शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
10
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
11
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
12
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
13
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
14
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
15
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
16
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
17
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
18
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
20
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात

गणेशभक्तांचा महापूर

By admin | Updated: September 21, 2015 14:38 IST

गणेशोत्सवाच्या पहिल्याच रविवारी असलेल्या पावसाची रिपरिप आणि मेगाब्लॉकच्या संकटावर मात करीत मुंबईकरांनी गणपती पाहण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी केली होती

मुंबई : गणेशोत्सवाच्या पहिल्याच रविवारी असलेल्या पावसाची रिपरिप आणि मेगाब्लॉकच्या संकटावर मात करीत मुंबईकरांनी गणपती पाहण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी केली होती. उपनगरांकडून शहराकडे येणाऱ्या गणेशभक्तांचा महापूर पोलिसांनी शिस्तबद्ध पद्धतीने नियंत्रित केला.पाऊस आणि मेगाब्लॉकमुळे मंडळांना भक्तांची गर्दी होणार का, याबाबत हुरहुर लागली होती. मात्र पुढील रविवारी बाप्पांचे विसर्जन होणार असल्याने सर्वच भक्तांनी मिळेल त्या साधनाने शहराकडे धाव घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. लालबाग, परळ, भायखळा, फोर्ट, विलेपार्ले, चेंबूर, कुर्ला अशा शहर आणि उपनगरांतील महत्त्वाच्या ठिकाणी गणपतीचा जयजयकार ऐकायला आला.सकाळपासून असलेल्या गर्दीत सायंकाळनंतर मात्र वेगाने वाढ दिसली. मात्र नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या नियंत्रणामुळे गर्दीला आवरण्यात वाहतूक पोलिसांना यश आले. मुख्यत: लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग वाहनांसाठी सकाळपासूनच बंद ठेवण्यात आला होता. त्याला पर्यायी मार्ग म्हणून करी रोड पुलावरून ना. म. जोशी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली होती. तर दुसरा पर्यायी मार्ग म्हणून काळाचौकीच्या बेस्ट कर्मचारी वसाहतीकडून आंबेवाडी मार्गाने परावर्तन देण्यात आले होते.‘टेंपल रन’ची धमालकाळाचौकीचा महागणपती येथे टेंपल रन या मोबाइल गेमची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. बच्चेकंपनीने धमाल करण्यासाठी या ठिकाणी गर्दी केल्याचे चित्र होते, तर तरुणांनीही सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती.एनएसएसचे पथनाट्यगणेशोत्सवात जमणाऱ्या गर्दीपर्यंत पथनाट्याच्या मदतीने सामाजिक संदेश पोचवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत (एनएसएस) विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी रविवारी रस्त्यावर उतरले होते. रुपारेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काळाचौकीला, तर महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राणीबागेत पथनाट्याच्या मदतीने लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम केले.शास्त्री हॉल सार्वजनिक श्रीगणेशोत्सव कोणाशीही स्पर्धा न करता प्रत्येकवर्षी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या काळात बौद्धिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. यात लहान मुलांसाठी स्तोत्र पाठांतर, श्लोक पाठांतर स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामुळे लहान वयातच मुलांना आपली संस्कृती, परंपरा याची ओळख होते. ठरलेल्या आरत्या त्याच क्रमाने आणि तालासुरात केल्या जातात. मंडळाचे कामकाज पाहायला विविध समित्यांची स्थापना केली आहे. सर्व कार्यकर्ते वर्गीकरण करून काम करतात, अशी माहिती मंडळाचे स्पर्धा समन्वयक गणेश आचवल यांनी दिली.