शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात महायुतीचे जमले?

By admin | Updated: January 19, 2017 03:48 IST

शिवसेना-भाजपा युतीच्या वाटाघाटी बहुतांशी यशस्वी झाल्याची माहिती भाजपा शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी ‘लोकमत’ला दिली.

सदानंद नाईक,

उल्हासनगर- महापालिका निवडणुकीतील शिवसेना-भाजपा युतीच्या वाटाघाटी बहुतांशी यशस्वी झाल्याची माहिती भाजपा शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी ‘लोकमत’ला दिली. शिवसेना-भाजपाने आपल्या वाट्याच्या प्रत्येकी पाच जागांवर पाणी सोडत त्या साई पक्षाला देऊन सिंधी मतांचे विभाजन टाळण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. आता नव्या संभाव्य जागावाटपानुसार शिवसेना २८, भाजपा २८, साई पक्ष १० व रिपाइं १२ जागा लढणार असल्याचे आयलानी यांनी सांगितले. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनीही ९० टक्के युती पक्की असल्याचे सांगितले. उल्हासनगरात ओमी कलानी टीमला भाजपात प्रवेश देण्यास आयलानी यांचा विरोध आहे, तर भाजपाने कलानी यांना प्रवेश दिला किंवा त्यांच्यासोबत हातमिळवणी केली तर पंचाईत होईल, हे शिवसेनेला ठाऊक असल्याने स्थानिक नेत्यांनी वाटाघाटी करून पुन्हा शिवसेना,भाजपा, साई व रिपाइं यांची मोट बांधली आहे. बुधवारी दुपारी शिवसेना-भाजपा युतीबाबतची चर्चा पार पडली असून दोन दिवसांत अंतिम निर्णय घोषित करणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख चौधरी व भाजपा शहर जिल्हाध्यक्ष आयलानी यांनी दिली. शिवसेनेने बैठकीत सुरुवातीला जुन्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना-भाजपा प्रत्येकी ३३ आणि रिपाइं १२ जागा अशी मागणी केल्याने वादंग निर्माण झाला होता. सिंधी मतांची विभागणी होऊ नये, म्हणून शिवसेना-भाजपा व रिपाइंच्या महायुतीत साई पक्षाला घेण्याचा निर्णय घेतला. भाजपा ३८ पैकी २८ जागा लढेल व १० जागा साई पक्षाला दिल्या जातील, असे समजते.भाजपाकडून आयलानी, ज्येष्ठ नेते नरेंद्र राजानी, जमनुदास पुरस्वानी, राजा गेमनानी, राम चार्ली तर शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख चौधरी, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना उपशहरप्रमुख दिलीप गायकवाड, धनंजय बोडारे उपस्थित होते. भाजपात फुटीची शक्यता : भाजपातील ज्या गटाने कलानी यांना पक्षात आणण्यासाठी प्रदेशाध्यक्षांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत उंबरठे झिजवले, ते महायुतीचे जागावाटप अंतिम झाल्यास पक्षाला सोडचिठ्ठी देऊन कलानी यांच्या छत्रछायेखाली जाण्याची शक्यता आहे. त्यांचे प्रभाग कलानी यांचे वर्चस्व असलेल्या परिसरात येत असल्याने त्यांना कलानी यांनी भाजपात यावे, असे वाटत होते. मात्र, त्या प्रयत्नांना अपयश आल्याने त्यांच्यापुढे पक्षांतराखेरीज पर्याय राहणार नाही, अशी शक्यता व्यक्त होत आहे.>कलानींच्या धास्तीनेच महायुती : ओमी कलानी यांनी गेल्या सहा महिन्यांपासून प्रचार सुरू केला आहे. तसेच गोव्यातील पक्ष कार्यकर्ता शिबिरात ४८ उमेदवारांची यादी घोषित करून प्रचाराला सुरुवात केली. गेल्या आठवड्यात ३५ ते ४० उमेदवारांच्या निवडणूक प्रचार कार्यालयांचे उद्घाटन केले आहे. एकीकडे हे सुरू असतानाच दुसरीकडे भाजपासोबत जाण्याचे ओमी यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला खीळ घालण्याकरिता महायुतीचे जागावाटप केल्याचे बोलले जाते.