शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

महाड पूल दुर्घटना - लोकमतने ३ वर्षांपूर्वीच दिला होता इशारा

By admin | Updated: August 3, 2016 17:36 IST

महाड-पोलादपूरला जोडणा-या या पुलाच्या दुरावस्थेकडे लोकमतने तीनवर्षापूर्वीच लक्ष वेधले होते. नडगाव-राजेवाडी दरम्यानचा हा ब्रिटीशकालीन पूल अखेरची घटका मोजत होता.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३ - सावित्री नदीवरील पूल कोसळण्याच्या दुर्घटनेला सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत आहे. महाड-पोलादपूरला जोडणा-या या पुलाच्या दुरावस्थेकडे लोकमतने तीनवर्षापूर्वीच लक्ष वेधले होते. नडगाव-राजेवाडी दरम्यानचा हा ब्रिटीशकालीन पूल अखेरची घटका मोजत असून, हा पूल धोकादायक बनला आहे असे वृत्त लोकमतने ३ सप्टेंबर २०१३ च्या हॅलो रायगड पुरवणीत दिले होते.  
 
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे वृत्त लोकमतने दिले होते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वरील या पुलाची मुदत संपल्याचे ब्रिटीश एजन्सीने संबंधित यंत्रणेला सूचित केल्याच्या वृत्ताला त्यावेळी संबंधिक अधिका-यांनी दुजोरा दिला होता. पुलाच्या दगडी बांधकामामध्ये पिंपळाच्या झाडाचे साम्राज्य पसरले होते. 
 
झाडाची मुळे दगडामध्ये खोलवर रुजल्याने दगडी बांधकामामध्ये भेगा पडून ते ढासळू लागले होते. पुलाच्या काही भागात क्रॅश बॅरिअर्स बसवण्यात आले असले तरी, उर्वरित संरक्षण कठडयांचे काही दगड ढासळले होते. औद्योगिक दृष्टया रायगड आणि रत्नागिरी जिल्हा विकसित झाल्याने या पूलावरुन अवजड वाहनांची वाहतुक सुरु असायची. 
 
पूलाची क्षमता आणि ब्रिटीश एजन्सीने दिलेला इशारा लक्षात घेता हा पूल धोकादायकच होता. वेळीच दखल घ्या अन्यथा भविष्यात मोठा अनर्थ ओढवेल असा इशारा त्यावेळीच लोकमतच्या वृत्तातून देण्यात आला होता. पण प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अखेर आज तो अनर्थ ओढवलाच.