शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
5
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
6
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
7
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
8
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
9
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
10
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
11
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
12
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
13
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
14
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
15
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
16
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
17
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
18
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
19
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
20
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!

महाराष्ट्रातील गावांना मध्य प्रदेशातून वीज

By admin | Updated: January 11, 2015 00:46 IST

महाराष्ट्रातील दोन गावांना मध्य प्रदेशातून वीज पुरवठा केला जात आहे. नागपूर जिल्ह्यातील घाटपेंढरी व घाटकुपडा ही ती दोन गावे आहेत. पेंच वन क्षेत्रात नवेगाव खैरीजवळ ही गावे आहेत.

दोन गावांसाठी विशेष व्यवस्था : सहा रुपये खर्च, साडेतीन रुपये वसुलीकमल शर्मा - नागपूर महाराष्ट्रातील दोन गावांना मध्य प्रदेशातून वीज पुरवठा केला जात आहे. नागपूर जिल्ह्यातील घाटपेंढरी व घाटकुपडा ही ती दोन गावे आहेत. पेंच वन क्षेत्रात नवेगाव खैरीजवळ ही गावे आहेत. या दोन्ही गावात वीज पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन्ही गावांनी पुढाकार घेत एक नवी व्यवस्था लागू केली आहे. या अंतर्गत मध्य प्रदेशने येथे लाईन टाकली तर बिल वितरित करण्यापासून ते वसूल करण्याची जबाबदारी महाराष्ट्रावर आहे. लोकमत चमूने शुक्रवारी घाटपेंढरी या गावाला भेट देऊन पाहणी केली. घाटपेंढरी हे एक लहान पण स्वच्छ गाव आहे. सुमारे दोनशे घरे व दीड हजार लोकसंख्या आहे. गावातील बहुतांश लोक पाच-सहा किलोमीटरवर असलेल्या आपल्या शेतात कामासाठी गेले होते. गावात कमालीची शांतता होती. एका घरी चौकशी केली असता महिला टीव्ही पाहत असल्याचे दिसले. डिश टीव्ही लागल्यामुळे या गावातही सर्व चॅनेल दिसू लागले आहेत. या वेळी गावचे लाईनमेन शेख रफिक नूर मोहम्मद यांची भेट झाली. ते कोराडी येथे राहतात. मात्र गावात ड्युटी असल्यामुळे १९९८ पासून येथेच वास्तव्यास आहेत. त्यांनी सांगितले की, या दोन गावात १९९६ मध्ये वीज आली. गावाच्या सीमेवर ट्रान्सफॉर्मर लागला आहे. मध्य प्रदेशातील वीज वितरण कंपनी इथवर वीज पोहचवते. या ट्रान्सफॉर्मरवर मध्य प्रदेशने एक मीटर लावले आहे. महाराष्ट्रातील वीज वितरण कंपनीने देखील येथे मीटर लावले आहे. महावितरणने विजेचे खांब उभारून प्रत्येक घरी वीज पोहचवली आहे. या गावाला वीज पुरवठा करणे हा महाराष्ट्र सरकारसाठी फायद्याचा विषय नाही. महावितरणचे अधीक्षक अभियंता अरविंद भादीकर यांच्यानुसार या गावांमध्ये वापरण्यात येणाऱ्या विजेसाठी प्रति युनिट सहा रुपये मध्य प्रदेश सरकारला द्यावे लागतात. मात्र, संबंधित गावांकडून प्रति युनिट ३.५० रुपये दराने वसुली केली जाते. प्रत्येक युनिटवर अडीच रुपयांचा तोटा सहन केला जातो. लाईनमेनच सर्वकाही संबंधित दोन्ही गावांसाठी महावितरणने शेख रफिक यांना लाईनमेन नियुक्त केले आहे. गावचे लोक त्यांनाच कंपनी मानतात. दरमहा येणारे बिलही गावकरी त्यांच्याकडेच जमा करतात. लाईनमेन नवेगांव येथे येऊन पैसे जमा करतात व पावती गावकऱ्यांना देतात. वीज पुरवठा खंडित झाला तर रफिक यांना १० किलोमीटरवर असलेल्या मध्य प्रदेशच्या सबस्टेशनला कळवावे लागते. त्यानंतर मध्य प्रदेशचे अभियंता वीजपुरवठा सुरू करतात. वीज पुरवठा करणे कठीण कार्यकारी अभियंता सुहार म्हेत्रे व उप कार्यकारी अभियंता राजपाल गेडाम यांनी सांगितले की, या दोन गावांना महाराष्ट्रातून वीज पुरवठा करणे कठीण आहे. महाराष्ट्रातून वीज पुरवठा करावयाचा झाल्यास जंगलात सुमारे २० किलोमीटर लाईन टाकावी लागेल. तांत्रिक बिघाड आला तर दुरुस्ती करणे कठीण जाईल. त्यामुळे मध्य प्रदेशातून वीज घेणे हाच उत्तम पर्याय आहे.