शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

महामंडळ घेणार होते राजीनामा! - श्रीपाल सबनीस यांचा गौप्यस्फोट

By admin | Updated: January 9, 2016 04:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वक्तव्यावरून वादळ उठल्याने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मला लोकशाही पद्धतीने मिळालेल्या संमेलनाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या

श्रीपाल सबनीस यांचा गौप्यस्फोट : जीव गेला तरी राजीनामा देणार नसल्याची स्पष्टोक्तीराहुल कलाल / प्रज्ञा केळकर-सिंग,  पुणेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वक्तव्यावरून वादळ उठल्याने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मला लोकशाही पद्धतीने मिळालेल्या संमेलनाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या, असा गौप्यस्फोट ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना केला. जीव गेला तरी मी पदाचा राजीनामा देणार नाही. अशी माघार घेणे माझ्या तत्त्वात बसत नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. पंतप्रधानांबाबतच्या वक्तव्यानंतर उठलेला वाद आणि सनातन संस्थेच्या वकिलांनी केलेले ‘ट्विट’ या पार्श्वभूमीवर सबनीस यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘साहित्य महामंडळाच्या तटस्थ भूमिकेचे, छुप्या विरोधाचे आश्चर्य वाटते. संमेलनामध्येही भाषणाबाबत मला निर्बंध घालण्यात आले आहेत. परंतु, मी लोकशाही मार्गाने निवडून आलेलो आहे. समाजातील घडामोडींबाबत व्यक्त न होणे मला मान्य नाही. मी कोणत्याही एका विचारसरणीचा पुरस्कर्ता नाही. मी चुकीला विरोध करणारा आणि सत्याच्या पाठीशी उभा राहणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे स्पष्ट मत व्यक्त करण्याला मी घाबरत नाही. विचार परखडपणे व्यक्त करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला आहे. ’’संमेलनाच्या आमंत्रणासाठी सबनीसांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. मात्र, अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही. देवेंद्र फडणवीस सार्वजनिक कार्यक्रमांसाठी २ दिवस पुण्यात होते. मात्र, त्यांनी यावर भाष्य करणे टाळले. संमेलनाच्या उद्घाटनाला ते येणार की नाही, याची चर्चा आहे.श्रीपाल सबनीस कालपासून घराबाहेर पडलेले नाहीत. आज आकाशवाणीवर नियोजित मुलाखत असतानाही घरी येऊनच मुलाखत घ्या, असे त्यांनी सांगितले. काल रात्रीपासून विविध संस्था-संघटनांचे कार्यकर्ते त्यांना भेटण्यास जात आहेत. गुरुवारी रात्री साडेदहा वाजता स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी त्यांची भेट घेतली. याबाबत सबनीस म्हणाले, ‘‘मी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ता असल्याने अनेक दलित संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, दुर्दैवाने, पांढरपेशा म्हणविल्या जाणाऱ्या समाजातून कोणी साधा चौकशीचा फोनही केलेला नाही.’’राजीनाम्यातला ‘र’ही काढला नाहीसबनीस यांनी कुठल्या आधारावर हा आरोप केला आहे, याची माहिती नाही. महामंडळ म्हणून संमेलनाध्यक्षांचा राजीनामा मागण्याचा प्रश्नच येत नाही. राजीनाम्यातला ‘र’ही उच्चारलेला नाही. सबनीस यांनी हे विधान कुठल्या आधारावर केले, याची माहिती मी देऊ शकत नाही. याबाबतची माहिती त्यांच्याकडूनच समजू शकते. संमेलन ठरल्याप्रमाणे नियोजनबद्ध आणि संस्मरणीय होईल.- डॉ. माधवी वैद्य, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळगाढवावरून धिंड... सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजपाने संमेलनस्थळी त्यांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड काढली.