शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

महाड दुर्घटना : आणखी एका प्रवाशाचा मृतदेह सापडला

By admin | Updated: August 10, 2016 04:31 IST

महाड येथील सावित्री नदीवरील पुल तुटून दोन एसटी बस वाहून गेल्याच्या घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांत आता आणखी एका प्रवाशाची वाढ झाली आहे

मुंबई : महाड येथील सावित्री नदीवरील पुल तुटून दोन एसटी बस वाहून गेल्याच्या घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांत आता आणखी एका प्रवाशाची वाढ झाली आहे. मृतांचा आकडा ३0पर्यंत गेला आहे. त्यामुळे अपघातग्रस्त एसटीतील ट्रायमॅक्स मशीनमध्ये नोंद न झालेल्या प्रवाशांची संख्या आठ झाली आहे. महाड येथील दुर्घटनेत मुंबईला येणाऱ्या दोन बसेस सावित्री नदीत वाहून गेल्या होत्या. या घटनेत एसटीचे दोन चालक, दोन वाहक यांच्यासह १८ प्रवासी असे एकूण २२ प्रवासी वाहून गेल्याची नोंद झाली होती. मात्र शोधमोहीम आणि तपासादरम्यान जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या माहितीत एसटीचे आणखी सात प्रवासी असल्याचे समोर आले. त्यामुळे अपघातग्रस्त एसटीतून कर्मचारी व प्रवासी मिळून २९ प्रवासी असल्याचे निदर्शनास आले. त्यातही चार जणांचे मृतदेह मिळाले; मात्र तीन जणांचे मृतदेह मिळालेले नाहीत. सात प्रवासी वाढलेले असतानाच आता आणखी एक प्रवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही एसटी बसमधून वाहून गेलेल्या प्रवाशांची संख्याही २६ एवढी झाली आहे. दोन्ही अपघातग्रस्त बसमधील वाहकांकडे असलेल्या ट्रायमॅक्स मशीनला अपघातापूर्वी दोन तास ‘रेंज’ नव्हती. त्यामुळे एसटीच्या मुख्यालय आणि त्या आगारांत असलेल्या सर्व्हरमध्ये ‘त्या’ दोन तासांत किती प्रवाशांनी प्रवास केला याची नोंद झालेली नाही. त्यामुळे एसटी महामंडळाकडून या सर्व बाबींचा तपास केला जात असल्याचे एसटीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. या दुर्घटनेसंदर्भात घेण्यात येणाऱ्या शोधमोहिमेत एसटीचे १00 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. हाती लागलेल्या प्रवाशांचे पार्थिव त्यांच्या नातेवाइकांच्या घरी पाठविण्याची व्यवस्था करतानाच सापडलेल्या एसटीच्या तुकड्यांची तपासणी केली जात आहे. (प्रतिनिधी)