातील पहिला गारपिटीमुळे केवळ ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी सभागृहात केलेले वक्तव्य व त्यावरून उठलेली आरोप-प्रत्यारोपांची राळ तर दुसरा अवकाळी पावसाने महाराष्ट्रात किती नुकसान झाले याचा अहवाल महाराष्ट्र सरकारकडून प्राप्त झाला नसल्याचा त्याच राधामोहन सिंह यांनी केलेला खुलासा व त्यावरून सरकारची झालेली गोची हे आहेत. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असताना आणि या सरकारची सूत्रे नरेंद्र मोदी यांच्यासारख्या करड्या शिस्तीच्या पंतप्रधानांच्या हातात असताना महाराष्ट्रातील सरकारवर दोषारोप ठेवला जातो हेच या दोन सरकारांमध्ये पुरेसा संवाद व समन्वय नसल्याचा ढळढळीत पुरावा आहे.विशेष करून सत्तेत सहभागी होऊन विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेच्या हाती कोलीत देण्याचा हा प्रकार आहे. केंद्रात व राज्यात भाजपा सरकार असल्याने काही प्रमाणात फरक पडल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे सहकारी करतात. पर्यावरणाशी संबंधित समित्या गेल्या दोन वर्षे झाल्या नव्हत्या. त्यांना पर्यावरण खाते महाराष्ट्रातील प्रकाश जावडेकर यांच्याकडे असल्याने मंजुरी मिळाली.यामुळे अरबी समुद्रात उभे केले जाणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व इंदू मिलच्या जमिनीवर उभे राहणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक यांना गती लाभेल, असे वाटते. एकीकडे हे सकारात्मक पाऊल पडत असताना राज्यातील पर्यावरण खात्यात हजारो फायली गेली तीन वर्षे पडून आहेत, हे वास्तव नजरेआड करता येणार नाही. नवी मुंबई विमानतळाच्या आठ मंजुऱ्या मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व संबंधितांशी संपर्क साधल्यावर १५ दिवसांत प्राप्त झाल्याचा सरकारचा दावा आहे. राज्यातील तीन बंदरे रेल्वेमार्गाने जोडण्याचा निर्णयही असाच केंद्र-राज्य समन्वयाचा परिपाक आहे.