शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘मा. गो. वैद्यांचे वय औषधाच्या गोळ्या खाण्याचे’

By admin | Updated: April 11, 2016 02:57 IST

‘महाराष्ट्राचे चार तुकडे करण्याची भाषा करणारे मा. गो. वैद्य मराठी माणसाच्या मनातून उतरलेलेच आहेत. त्यामुळे कुणी पिस्तूल झाडण्याची गरज नाही

मुंबई : ‘महाराष्ट्राचे चार तुकडे करण्याची भाषा करणारे मा. गो. वैद्य मराठी माणसाच्या मनातून उतरलेलेच आहेत. त्यामुळे कुणी पिस्तूल झाडण्याची गरज नाही. तसेही मा. गो. वैद्यांचे वय आता बंदुकीच्या गोळ्यांपेक्षा औषधाच्या गोळ्या घेण्याचे झाले आहे. याचे भान त्यांनी ठेवावे,’ असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हाणला आहे. ‘पृथ्वीपासून स्वतंत्र व्हायची वेळ आली, तरी वेगळा विदर्भ मागतायत,’ अशा शब्दांत राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत मा. गो. वैद्यांवर टीका केली होती. मा. गो. वैद्य यांनीही राज ठाकरेंनी मारेकऱ्यांकरवी माझी हत्या घडविली नाही तर शंभरी पार करेन, असे सांगत पलटवार केला होता. रविवारी मनसेने प्रसिद्धी पत्रकातून मा. गो. वैद्य यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. भाषा, संस्कृती, लोकभावनेच्या आधारावर देशात राज्यांची निर्मिती करण्यात आली. प्रशासकीय काम अथवा लोकसंख्यचे गणित यामागे नव्हते. ५० लाख लोकसंख्येचे राज्य निर्माण करून महापालिकांचे संघराज्य करायचे आहे का? राज्ये सोयीसाठी लहान करा म्हणणारे वैद्य उद्या देश मोठा असल्याने लोकांच्या सोयीसाठी तो लहान करा, अशी मागणी करणार का, असा सवाल मनसे प्रवक्ता अनिल शिदोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.