शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

महाड पूल सहा महिन्यांत

By admin | Updated: August 7, 2016 02:23 IST

महाड येथील घटना अतिशय दु:खद असून आम्ही त्याची जबाबदारी स्वीकारतो. १८० दिवसांत पुलाचे काम पूर्ण करू, याकरिता ३० कोटींचे टेंडर मजूर करण्यात आले आहे.

पनवेल : महाड येथील घटना अतिशय दु:खद असून आम्ही त्याची जबाबदारी स्वीकारतो. १८० दिवसांत पुलाचे काम पूर्ण करू, याकरिता ३० कोटींचे टेंडर मजूर करण्यात आले आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दोन वर्षांत पूर्ण केले जाईल. या डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिली.खारघर येथे रामशेठ ठाकूर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेजच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत ठाकूर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, उरणचे नगराध्यक्ष महेश बालदी, पनवेलच्या नगराध्यक्ष चारुशीला घरत, युवा नेते परेश ठाकूर, आय . टी . देशमुख, अरुण भगत आदी मान्यवर उपस्थित होते. आजच्या काळात संशोधनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. देशाला पुढे जायचे असेल तर तरुणांनी उच्चशिक्षण घ्यायला हवे. कोकणचा सागरी किनारा येथील विकासाचा केंद्रबिंदू ठरू शकतो. कोकणात २० हजार एकर जागेवर पोर्ट तयार करण्यात येणार आहे. यासंदर्भात पेट्रोलियम मंत्र्यांशी देखील चर्चा झाल्याचे गडकरी यांनी सांगितले. देशात जलवाहतूक तसेच पोर्ट संदर्भात अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज आहे. मालदीवसारख्या देशात पाण्यावर उतरणाऱ्या सीप्लेनची (विमान) संख्या ४७ आहे. मात्र भारतात एकही नाही. अशी विमान वाहतूक सेवा भारतात सुरू झाली तर देशांतर्गत कोठेही सहज प्रवास शक्य होणार आहे. देशात ३० लाख वाहनचालकांची कमतरता आहे. यापुढे संगणकाद्वारे वाहन चालकांची परीक्षा घेतली जाईल. तीस दिवसांत वाहनचालकाला परवाना दिला जाईल. परिवहन अधिकाऱ्याने तो परवाना दिला नाही तर त्याच्यावर कारवाईची तरतूद करण्यात येणार असल्याचेही गडकरी म्हणाले. मुंबई पुणे महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी योग्य उपाययोजना राबविल्या जाणार आहेत, असेही गडकरी यांनी नमूद केले. खारघर, पनवेल, नवी मुंबई परिसरात जास्तीत जास्त दर्जेदार शिक्षण देण्याचे काम संस्था करीत असून चांगली पिढी घडविण्याचा प्रयत्न असल्याचे संस्थेचे अध्यक्ष रामशेठ ठाकूर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ९५ टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. याकरिता कर्नाळा अभयारण्याचा अडथळाही दूर करण्यात आलेला आहे. डिसेंबर महिन्यात काम सुरू होईल व दोन वर्षांत ते पूर्ण केले जाणार आहे. दहा टप्प्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. ४७० किमीचा हा महामार्ग आहे.