शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील गावांना मध्य प्रदेशातून वीज

By admin | Updated: January 11, 2015 00:46 IST

महाराष्ट्रातील दोन गावांना मध्य प्रदेशातून वीज पुरवठा केला जात आहे. नागपूर जिल्ह्यातील घाटपेंढरी व घाटकुपडा ही ती दोन गावे आहेत. पेंच वन क्षेत्रात नवेगाव खैरीजवळ ही गावे आहेत.

दोन गावांसाठी विशेष व्यवस्था : सहा रुपये खर्च, साडेतीन रुपये वसुलीकमल शर्मा - नागपूर महाराष्ट्रातील दोन गावांना मध्य प्रदेशातून वीज पुरवठा केला जात आहे. नागपूर जिल्ह्यातील घाटपेंढरी व घाटकुपडा ही ती दोन गावे आहेत. पेंच वन क्षेत्रात नवेगाव खैरीजवळ ही गावे आहेत. या दोन्ही गावात वीज पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन्ही गावांनी पुढाकार घेत एक नवी व्यवस्था लागू केली आहे. या अंतर्गत मध्य प्रदेशने येथे लाईन टाकली तर बिल वितरित करण्यापासून ते वसूल करण्याची जबाबदारी महाराष्ट्रावर आहे. लोकमत चमूने शुक्रवारी घाटपेंढरी या गावाला भेट देऊन पाहणी केली. घाटपेंढरी हे एक लहान पण स्वच्छ गाव आहे. सुमारे दोनशे घरे व दीड हजार लोकसंख्या आहे. गावातील बहुतांश लोक पाच-सहा किलोमीटरवर असलेल्या आपल्या शेतात कामासाठी गेले होते. गावात कमालीची शांतता होती. एका घरी चौकशी केली असता महिला टीव्ही पाहत असल्याचे दिसले. डिश टीव्ही लागल्यामुळे या गावातही सर्व चॅनेल दिसू लागले आहेत. या वेळी गावचे लाईनमेन शेख रफिक नूर मोहम्मद यांची भेट झाली. ते कोराडी येथे राहतात. मात्र गावात ड्युटी असल्यामुळे १९९८ पासून येथेच वास्तव्यास आहेत. त्यांनी सांगितले की, या दोन गावात १९९६ मध्ये वीज आली. गावाच्या सीमेवर ट्रान्सफॉर्मर लागला आहे. मध्य प्रदेशातील वीज वितरण कंपनी इथवर वीज पोहचवते. या ट्रान्सफॉर्मरवर मध्य प्रदेशने एक मीटर लावले आहे. महाराष्ट्रातील वीज वितरण कंपनीने देखील येथे मीटर लावले आहे. महावितरणने विजेचे खांब उभारून प्रत्येक घरी वीज पोहचवली आहे. या गावाला वीज पुरवठा करणे हा महाराष्ट्र सरकारसाठी फायद्याचा विषय नाही. महावितरणचे अधीक्षक अभियंता अरविंद भादीकर यांच्यानुसार या गावांमध्ये वापरण्यात येणाऱ्या विजेसाठी प्रति युनिट सहा रुपये मध्य प्रदेश सरकारला द्यावे लागतात. मात्र, संबंधित गावांकडून प्रति युनिट ३.५० रुपये दराने वसुली केली जाते. प्रत्येक युनिटवर अडीच रुपयांचा तोटा सहन केला जातो. लाईनमेनच सर्वकाही संबंधित दोन्ही गावांसाठी महावितरणने शेख रफिक यांना लाईनमेन नियुक्त केले आहे. गावचे लोक त्यांनाच कंपनी मानतात. दरमहा येणारे बिलही गावकरी त्यांच्याकडेच जमा करतात. लाईनमेन नवेगांव येथे येऊन पैसे जमा करतात व पावती गावकऱ्यांना देतात. वीज पुरवठा खंडित झाला तर रफिक यांना १० किलोमीटरवर असलेल्या मध्य प्रदेशच्या सबस्टेशनला कळवावे लागते. त्यानंतर मध्य प्रदेशचे अभियंता वीजपुरवठा सुरू करतात. वीज पुरवठा करणे कठीण कार्यकारी अभियंता सुहार म्हेत्रे व उप कार्यकारी अभियंता राजपाल गेडाम यांनी सांगितले की, या दोन गावांना महाराष्ट्रातून वीज पुरवठा करणे कठीण आहे. महाराष्ट्रातून वीज पुरवठा करावयाचा झाल्यास जंगलात सुमारे २० किलोमीटर लाईन टाकावी लागेल. तांत्रिक बिघाड आला तर दुरुस्ती करणे कठीण जाईल. त्यामुळे मध्य प्रदेशातून वीज घेणे हाच उत्तम पर्याय आहे.