शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
4
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
5
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
6
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
7
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
8
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
9
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
10
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
11
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
12
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
13
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
14
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
15
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
16
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
17
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
18
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
19
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
20
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?

‘माधवराव, काळाच्या पुढचं पाहणारे दिग्दर्शक’

By admin | Updated: May 15, 2017 01:11 IST

आशा काळे : माधवराव शिंदे जन्मशताब्दी महोत्सवास प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : स्त्री भ्रूणहत्या, महिलांचा सन्मान, कुटुंब नियोजन याची आता मोठ्याने चर्चा होते; परंतु ६० वर्षांपूर्वी माधवराव शिंदे यांनी या विषयावरचे गंभीर चित्रपट दिले म्हणूनच माधवराव हे काळाच्या पुढचे पाहणारे दिग्दर्शक ठरतात, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी व्यक्त केले. चित्रसाधक माधव शिंदे जन्मशताब्दीनिमित्त आयोजित महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. शिंदे कुटुंबीय, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळ यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर श्रीकांत देसाई, माधव शिंदे यांच्या कन्या छाया माने, माया देसाई, चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर व फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी उपस्थित होते. आशा काळे म्हणाल्या, माझ्या घरी माधवरावांचं येणं होतं. वडिलांचा त्यांचा स्नेह होता. त्यांनी मला त्यांच्या ‘संसार’ चित्रपटासाठी नायिका म्हणून निवडलं आणि मला याचा फार आनंद झाला. अतिशय कमी बोलणारे, नम्रतेने वागणारे, कलावंतांची काळजी घेणारे, अशी माधवरावांची अनेक रूपं मी पाहिली आहेत. त्यांच्या ‘शिकलेली बायको’ हा चित्रपट मी अनेकवेळा पाहिला. त्यातील ‘आली हसत पहिली रात’ हे गाणंही आज मला जस्संच्या तस्सं आठवतं. माधवरावांनी ‘संसार’मध्ये माझी मुलगी म्हणून बालकलाकार ऊर्मिला मातोंडकर हिची निवड केली होती जिने नंतर हिंदीमध्ये आपले नाव केले. प्रास्ताविकात चंद्रकांत जोशी म्हणाले, राष्ट्रपती पारितोषिकापर्यंत धडक मारण्याची कामगिरी केलेले शिंदे यांचे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मोठे योगदान आहे. मात्र, नव्या पिढीला ते कोण होते हे कळावं म्हणूनच त्यांच्या कुटुंबीयांनी हे धाडस स्वीकारलं. माधवरावांच्या १९४२ साली प्रसिद्ध झालेल्या बातमीची कात्रणेही त्यांच्या कुटुंबीयांनी जपून ठेवली आहेत. हे त्यांचं योगदान कोल्हापूरसाठी मोलाचं ठरलं आहे. शिंदे यांच्या ‘धर्मकन्या’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलेल्या आणि ‘साखर उद्योगातील संशोधक’ म्हणून ज्यांना मान्यता आहे अशा वसुधा केसकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. शिंदे यांच्या चित्रपटासाठी काळाची फुटपट्टी वापरावी लागेल, अशा शब्दांत त्यांनी शिंदे यांच्या चित्रपटाचे महत्त्व अधोरेखित केलं. राहुल देसाई यांनी स्वागत केले तर फिल्म सोसायटीचे सचिव दिलीप बापट यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी चित्रपटसृष्टीतील भालचंद्र कुलकर्णी, यशवंत भालकर, सुभाष भुर्के यांच्यासह अनिता काळे व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. तुम्ही कशाला काळजी करतायावेळी ‘संसार’ चित्रपटावेळच्या चित्रीकरणातील किस्सा आशातार्इंनी सांगितला. त्या म्हणाल्या, या चित्रपटातील नायक यशवंत दत्त मला कानफाटीत मारतात आणि मी शिलाई मशीनवर कोसळते आणि तेथेच माझा मृत्यू होतो, असे चित्रीकरण करायचे होते. मला न मारताही शॉट कसा चांगला होईल याबाबत यशवंत दत्त माझ्याशी बोलत होते. काहीवेळा खरोखरंचा प्रसंग वाटावा म्हणून मारायचे का, अशीही चर्चा होती तेव्हा अतिशय काळजीने माधवरावांनी यशवंत दत्तना विचारलं, तुम्ही आशाला कसं मारणार? तिला लागलं तर. ते अस्वस्थ झाले. शेवटी मीच त्यांना म्हणाले, अहो मार मी खाणार आहे तर तुम्ही का अस्वस्थ होता? परंतु कलावंतांची काळजी घेण्याचा त्यांचा स्वभाव होता. कोल्हापूरच्या माणसांनीच मला घडवलंकोल्हापूरच्या आठवणींनी भारावलेल्या आशातार्इंनी यावेळी माहेरच्या लोकांनी कितीही कौतुक केलं तरी ते अपुरंच वाटतं असं सांगतानाच माझे गुरू चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, बाबूराव पेंढारकर आणि माधवराव शिंदे या तिघांनी मला घडवलं म्हणूनच आशा काळे गेली ५० वर्षे या चित्रपटसृष्टीमध्ये खंबीरपणे उभी असल्याचे सांगत टाळ्या घेतल्या.