शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

महारचिकना गाव विकणे आहे !

By admin | Updated: June 28, 2014 22:38 IST

दूर्लक्ष झाल्यामुळे अखेर येथील ग्रामस्थांनी गावच विक्रीस काढले

महारचिकना : गारपिट व अवकाळी पावसामुळे येथील अनेक शेतकर्‍यांचे मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले होते. ते नुकसानग्रस्त शेतकरी आजही शासनाच्या अर्थिक मदतीपासून वंचीत आहेत. जिल्हा प्रशासनाकडे वेळोवळी निवेदने देऊनही दूर्लक्ष झाल्यामुळे अखेर येथील ग्रामस्थांनी गावच विक्रीस काढले असून, 'महारचिकना गाव विकणे आहे' असे फलकही गावात लावले आहेत.मार्च-एप्रिल २0१४ मध्ये वादळी वार्‍यासह गारपिट व अवकाळी पावसाने परिसरात थैमान घातले होते. गारपिटीमुळे महारचिकना येथील शेतकर्‍यांचे रब्बी पिकासह भाजिपाला व फळबागांचेही मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले होते. या गारपिटग्रस्त भागाचे तलाठी, ग्रामसेवक व कृषीसहाय्यकांनी सर्वेक्षण केले होते. त्यानंतर नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात येईल, असे आश्‍वासनही शेतकर्‍यांना मिळाले होते. गावात जवळपास ३७१ नुकसानग्रस्त असून, त्यातील फक्त १५0 नुकसानग्रस्तांनाच मदत मिळाली आहे. बाकीचे सर्व नुकसानग्रस्त शासनाच्या आर्थिक मदतीपासून वंचीत आहेत. मदतीपासून वंचीत असलेल्या या नुकसानग्रस्तांनी तहसिलदार व इतरही वरीष्ठ अधिकार्‍यांना मदतीची मागणी केली आहे. परंतू, कुठलेच अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. त्याचबरोबर महारचिकना गाव शासनाच्या विविध योजनांपासून वंचीत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावचा विकासही थंडबस्त्यात आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी महारचिकना गावच विक्रीस काढले आहे. गाव विक्रीनंतर येणारी रक्कम गारपिटग्रस्तांना देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.