शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
4
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
5
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
6
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
7
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
8
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
9
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
10
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
11
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
12
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
13
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
15
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
16
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
17
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
18
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
19
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
20
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 

महाड दुर्घटना : आणखी एका प्रवाशाचा मृतदेह सापडला

By admin | Updated: August 10, 2016 04:31 IST

महाड येथील सावित्री नदीवरील पुल तुटून दोन एसटी बस वाहून गेल्याच्या घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांत आता आणखी एका प्रवाशाची वाढ झाली आहे

मुंबई : महाड येथील सावित्री नदीवरील पुल तुटून दोन एसटी बस वाहून गेल्याच्या घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांत आता आणखी एका प्रवाशाची वाढ झाली आहे. मृतांचा आकडा ३0पर्यंत गेला आहे. त्यामुळे अपघातग्रस्त एसटीतील ट्रायमॅक्स मशीनमध्ये नोंद न झालेल्या प्रवाशांची संख्या आठ झाली आहे. महाड येथील दुर्घटनेत मुंबईला येणाऱ्या दोन बसेस सावित्री नदीत वाहून गेल्या होत्या. या घटनेत एसटीचे दोन चालक, दोन वाहक यांच्यासह १८ प्रवासी असे एकूण २२ प्रवासी वाहून गेल्याची नोंद झाली होती. मात्र शोधमोहीम आणि तपासादरम्यान जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या माहितीत एसटीचे आणखी सात प्रवासी असल्याचे समोर आले. त्यामुळे अपघातग्रस्त एसटीतून कर्मचारी व प्रवासी मिळून २९ प्रवासी असल्याचे निदर्शनास आले. त्यातही चार जणांचे मृतदेह मिळाले; मात्र तीन जणांचे मृतदेह मिळालेले नाहीत. सात प्रवासी वाढलेले असतानाच आता आणखी एक प्रवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही एसटी बसमधून वाहून गेलेल्या प्रवाशांची संख्याही २६ एवढी झाली आहे. दोन्ही अपघातग्रस्त बसमधील वाहकांकडे असलेल्या ट्रायमॅक्स मशीनला अपघातापूर्वी दोन तास ‘रेंज’ नव्हती. त्यामुळे एसटीच्या मुख्यालय आणि त्या आगारांत असलेल्या सर्व्हरमध्ये ‘त्या’ दोन तासांत किती प्रवाशांनी प्रवास केला याची नोंद झालेली नाही. त्यामुळे एसटी महामंडळाकडून या सर्व बाबींचा तपास केला जात असल्याचे एसटीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. या दुर्घटनेसंदर्भात घेण्यात येणाऱ्या शोधमोहिमेत एसटीचे १00 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. हाती लागलेल्या प्रवाशांचे पार्थिव त्यांच्या नातेवाइकांच्या घरी पाठविण्याची व्यवस्था करतानाच सापडलेल्या एसटीच्या तुकड्यांची तपासणी केली जात आहे. (प्रतिनिधी)