शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
5
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
6
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
7
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
8
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
9
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
10
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
11
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
12
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
13
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
14
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
16
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
17
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
18
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
19
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
20
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

महाड पूल सहा महिन्यांत

By admin | Updated: August 7, 2016 02:23 IST

महाड येथील घटना अतिशय दु:खद असून आम्ही त्याची जबाबदारी स्वीकारतो. १८० दिवसांत पुलाचे काम पूर्ण करू, याकरिता ३० कोटींचे टेंडर मजूर करण्यात आले आहे.

पनवेल : महाड येथील घटना अतिशय दु:खद असून आम्ही त्याची जबाबदारी स्वीकारतो. १८० दिवसांत पुलाचे काम पूर्ण करू, याकरिता ३० कोटींचे टेंडर मजूर करण्यात आले आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दोन वर्षांत पूर्ण केले जाईल. या डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिली.खारघर येथे रामशेठ ठाकूर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेजच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत ठाकूर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, उरणचे नगराध्यक्ष महेश बालदी, पनवेलच्या नगराध्यक्ष चारुशीला घरत, युवा नेते परेश ठाकूर, आय . टी . देशमुख, अरुण भगत आदी मान्यवर उपस्थित होते. आजच्या काळात संशोधनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. देशाला पुढे जायचे असेल तर तरुणांनी उच्चशिक्षण घ्यायला हवे. कोकणचा सागरी किनारा येथील विकासाचा केंद्रबिंदू ठरू शकतो. कोकणात २० हजार एकर जागेवर पोर्ट तयार करण्यात येणार आहे. यासंदर्भात पेट्रोलियम मंत्र्यांशी देखील चर्चा झाल्याचे गडकरी यांनी सांगितले. देशात जलवाहतूक तसेच पोर्ट संदर्भात अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज आहे. मालदीवसारख्या देशात पाण्यावर उतरणाऱ्या सीप्लेनची (विमान) संख्या ४७ आहे. मात्र भारतात एकही नाही. अशी विमान वाहतूक सेवा भारतात सुरू झाली तर देशांतर्गत कोठेही सहज प्रवास शक्य होणार आहे. देशात ३० लाख वाहनचालकांची कमतरता आहे. यापुढे संगणकाद्वारे वाहन चालकांची परीक्षा घेतली जाईल. तीस दिवसांत वाहनचालकाला परवाना दिला जाईल. परिवहन अधिकाऱ्याने तो परवाना दिला नाही तर त्याच्यावर कारवाईची तरतूद करण्यात येणार असल्याचेही गडकरी म्हणाले. मुंबई पुणे महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी योग्य उपाययोजना राबविल्या जाणार आहेत, असेही गडकरी यांनी नमूद केले. खारघर, पनवेल, नवी मुंबई परिसरात जास्तीत जास्त दर्जेदार शिक्षण देण्याचे काम संस्था करीत असून चांगली पिढी घडविण्याचा प्रयत्न असल्याचे संस्थेचे अध्यक्ष रामशेठ ठाकूर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ९५ टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. याकरिता कर्नाळा अभयारण्याचा अडथळाही दूर करण्यात आलेला आहे. डिसेंबर महिन्यात काम सुरू होईल व दोन वर्षांत ते पूर्ण केले जाणार आहे. दहा टप्प्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. ४७० किमीचा हा महामार्ग आहे.